शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

ऊस गाळपात राज्यात ‘सोलापूर’च भारी, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 11:37 IST

हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता.

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम निम्यावर आला असून, गेल्या अडीच महिन्यांत राज्यात ५ कोटी ५६ लाख टन उसाचे गाळप होऊन ५ कोटी ४८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपामध्ये यंदा पहिल्यांदाच सोलापूर विभागाने आघाडी घेतली असून १ कोटी ३२ लाख ८३ हजार टनांचे गाळप केले आहे. कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर असून ‘जवाहर’ कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे.

साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामात ऊस दरावरून ताणाताणी झाली नाही. हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता. त्यातूनही कारखान्यांनी गाळप जोमाने सुरू ठेवले. यंदाच्या हंगामात राज्यात ९५ सहकारी, तर ९७ खासगी कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला आहे. त्यांनी ५ कोटी ५६ लाख उसाचे गाळप करून ५ कोटी ४८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

सर्वाधिक गाळप सोलापूर विभागात झाले आहे. त्यातही सोलापूर जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख टन गाळप झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यात २७ लाख २५ हजार टन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८७ लाख ५२ हजार टन तर सांगली जिल्ह्यात ४५ लाख २५ हजार टन गाळप झाले आहे. साखर उताऱ्यात नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागच पुढे राहिला आहे.हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक म्हणजे १० लाख ५६ हजार टन गाळप करत असताना ११.३५ टक्के उतार कायम राखला आहे. त्यापाठोपाठ माढा (जि. सोलापूर) येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १० लाख १७ टनांचे गाळप केले आहे.

विभागनिहाय गाळप टनात व उतारा टक्केवारी-

विभाग कारखाने गाळप उतारा
कोल्हापूर३५१.३२ कोटी ११.१६
पुणे२९१.१३ कोटी १०.०२
सोलापूर४५१.३२ कोटी ८.८९
अहमदनगर२६७४.९५ लाख ९.३२
औरंगाबाद२३४३.४६ लाख ९.२२
नांदेड२७५१.९७ लाख ९.७९
अमरावती३.९९ लाख ८.६०
नागपूर४ २.११ लाख ८.३९
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSolapurसोलापूर