शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक: जेवणावळीचा जोर..पैसे पोच; सगळ झालं पण आम्ही नाही पाहिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 12:17 IST

मतदानासाठी एक रात्र राहिली असताना मतदारसंघातल्या कुटुंबांना पक्षांकडून ठरावीक रक्कम पोहोच झाली, पंगतीच्या पंगती उठल्या. आचारसंहितेची पुरती वाट लागली तरी भरारी पथकाकडून एकावरही कारवाई झालेली नाही.

इंदुमती गणेश

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत मतदारराजासाठी जेवणावळी उठल्या, मिसळ पावच्या कटाने ढेकर दिला, बावड्यात मतदानाला लागतात तशा किराणा दुकानांसमोर रांगा लागल्या, एक ते तीन हजारपर्यंतची पाकिटे घरपोहोच झाली; पण आम्ही नाही पाहिले अशी आचारसंहिता, भरारी पथक, निरीक्षक पथकांची स्थिती राहिली.

मतदानासाठी एक रात्र राहिली असताना मतदारसंघातल्या कुटुंबांना पक्षांकडून ठरावीक रक्कम पोहोच झाली, पंगतीच्या पंगती उठल्या. आचारसंहितेची पुरती वाट लागली तरी भरारी पथकाकडून एकावरही कारवाई झालेली नाही. शेवटच्या दिवशी जे काही गुन्हे दाखल झाले त्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांनीच सापळे रचून पकडले होते, पथकाने फिर्यादीची भूमिका बजावली.

निवडणुकीत ईडीची धमकी दाखवण्यापासून ते पाकिटे-आमिषांची घोषणाबाजी झाली. मताला १ ते ३ हजार रुपयांपर्यंतचा दर निघाला. सोमवारी सगळ्या मतदारांच्या घरी पाकिटं पोहोच झाली आहेत. कधीही न पाहिलेली माणसं आपल्या घरात माणसं किती, किती जणांचे मतदान आहे हे विचारून प्रत्येकी पाकिटे देऊन मिनिटात निघून गेली.

प्रत्येक सभेला गर्दी करण्यासाठी माणसं बोलावली गेली, त्यांचा दिवसभराचा सगळा खर्च करण्यात आला. गेल्या दहा दिवसांत जेवणावळी तर रोजच होती. पेठांमध्ये तर स्टीलच्या पिंपातून तांबडा-पांढरा रस्सा आठवडाभर वाटला जात होता. स्वत: बोलावून पंगत उठवण्याचे दिवस आता गेले. हातात एक कुपन पडले की ठरलेल्या हॉटेलमध्ये कुपन दाखवून जेवून जायचे अशीही सोय केली.

हे सगळं कोल्हापूर उत्तरमध्ये घडत असताना जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या भरारी पथकांना, स्थिर सर्वेक्षण पथकाला एकही प्रकार निदर्शनास आला नाही. एवढ्या दिवसात जेवणावळी, पाकिटं, आचारसंहितेचा भंग झालेली एकही तक्रार पथकांनी दाखल केली नाही की संबंधितांवर कारवाई केली नाही. शेवटच्या दिवशी पैसे वाटल्याबद्दल जे काही गुन्हे दाखल झाले, ते प्रकारदेखील कार्यकर्त्यांनीच उघडकीस आणले, भरारी पथकांनी फक्त फिर्यादीची भूमिका बजावली.

तुम्हीच सांगा..

निवडणुकीत काही गैर घडत असल्यास मतदारांनीच प्रशासनाकडे तक्रार करावी, मतदारच आमचे कान आणि डोळे आहेत, मग आम्ही गुन्हा दाखल करू, अशी भूमिका निवडणूक यंत्रणेने घेतली.

यंत्रणा अनभिज्ञ...

या निवडणुकीवर वॉच ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने ८ भरारी पथके, ८ स्थिर सर्वेक्षण पथके, ३ व्हिडिओ पाहणी टीम, १ व्हिडिओ सर्वेक्षण टीम अशी वेगवेगळी पथके नेमली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात नियुक्त असलेल्या यंत्रणेला एकही गैरप्रकार एवढ्या दिवसांत दिसला नाही. या पथकांनी नेमके काय काम केले हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्यावरील खर्चही वायाच गेला.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा