शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

..आता जरांगे-पाटीलांच्या आदेशाची प्रतिक्षा, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची भूमिका 

By संदीप आडनाईक | Updated: December 21, 2023 15:48 IST

आंदोलन झाल्यास सरकारला पेलवणार नाही

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने या अधिवेशनात विविध घोषणा केल्या परंतु कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, त्यातच मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली २४ डिसेंबर पर्यंतच्या मुदतीत हा प्रश्न मार्गी लागत नाही याची खात्री झाली आहे, त्यामुळे मराठा समाज जरांगे-पाटील यांच्या आदेशाची प्रतिक्षा करत असल्याचे सकल मराठा समाजाने गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता आंदोलन झाल्यास सरकारला ते पेलवणार नाही असाही इशारा यावेळी देण्यात आला. दसरा चौकात मराठा समाजाचे गेले ५४ दिवस आंदोलन सुरू आहे. या अधिवेशनात मराठा आक्षणासंदर्भात निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र कोणताही ठोस निर्णय सरकारने जाहीर केला नाही. जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. आता त्यांचा निर्णय आल्यानंतर कोल्हापुरात त्याची तंतोतंत पालन केले जाईल असा निर्णय सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीने येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक घेऊन जाहीर केली. यावेळी समन्वयक वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, दिलीप देसाई यावेळी उपस्थित होते. ॲड. बाबा इंदुलकर यांनी कायदेशीर बाबींविषयी चर्चा केली. ते म्हणाले, सरसकट कुणबी दाखले देणार नाही, केंद्र सरकार दिल्याप्रमाणे ईडबल्युएस मधून १० टक्के आरक्षण देऊ, असे दुसरे पिल्लू सोडले आहे, सरकारला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलवणार, कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही अशा घोषणा सरकारने केल्या. यातून सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत वेळ काढायचा आहे हे स्पष्ट होते.  म्हणून २४ तारखेपर्यंत वाट पाहणार आणि जरांगे-पाटील यांच्या आदेशाची कोल्हापुरातील सकल मराठा समाज वाट पहात आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात कोल्हापुरात एकोपा आहे, वाद होणार नाहीत.वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाजाने आतापर्यंत तीन वेळा सरकारला मुदत दिली आहे. दोन वेळा फसवले आहे. आता मराठा फसणार नाही. २८८ आमदारांनी आरक्षणाला पाठिंबा दिला मात्र कायदेशीर आरक्षण कसे देणार यावर चर्चा केली नाही, आता मुंबईत आंदोलन झाल्यास कोल्हापुरातही शांततेत आंदोलन करणार, योग्य तोडगा काढावा अन्यथा जनसमूह शांत राहणार नाही.दिलीप देसाई म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी कुणबी याद्या गोपनीय आहेत म्हणून जाहीर केल्या नाहीत, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण बाबत सरकारची भूमिका, स्थानिक पातळीवरील कायदा व सुव्यवस्था याबाबत कोणतीही चर्चा समन्वयक यांच्याशी केलेली नाही. विजय देवणे म्हणाले, या अधिवेशनात केवळ मराठा आरक्षणावर चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात निर्णय देण्याचे जाहीर करून दिशाभूल केली आहे, याचे परिणाम भोगावे लागतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील