शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

कोल्हापुरात गायरान अतिक्रमणधारकांना नोटिसा, डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 18:23 IST

अनेक ग्रामपंचायतींनी कॅव्हेट दाखल केले आहे, मात्र डोक्यावरील कारवाईची तलवार कधी हटणार याकडे नजरा लागल्या आहेत.

कोल्हापूर : गेली ३०-४० वर्षे डोक्यावर असणारे छप्पर काढून घेण्याच्या नोटिसा गायरान अतिक्रमणधारकांना लागू केल्याने ग्रामीण भागात कमालीची अस्वस्थता वाढली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असली तरी त्याला स्थगिती मिळविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ‘निवासी’ अतिक्रमणे नियमित करून इतर काढून घेण्याबाबत शासन स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारपासून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमणधारकांनी स्वत:हून बांधकामे काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. गावोगावी नोटिसा धडकल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेली ३०-४० वर्षे राहणारे घर पाडले जाणार या भीतीने अतिक्रमणधारकांसमोर स्वत:चे मरण दिसू लागले आहे. अनेक ग्रामपंचायतींनी कॅव्हेट दाखल केले आहे, मात्र डोक्यावरील कारवाईची तलवार कधी हटणार याकडे नजरा लागल्या आहेत.शासन पातळीवर याचा अभ्यास सुरू असून, न्यायालयात पुन:विचार याचिका दाखल करत असताना केंद्र सरकारच्या पातळीवर कायद्यात कोणत्या प्रकारे दुरुस्ती करता येईल, याचा अभ्यास सुरू आहे. निवासी अतिक्रमणे कायम करत असताना त्यांच्याकडून तेथील रेडिरेकनरनुसार पैसे भरून घ्यावे व इतर कारणासाठी केलेली अतिक्रमणे काढून ती जागा शासनाने ताब्यात घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या भीतीने कारवाईची प्रक्रियान्यायालयाने अतिक्रमणे काढून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला टाईमटेबल घालून दिले आहे. त्यानुसार कार्यवाही केली नाही तर न्यायालयाचा अपमान होतो, या भीतीने प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुलाबाळांना घेऊन जायचे कोठे?आयुष्याची पुंजी खर्च बांधलेले घर पाडल्यानंतर मुलाबाळांना घेऊन जायचे कोठे? असा प्रश्न अनेक कुटुंबांना पडला आहे.

खरंच घर पाडली जाणार का?निवारा नाही म्हणून गायरानावर घरे बांधून तिथेच स्थायिक झालेल्यांमध्ये रोजीरोटीवरील कुटुंबाची संख्या अधिक आहे. प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईने त्यांना रात्रभर झोपा लागत नाहीत. सकाळी कामावर जाण्याअगोदर ते एकमेकांना विचारतात ‘खरंच घरं पाडली जाणार का?’ पाडली तर जायचे कोठे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर