रेल्वेच्या धडकेत परिचारिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST2021-02-20T05:09:47+5:302021-02-20T05:09:47+5:30
--------------------------------------------------- कोल्हापुरात मार्चमध्ये भटक्या विमुक्तांची सामाजिक न्याय हक्क परिषद कोल्हापूर : राज्यकर्त्याकडून प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्नांची जंत्री ...

रेल्वेच्या धडकेत परिचारिका ठार
---------------------------------------------------
कोल्हापुरात मार्चमध्ये भटक्या विमुक्तांची सामाजिक न्याय हक्क परिषद
कोल्हापूर : राज्यकर्त्याकडून प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्नांची जंत्री वाढतच चालली आहे. यावर विचारमंथन करून आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात भटक्या विमुक्तांची राज्यस्तरीय सामाजिक न्याय हक्क परिषद भरवण्यात येणार आहे. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याचे नियोजन करण्याचे शुक्रवारी झालेल्या प्राथमिक बैठकीत ठरविण्यात आले. दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
---------------------------------------------------
मिरजेत रेल्वेच्या हद्दीतील घरे हटविण्याला विरोध
मिरज (जि.सांगली) : मिरजेतील रेल्वे स्थानकालगत झोपडपट्टीसह सांगली रस्त्यावरील कुष्ठरुग्ण वसाहतीतील घरे हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. माजी आमदार शरद पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन घरे पाडण्याच्या कारवाईस विरोध केला. रेल्वेच्या स्थानकालगत झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत.
---------------------------------------------------
सांगलीत दहशत माजवत लुटणारे अटकेत
सांगली : शहरातील गणेश मार्केटमधील व्यापाऱ्यांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली. अरबाज अस्लम खान (वय २१), अक्षय संतोष निकम (२१), करण प्रकाश गोसावी (२३, तिघेही रा. गल्ली क्रमांक पाच, प्रकाशनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
---------------------------------------------------
वणवा लावल्याप्रकरणी पंधरा हजारांचा दंड
दहीवडी (जि. सातारा) : वरकुटे मलवडी येथे पाचट पेटविल्यानंतर लावली गेलेली आग वनक्षेत्रात पसरली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वनविभागाचे नुकसान झाले. याप्रकरणी भिवा जगन्नाथ खरात या व्यक्तीला वनविभागाने अटक केली. त्याला वणवा लावल्याप्रकरणी पंधरा हजारांचा दंड व न्यायालय उठेपर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली.
---------------------------------------------------
रोकडसह पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी (जि.सातारा) : मुलीच्या लग्नकार्याच्या धावपळीत हॉलमध्ये ठेवलेली सोन्याचा ऐवज व एक लाखाची रोकड असलेली पिशवी असा सुमारे १ लाख ८१ हजार ६०० चा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------------------------
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे झाले स्वच्छ
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार लाडघर (ता. दापोली), वाडावेत्ये, कशेळी (ता. राजापूर) आणि भाट्ये (ता. रत्नागिरी) या ठिकाणी संबंधित कंपनींच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भाट्येच्या समुद्रकिनाऱ्याची जबाबदारी असलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने जिल्हाधिकारी मिश्रा तसेच तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या उपस्थितीत हा किनारा स्वच्छ करण्यात आला.
---------------------------------------------------
रत्नागिरी जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके
रत्नागिरी : जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके असून, त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविकांवर देण्यात आली आहे. मात्र, अनुदान नसल्याने हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न अंगणवाडीसेविकांकडून करण्यात येत आहे.
---------------------------------------------------
सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन रखडली
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : सेवानिवृत्त शिक्षकांचीच पेन्शन रखडली असून प्रशासनाच्या या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत आहोत, अशी माहिती महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन सिंधुदुर्गचे सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी दिली. जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारी २०२१ चे निवृत्तिवेतन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक वगळून उर्वरित सर्व राज्य सरकारी, जिल्हा परिषद, माध्यमिक विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रदान करण्यात आले आहे.