शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

आता ग्राहक होणार पॉवरफुल्ल, नवीन कायदा सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:35 PM

ग्राहकांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा -२०१९ आणला आहे. याची अंमलबजावणी सोमवार (दि. २०) पासून देशभरात सुरू होणार आहे. जुन्या कायद्यात नसलेले ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकाची बाजू सबल होणार आहे.

ठळक मुद्देआता ग्राहक होणार पॉवरफुल्लनवीन ग्राहक संरक्षण कायदा - २०१९ सोमवारपासून लागू

कोल्हापूर : ग्राहकांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा -२०१९ आणला आहे. याची अंमलबजावणी सोमवार (दि. २०) पासून देशभरात सुरू होणार आहे. जुन्या कायद्यात नसलेले ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकाची बाजू सबल होणार आहे.

हा कायदा मागील वर्षी तयार करण्यात आला होता. तो काही महिन्यांपूर्वीच लागू होणार होता; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे या कायद्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता हा नवीन कायदा सोमवारपासून लागू होणार आहे. यात टेलिशॉपिंग व ऑनलाइर्न कंपन्यांचाही नव्याने समावेश केला आहे; तर १०० अधिक नवीन कलमे यात समविष्ट केली आहेत. पूर्वी जिल्हा ग्राहक मंचाच्या कार्यकक्षेत २० लाखांपर्यंतचे दावे दाखल करता येत होते. त्यात वाढवून एक कोटीपर्यंतचे दावे दाखल करता येणार आहेत. भेसऴयुक्त पदार्थ व वस्तूंपासून जीवितहानी झाली तर उत्पादकांना तुरुंगवासासह दहा लाखांपर्यंतचा दंड अशी तरतूद यात आहे.वैशिष्ट्ये अशी,

  • ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे.
  • ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात खटला दाखल करू शकतो.
  • ऑनलाइन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच नव्या कायद्यात समावेश होणार आहे.
  • खाण्या-पिण्याच्या जिन्नसांमध्ये भेसळ करणाऱ्या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद
  •  ग्राहक मध्यस्थ सेलची स्थापना; दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने या सेलमध्ये जाऊ शकतात.
  • याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहे. आधीच्या कायद्यात तशी तरतूद नव्हती.
  •  ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत.
  • राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग एक कोटी ते दहा कोटीपर्यंतच्या, तर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात १० कोटींपेक्षा जास्त प्रकरणांची सुनावणी होणार आहे.

कोल्हापूर तिसऱ्या स्थानीमुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरात सर्वाधिक दीडशेहून अधिक तक्रारी गेल्या वर्षी दाखल झाल्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून सर्वाधिक तक्रारींचा ओघ आहे. यातील निम्म्या तक्रारींचे निवारण जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत झाले आहे. 

सरकारने आणलेला नवीन कायदा ग्राहकांच्या हिताचा आहे. त्यांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा.- अरुण यादव ,सदस्य, राज्य ग्राहक संरक्षण परिषद, मंत्रालय, मुंबई

टॅग्स :consumerग्राहकkolhapurकोल्हापूर