शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

कितीही छापे टाका सरकार अधिकच घट्ट, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:58 IST

देशातील जनता महागाईमध्ये होरपळत असताना भाजपचे नेते कोठे लपून बसले आहेत?

कोल्हापूर : महिला, दलित आणि झोपडपट्टीतील सामान्य माणसांबद्दल भाजपच्या नेत्यांची वक्तव्य बघितली तर त्यांचा खरा मुखवटा उघडा पडला असून, अशा प्रवृत्तीला घरी पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. देशातील जनता महागाईमध्ये होरपळत असताना भाजपचे नेते कोठे लपून बसले आहेत? अशी विचारणा करीत चंद्रकांत पाटील तुम्ही कितीही छापे टाका हे सरकार अधिकच घट्ट होत आहे. मात्र, या निवडणुकीत शाहू विचार विरोधी भाजपला रोका, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मिरजकर तिकटी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मिरजकर तिकटीचा परिसर खचाखच झाला होता.

जयंत पाटील म्हणाले, राेज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असताना त्यावर चर्चा होत नाही; मात्र धर्मा धर्मात तेढ निर्माण करून भावना भडकविण्याचे काम भाजप करीत आहे. तपास यंत्रणेचा वापर करून समोरच्याला नेस्तानाबूत करायचे, जे कायदे आतंगवाद्यांसाठी बनविले त्याचा वापर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर केला जात आहे. तिन्ही पक्ष एकदिलाने काम करीत असून, या निवडणुकीत भाजपची धुळधाण उडाल्याशिवाय राहणार नाही.

मंत्री बाळासाहेब थाेरात म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठी रोज एका नेत्यांवर छापे टाकत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे. मात्र, चंद्रकांत पाटील तुम्ही कितीही छापे टाका हे सरकार अधिकच घट्ट होत आहे. समतेचा विचार देशाला देणाऱ्या या भूमीत जयश्री जाधव यांना विजयी करून जातीयवाद्याला हद्दपार करा.

उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या, माझ्यावर दुखाचा डोंगर कोसळलेला असताना केवळ कोल्हापूरकरांच्या पाठबळावर उभी आहे. स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी साथ द्या. मी बिचारी नाही, खंबीर आहे, म्हणूनच निवडणुकीत उभी आहे.

माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, समाजात तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजून घेण्याचा काहींचा प्रयत्न आहे, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. लोकशाहीची नीतीमूल्ये पायदळी तुडविणाऱ्या भाजपला जागा दाखवा.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, विजय देवणे, भारती पवार, आदिल फरास, सरलाताई पाटील, दिलीपराव जाधव, मोहन कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

आमदार पी. एन. पाटील, आमदार संग्राम थोपटे, प्रा. जयंत आसगावकर, प्रल्हाद चव्हाण, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, आर. के. पाेवार, आदी उपस्थित होते.

कितीही टीका करा संयमानेच लढणार - पालकमंत्री

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, भाजप विरुद्ध कोल्हापूरचा स्वाभिमान अशीच होत आहे. कोल्हापूरकरांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. माझ्यावर कितीही टीका करा मी संयमानेच लढणार आहे.

काँग्रेस पक्षाने ६० वर्षांत कोल्हापूरसाठी काय केले व तुम्ही पाच वर्षे पालकमंत्री असताना काय केले, याचा लेखाजोखा मांडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावे. तारीख व वेळ तुम्ही द्या, असे आव्हान सतेज पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपा