शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

Kolhapur: पंचगंगा प्रदूषणप्रकरणी ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींना नोटीस

By समीर देशपांडे | Updated: March 26, 2024 11:50 IST

गटविकास अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना

समीर देशपांडेकोल्हापूर : पंचगंगा नदीच्याप्रदूषणाला हातभार लावणाऱ्या ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांनी सात पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहिले आहे.नदीप्रदूषणाबाबत १२ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात सुनावणी झाली होती. यावेळी यानंतरच्या होणाऱ्या सुनावणीमध्ये पंचगंगा नदी खोऱ्यातील ग्रामपंचायतींनी नदी प्रदूषित होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या, याचा अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेने हा अहवाल मागवला आहे. पंचगंगा नदी ही तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी आणि धामणी या पाच नद्यांपासून बनली आहे. या नदीच्या प्रदूषण निर्मूलनासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू असून, केवळ बैठका, आराखडे यातच खूप कालावधी निघून गेला आहे.या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेने केवळ कोल्हापूर शहर आणि पुढच्या गावांना जबाबदार न धरता पंचगंगेच्या खोऱ्यातील म्हणजे संगमाआधीच्या पाचही नद्या आणि पंचगंगेच्या काठावरील अशा एकूण १८१ गावांना जबाबदार धरले आहे. त्यामुळेच गगनबावडा, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी आणि शिरोळ या सात तालुक्यांतील ज्या ग्रामपंचायतींनी गावातील सांडपाणी, कचरा नदीत जाऊ नये यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यांना या नोटीस काढण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेची चार पत्रेअशा पद्धतीने गावातील सांडपाणी, मैलायुक्त पाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी चार महिन्यांत चार पत्रे काढली होती. त्याची आता ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी केली की नाही, याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

गावातील हॉटेल, मंगल कार्यालय, यात्री निवास, सर्व्हिसिंग सेंटरमधून बाहेर पडणारे पाणी याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे, यासाठीही ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने मार्गदर्शन केले होते. परंतु, अनेक ग्रामपंचायतींनी या पत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. आता किती ग्रामपंचायतींनी पंचगंगा प्रदूषण निर्मूलन करण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले हे आता स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणgram panchayatग्राम पंचायत