शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:22 IST

नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत उद्या (मंगळवारी) बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोल्हापूर/अमरावती : ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणामध्ये शासनाने कुठलाही थेट आदेश दिलेला नाही. मात्र, नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत उद्या (मंगळवारी) बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘महादेवी’ प्रकरणीही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुळात हा शासनाचा निर्णय नाही. प्राण्यांविषयी काम करणारे कार्यकर्ते आणि संबंधित मठ यांच्यात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. यासाठी उच्च न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती नेमली. त्यांनी या  हत्तिणीला अभयारण्यामध्ये सोडण्याची सूचना केली. त्यानुसार उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला आणि महाराष्ट्रात असे अभयारण्य नसल्याने ‘वनतारा’मध्ये हत्तिणीला ठेवण्याचा निर्णय त्यांनी दिला. त्यानुसार हत्तिणीला तिकडे नेले. फक्त न्यायालयीन कामकाजासाठी वन विभागाचा आवश्यक अहवाल तेवढा देण्यात आला होता. बाकी कुठेही यामध्ये शासनाची भूमिका नाही. परंतु, नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना या हत्तिणीमध्ये गुंतल्या आहेत.  

कोल्हापुरात सर्वधर्मीय रस्त्यावर नांदणी (ता.शिरोळ) येथील मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण परत द्या, अशी हाक देत, नांदणी ते कोल्हापूर मूक मोर्चात सर्वधर्मीय हजारो नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. ‘एक रविवार महादेवीसाठी’ असे म्हणत लहान मुले, वयोवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. ‘महादेवी’ला परत आणूनच गप्प बसू, असा इशारा देत मोर्चा कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदणी मठातील ‘महादेवी’ हत्तीण गुजरात येथील ‘वनतारा’ येथे नेल्यानंतर शिरोळ तालुक्यातून त्या विरोधात उठाव सुरू झाला. पहाटे साडेपाच वाजता नांदणी मठातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. साधारणत: साडेतीन वाजता मोर्चा कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.     छाया : नसीर अत्तार 

टॅग्स :VantaraवनताराState Governmentराज्य सरकारkolhapurकोल्हापूर