रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २६वर
By Admin | Updated: May 28, 2014 03:20 IST2014-05-28T03:20:08+5:302014-05-28T03:20:08+5:30
चुरेब रेल्वेस्टेशनजवळ सोमवारी गोरखधाम एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढून २६ झाली आहे

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २६वर
संत कबीरनगर- चुरेब रेल्वेस्टेशनजवळ सोमवारी गोरखधाम एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढून २६ झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्याच निर्णयात या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.