शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

‘सं. गीता गाती ज्ञानेश्वर’ने केला अपेक्षाभंग --राज्य नाट्य स्पर्धा

By admin | Updated: January 30, 2015 23:16 IST

पार्श्वगायन विस्मयकारी : नांदीनंतर नाटक रंगलेच नाही...

महाराष्ट्र शासन आयोजित ५४व्या मराठी संगीत नाट्य स्पर्धेत सं. गीता गाती ज्ञानेश्वर हे अकरावे नाटक सादर झाले. काही अपरिहार्य कारणामुळे कल्याणच्या ‘अश्वमेध’ या संस्थेने हे नाटक २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सादर केले. या नाटकामध्ये मुक्ताईच्या भूमिकेसाठी पार्श्वगायिका वापरण्यात आली. हे या नाटकाचे अपेक्षित नसलेले वेगळेपण. नाटकाची सुरुवात ‘विश्वनाट्य सूत्रधार’ या नांदीने झाली. अनघा देशपांडे (मुक्ताई) या गायक कलाकार नसतानाही त्यांना केवळ अभिनयाच्या जोरावर मुक्ताईची भूमिका देण्यात आली. त्यामुळे गवळण म्हणून सादर झालेले ‘काय सांगू, तू ते,’ हे पहिलेच पद पूर्णपणे स्वराबाहेर गायले गेले. त्यांना आदिनाथ पातकर (आॅर्गनवादक) यांनी पहिली ओळ पूर्णपणे वाजवून दाखविली, तरीही त्यांना शेवटपर्यंत सूर सापडला नाही. त्यांच्याबरोबर त्यावेळी रंगमंचावर मंदार खटावकर (सोपानदेव) होते. त्यांनी स्वत: पद म्हणून अनघा देशपांडे यांना सुरावर आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण, सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. मुक्ताईच्या तोंडी नाटकामध्ये ३ ते ४ महत्त्वाची पदे असताना दिग्दर्शकाने गायिका अभिनेत्रीची निवड करायला हवी होती. पार्श्वगायिका वापरण्याची परंपरा, प्रथा, संगीत नाटकात नाही. त्यामुळे हे नाटक स्पर्धेच्या नियमात बसत नसल्याचे काही जाणकार रसिकांनी सांगितले. नाटकासाठी पार्श्वसंगीत खूप लाऊड स्वरुपात वापरले. काही कलाकारांचे शब्द अडखळले. या नाटकामध्ये संदीप राऊत (वासुदेव) यांनी दर्जेदार वासुदेव रंगविला. चिपळ्या, टाळ, डोक्यावरील फिरणारी टोपी, पायात चाळ हे सर्व सांभाळून त्यांनी जी पदे गायली ती थक्क करणारी होती. नाचताना होणारा पदन्यास लाजवाब होता. सुनील जोशी (विसोबा) यांचाही अभिनय दर्जेदार होता. सर्वच कलाकारांनी भूमिकेला अनुसरून आणलेले चेहऱ्यावरचे भाव वाखाणण्याजोगे होते. अभय करंदीकर (ज्ञानेश्वर) यांनी अभिनयाबरोबर पदांनाही चांगला न्याय दिला. अनघा देशपांडे (मुक्ताई) यांनी गायन सोडून अभिनयात मात्र चांगले कौशल्य दाखविले. ‘ट्रीकसिन्स’ हे या नाटकाचे वैशिष्ट्य होते. मोगऱ्याचे क्षणार्धात बहरलेले झाड, ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजलेले मांडे, वासुदेवाची फिरणारी टोपी, समाधीमधून ज्ञानेश्वरांनी दिलेले दर्शन, ज्ञानेश्वरांच्या गळ्यात पडलेले हार, आशीर्वाद देणारे विठ्ठल-रखुमाई, रेड्यामुखी वदवलेले वेद यामुळे नाटकाने एक वेगळी उंची गाठली. आदिनाथ पातकर (आॅर्गन) यांनी उत्तम आॅर्गनसाथ केली. निखिल अवसरीकर (तबला) यांनीही समर्पक तबलासाथ केली. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना सारे उत्तम होते. नाटकात प्रथमेश तारळकर या रत्नागिरीच्या पखवाज वादक कलाकाराने आयत्यावेळी समर्पक पखवाज साथ केली. दिग्दर्शक सुनील जोशी यांनी समर्थ दिग्दर्शन केले. पार्श्वगायनाचा वापर झाल्यामुळे या नाटकाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्पर्धेत उतरताना दिग्दर्शक व सादरकर्ते यांनी याचे भान ठेवावे.संध्या सुर्वे