शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कितीही छापे टाका सरकार अधिकच घट्ट, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:58 IST

देशातील जनता महागाईमध्ये होरपळत असताना भाजपचे नेते कोठे लपून बसले आहेत?

कोल्हापूर : महिला, दलित आणि झोपडपट्टीतील सामान्य माणसांबद्दल भाजपच्या नेत्यांची वक्तव्य बघितली तर त्यांचा खरा मुखवटा उघडा पडला असून, अशा प्रवृत्तीला घरी पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. देशातील जनता महागाईमध्ये होरपळत असताना भाजपचे नेते कोठे लपून बसले आहेत? अशी विचारणा करीत चंद्रकांत पाटील तुम्ही कितीही छापे टाका हे सरकार अधिकच घट्ट होत आहे. मात्र, या निवडणुकीत शाहू विचार विरोधी भाजपला रोका, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मिरजकर तिकटी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मिरजकर तिकटीचा परिसर खचाखच झाला होता.

जयंत पाटील म्हणाले, राेज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असताना त्यावर चर्चा होत नाही; मात्र धर्मा धर्मात तेढ निर्माण करून भावना भडकविण्याचे काम भाजप करीत आहे. तपास यंत्रणेचा वापर करून समोरच्याला नेस्तानाबूत करायचे, जे कायदे आतंगवाद्यांसाठी बनविले त्याचा वापर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर केला जात आहे. तिन्ही पक्ष एकदिलाने काम करीत असून, या निवडणुकीत भाजपची धुळधाण उडाल्याशिवाय राहणार नाही.

मंत्री बाळासाहेब थाेरात म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठी रोज एका नेत्यांवर छापे टाकत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे. मात्र, चंद्रकांत पाटील तुम्ही कितीही छापे टाका हे सरकार अधिकच घट्ट होत आहे. समतेचा विचार देशाला देणाऱ्या या भूमीत जयश्री जाधव यांना विजयी करून जातीयवाद्याला हद्दपार करा.

उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या, माझ्यावर दुखाचा डोंगर कोसळलेला असताना केवळ कोल्हापूरकरांच्या पाठबळावर उभी आहे. स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी साथ द्या. मी बिचारी नाही, खंबीर आहे, म्हणूनच निवडणुकीत उभी आहे.

माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, समाजात तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजून घेण्याचा काहींचा प्रयत्न आहे, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. लोकशाहीची नीतीमूल्ये पायदळी तुडविणाऱ्या भाजपला जागा दाखवा.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, विजय देवणे, भारती पवार, आदिल फरास, सरलाताई पाटील, दिलीपराव जाधव, मोहन कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

आमदार पी. एन. पाटील, आमदार संग्राम थोपटे, प्रा. जयंत आसगावकर, प्रल्हाद चव्हाण, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, आर. के. पाेवार, आदी उपस्थित होते.

कितीही टीका करा संयमानेच लढणार - पालकमंत्री

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, भाजप विरुद्ध कोल्हापूरचा स्वाभिमान अशीच होत आहे. कोल्हापूरकरांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. माझ्यावर कितीही टीका करा मी संयमानेच लढणार आहे.

काँग्रेस पक्षाने ६० वर्षांत कोल्हापूरसाठी काय केले व तुम्ही पाच वर्षे पालकमंत्री असताना काय केले, याचा लेखाजोखा मांडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावे. तारीख व वेळ तुम्ही द्या, असे आव्हान सतेज पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपा