शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी प्रश्नावर संसदेत बोलण्याची कोणाची हिंमत नाही, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:40 IST

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशासमोर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असताना त्यांच्या प्रश्नांवर विधिमंडळ व संसदेत बोलण्याची कोणामध्ये हिंमत नाही, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्यावतीने गजरौला (उत्तर प्रदेश) किसान-मजदूर स्वाभिमान महापंचायत मेळाव्यात ते बोलत होते. सरदार व्ही. एम. सिंग मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. शेट्टी म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये स्थिर आयात-निर्यात धोरण, संशोधन केंद्रांचे आधुनिकीकरण, किमान हमीभाव कायदा, पायाभूत सुविधा या गोष्टींची कृषी क्षेत्रात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये स्थिरता निर्माण होणार नाही. स्वातंत्र्यावेळी ३४ कोटी जनतेला पोटभर पुरेल एवढे धान्य उत्पादित होत नव्हते. आज जवळपास १५० कोटी जनतेला पुरेल एवढे धान्य उत्पादित करून अनेक उत्पादनांची निर्यात केली जात आहे.अनेक संकटांचा सामना करत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व कच्छपासून ते मेघालयपर्यंत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतातील शेतकऱ्यांच्या खांद्यावर देशाची अर्थव्यवस्था टिकून आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले टॅरिफ वॅार, युद्धजन्य परिस्थिती अशा काळात देशातील १५० कोटी जनतेला दोनवेळ पुरेल एवढे धान्य निर्माण करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशासमोर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी देशभरातील शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.