शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

समितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 3:28 PM

ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द केली असल्याची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्देसमितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच केला प्रश्न

कोल्हापूर : ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द केली असल्याची घोषणा करण्यात आली.ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक आज मुख्य सचिव संजयकुमार यांनी बोलावली आहे. यावर गुरुवारी शेट्टी यांनी आक्षेप घेत मुख्य सचिवांना पत्र पाठवून बैठक रद्द करा, समिती सदस्य नियुक्तीनंतरच बैठक घ्या अशी विनंती केली. त्यानंतर यंत्रणा वेगाने हलली. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर या बैठकीबाबत चर्चा झाली.एफआरपी कायदा लागू झाल्यापासून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील साखर आयुक्तांसह शेतकरी, साखर कारखानदार प्रतिनिधी यांचा प्रमुख सहभाग असलेली ऊस दर नियंत्रण समितीच गळीत हंगामाचा निर्णय घेते.

गेल्या वर्षी स्थापन झालेली समिती मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आली आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या समितीची स्थापना होणे आवश्यक होते. तथापि, कोरोनामुळे ही समिती अजूनही स्थापन होऊ शकलेली नाही.या वर्षीचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन सरकारने चालविले आहे; पण अजून समितीही नाही आणि बैठकही नाही अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आज बैठकीचे नियोजन केले होते.

शेट्टी यांनी उपस्थित केलेले प्रश्न1. शेतकरी आणि साखर कारखानदार यांचे प्रतिनिधी नसल्याने चर्चा कुणाशी करणार2. थकीत एफआरपीवर निर्णय कोण घेणार3. ७०:३० च्या फॉर्म्युल्यावर काय निर्णय घेणार

अजून अशासकीय सदस्यांची नेमणूक झालेली नसताना केवळ शासकीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परस्पर निर्णय घेणे चुकीचे आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.- राजू शेट्टी, माजी खासदार

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर