शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शेतकरी प्रश्नावर संसदेत बोलण्याची कोणाची हिंमत नाही, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:40 IST

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशासमोर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असताना त्यांच्या प्रश्नांवर विधिमंडळ व संसदेत बोलण्याची कोणामध्ये हिंमत नाही, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्यावतीने गजरौला (उत्तर प्रदेश) किसान-मजदूर स्वाभिमान महापंचायत मेळाव्यात ते बोलत होते. सरदार व्ही. एम. सिंग मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. शेट्टी म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये स्थिर आयात-निर्यात धोरण, संशोधन केंद्रांचे आधुनिकीकरण, किमान हमीभाव कायदा, पायाभूत सुविधा या गोष्टींची कृषी क्षेत्रात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये स्थिरता निर्माण होणार नाही. स्वातंत्र्यावेळी ३४ कोटी जनतेला पोटभर पुरेल एवढे धान्य उत्पादित होत नव्हते. आज जवळपास १५० कोटी जनतेला पुरेल एवढे धान्य उत्पादित करून अनेक उत्पादनांची निर्यात केली जात आहे.अनेक संकटांचा सामना करत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व कच्छपासून ते मेघालयपर्यंत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतातील शेतकऱ्यांच्या खांद्यावर देशाची अर्थव्यवस्था टिकून आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले टॅरिफ वॅार, युद्धजन्य परिस्थिती अशा काळात देशातील १५० कोटी जनतेला दोनवेळ पुरेल एवढे धान्य निर्माण करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशासमोर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी देशभरातील शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.