शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ऊस गाळपात राज्यात ‘सोलापूर’च भारी, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 11:37 IST

हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता.

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम निम्यावर आला असून, गेल्या अडीच महिन्यांत राज्यात ५ कोटी ५६ लाख टन उसाचे गाळप होऊन ५ कोटी ४८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपामध्ये यंदा पहिल्यांदाच सोलापूर विभागाने आघाडी घेतली असून १ कोटी ३२ लाख ८३ हजार टनांचे गाळप केले आहे. कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर असून ‘जवाहर’ कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे.

साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामात ऊस दरावरून ताणाताणी झाली नाही. हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता. त्यातूनही कारखान्यांनी गाळप जोमाने सुरू ठेवले. यंदाच्या हंगामात राज्यात ९५ सहकारी, तर ९७ खासगी कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला आहे. त्यांनी ५ कोटी ५६ लाख उसाचे गाळप करून ५ कोटी ४८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

सर्वाधिक गाळप सोलापूर विभागात झाले आहे. त्यातही सोलापूर जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख टन गाळप झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यात २७ लाख २५ हजार टन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८७ लाख ५२ हजार टन तर सांगली जिल्ह्यात ४५ लाख २५ हजार टन गाळप झाले आहे. साखर उताऱ्यात नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागच पुढे राहिला आहे.हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक म्हणजे १० लाख ५६ हजार टन गाळप करत असताना ११.३५ टक्के उतार कायम राखला आहे. त्यापाठोपाठ माढा (जि. सोलापूर) येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १० लाख १७ टनांचे गाळप केले आहे.

विभागनिहाय गाळप टनात व उतारा टक्केवारी-

विभाग कारखाने गाळप उतारा
कोल्हापूर३५१.३२ कोटी ११.१६
पुणे२९१.१३ कोटी १०.०२
सोलापूर४५१.३२ कोटी ८.८९
अहमदनगर२६७४.९५ लाख ९.३२
औरंगाबाद२३४३.४६ लाख ९.२२
नांदेड२७५१.९७ लाख ९.७९
अमरावती३.९९ लाख ८.६०
नागपूर४ २.११ लाख ८.३९
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSolapurसोलापूर