शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

मोक्का कितीही लावला तरी गुन्हेगारी नाही लगाम... इचलकरंजीत पोलिसांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:11 PM

राजाराम पाटील । इचलकरंजी : तब्बल दहा टोळ्यांना मोक्का लागूनही पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याने वस्त्रनगरी धास्तावली आहे. ...

ठळक मुद्देनवीन गुन्हेगारांना आवर घालण्याचे कायद्याचा वचक नसल्याचे चित्रवाढलेल्या नवीन उद्योगांच्या वसाहतींमध्ये गुन्हेगारी वाढत चालली.

राजाराम पाटील ।इचलकरंजी : तब्बल दहा टोळ्यांना मोक्का लागूनही पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याने वस्त्रनगरी धास्तावली आहे. बहुतांशी सराईत गुंड गजाआड आहेत, तर तीन पोलिस ठाणी, उपअधीक्षक व अतिरिक्त अधीक्षकांची कार्यालये असूनसुद्धा गुन्हेगारीचा उपद्रव वाढतच आहे. अशा स्थितीत नवीन गुन्हेगारांना आवर घालण्याचे पोलिसांसमोर तगडे आव्हान आहे.

शहरामध्ये यापूर्वी दोन पोलीस ठाणी असताना शहापूर, तारदाळ, खोतवाडी, यड्राव, कोरोची अशा उत्तरेकडील ग्रामीण भागांमध्ये, पण वाढलेल्या नवीन उद्योगांच्या वसाहतींमध्ये गुन्हेगारी वाढत चालली. त्यामुळे त्या परिसरात नव्याने शहापूर पोलीस ठाण्याची निर्मिती केली. अशा स्थितीत गुन्हेगारीचे वाढते स्वरुप आणि गंभीर गुन्ह्यांचा वाढत जाणारा आलेख पाहता इचलकरंजी शहरातील एकापाठोपाठ एक याप्रमाणे तब्बल दहा टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली. त्यापैकी एका टोळीवर दुहेरी मोक्का लागला आहे.

अशा पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्याकडून स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली. स्थानिक पोलिसांबरोबरच या पथकाकडूनसुद्धा गंभीर गुन्ह्यांची दखल घेत वारंवार कारवाई केली जाते. मात्र, अद्यापही काही उद्योजक आणि विशेषत: परप्रांतीय कामगारांचा पाठलाग करून त्यांना लुटणे, चेन स्नॅचिंग, मारामारी, टोळीचे वर्चस्व गाजविण्यासाठी खुनासारखे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक देवघेवीवरून होणारे खून यांचेही स्वरुप अलीकडील काळात वाढत चालले आहे.

नव्याने गुन्हे घडण्याच्या प्रकारामध्ये नवीन तरुणांचा भरणा अधिक दिसून येत आहे. यापूर्वी कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंद नसताना अचानकपणे हाफ मर्डर, मर्डरसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही तरुणांचा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये अवघ्या २० ते २५ वयोगटांतील तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. ज्यामुळे वस्त्रनगरीत नवनवीन टोळ्या पुन्हा उदयास येत असल्याचे निदर्शनास येत आहे आणि यांनाच आवर घालण्याचे काम पोलिसांना करावयाचे आहे..अल्पवयीनांच्या सहभागाची चिंताखून किंवा गंभीररित्या दुखापतीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत चालला आहे. त्यामुळे ज्या परिस्थितीत नवनवीन मुले गुन्हेगारीमध्ये दाखल होत आहेत. त्याचा अभ्यास करून पोलिसांनी अशा मुलांबरोबरच त्यांच्या पालकांच्याही वर्तणुकीवर लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: स्वत:चे कामधंदे अथवा रोजगार उपलब्ध करून घेण्याच्या वयात त्यांना वाईट वळण लागत आहे. अशा स्थितीत मुलांना समुपदेशनाची गरज असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.बेरोजगारीमुळे तरुण वाममार्गाकडेवरर्षभरामध्ये तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तेरा खून, वीस खुनाचे प्रयत्न, ५२ गंभीर मारहाणे आणि वीसहून अधिक गर्दी मारामारीचे प्रकार घडले आहेत. अलीकडील तीन-चार वर्षांमध्ये वस्त्रोद्योगामध्ये असलेली मंदी आणि त्यामुळे बंद पडत चाललेले उद्योगधंदे यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून हाताला काम नसल्याने तरुणवर्ग गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याबद्दलची चर्चा शहर व परिसरात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे