शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

पाणी नसल्याने ‘स्वाभिमानी’ने मध्य प्रदेशमध्ये रेल्वे रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:45 IST

संतोष बामणे। लोकमत न्यूज नेटवर्क रतलाम (मध्य प्रदेश) : संसदेला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवी दिल्लीकडे चाललेल्या शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ एक्स्प्रेसमध्ये ...

संतोष बामणे।लोकमत न्यूज नेटवर्करतलाम (मध्य प्रदेश) : संसदेला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवी दिल्लीकडे चाललेल्या शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ एक्स्प्रेसमध्ये बुधवारी रात्रीपासून पाणी, स्वच्छता व सुरक्षा नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. गुरुवारी सकाळी शौचालयासाठीही पाणी नसल्याने संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशमधील रतलाम जंक्शन येथे रेल्वे रोखून आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला.महाराष्ट्रातून बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्वाभिमानीची विशेष रेल्वे मिरज येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. त्यांनतर पाच तास विलंब झाल्याने या रेल्वेत पुणे येथे पाणी भरले नाही. त्यानंतर कल्याण व सुरत येथे रात्री कर्मचारी नसल्याने पाणी भरले नाही. त्यामुळे पहाटेपासूनच रेल्वेत असलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक शेतकºयांना पाण्यामुळे मोठी गैरसोय सोसावी लागली. सुरत रेल्वेस्थानकातही फक्त दोनच बोगीत पाणी भरल्याने अन्य१५ बोगीत अडचण कायम राहिली.अशा परिस्थितीत शेतकºयांना शौलाचालयाला जाण्यासाठीही सकाळी साडेनऊपर्यंत पाणी उपलब्ध न झाल्याने अखेर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रतलाम जंक्शनवर रेल्वे रोखून आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक, राजेंद्र गड्याण्णावर व भगवान काटे यांनी प्रशासनाला जाब विचारला.आंदोलन पाचवीलाच : राजू शेट्टीस्वाभिमानी विशेष रेल्वे प्रासंगिक करार करून दिल्लीच्या आंदोलनाला रेल्वे नेत आहोत. त्यामुळे सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागला. आंदोलन केल्यानंतरच पाणी मिळाले असल्याने आमच्या पाचवीला आंदोलन पुजलेले असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.