शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘नगरोत्थान’चे नऊ कोटी अडकले टक्केवारीत

By admin | Updated: January 23, 2015 00:40 IST

प्रशासनाचा कारभार : महापालिकेसह कागल, वडगाव, ंमुरगूड नगरपालिकांची निधी

विश्वास पाटील - कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून मंजूर केलेला सुमारे नऊ कोटींचा निधी नगरपालिका प्रशासनाने अडवून ठेवला आहे. हा निधी कंत्राटदारांकडून एक टक्का रक्कम मिळावी यासाठी रोखून ठेवल्याची तक्रार आहे. महापालिका व संबंधित नगरपालिकांनी निधीचे वापर प्रमाणपत्र (युटिलायझेशन सर्टिफिकेट) न दिल्यानेच हा निधी त्यांना वितरित केला नसल्याचे या कार्यालयाचे म्हणणे आहे. जिल्हा नियोजन मंडळाची उद्या, शुक्रवारी बैठक होत आहे. त्यामध्ये यावर चर्चेची शक्यता आहे.राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेसाठी जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून २०१३-१४ साली १४ कोटी ५० लाख व २०१४-१५ साठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याचा पहिल्या वर्षाचा ५७ लाखांचा निधी व दुसऱ्या वर्षाचा ४ कोटी ९९ लाख ९६ हजार ३५७ रुपयांचा निधी शासनाने वितरित केला. जिल्हा नियोजन विभागाकडून २०१४-१५ योजनेचे ६ कोटी ५० लाख रुपये १९ मे २०१४ रोजी नगरपालिका प्रशासनाकडे वितरित केले. उर्वरित सर्व निधी ११ नोव्हेंबर २०१४ च्या आदेशान्वये वितरित केला. या निधीपैकी ८ कोटी ९० लाख ८ हजार ९५० रुपये नगरपालिका प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हा कोषागार कार्यालयातून काढले आहेत; परंतु ही रक्कम महापालिका व संबंधित तीन नगरपालिकांना आज अखेर मिळालेली नाही. ही रक्कम जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) यांच्या आहरण आणि वितरण (डीडीओ) खात्यावर पडून आहे. याचा अर्थ कोषागार खात्यातून रक्कम काढून २३ दिवस झाले, तरी ती वितरित करण्यात आलेली नाही. आता नगरपालिका प्रशासन म्हणते की, महापालिकेने निधीचे वापर प्रमाणपत्र दिले नाही म्हणून निधी वितरित केलेला नाही. ते खरे असले, तरी मग निधी वितरित करायचा नसताना तो कोषागार कार्यालयातून काढला तरी का? हा प्रश्न शिल्लक राहतोच. तरीही ही रक्कम आज २३ दिवस जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या खात्यावर पडून आहे. गावस्तरावर बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून बालकांकरिता सामाजिक सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. या समित्या २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन स्थापन करावयाच्या आहेत. संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या गावातील बालकांच्या सुरक्षा व विकासाला प्राधान्य देऊन याबाबतचा ठराव २६ जानेवारीच्या ग्रामसभेत घेऊन ग्राम बालसंरक्षण समिती स्थापन करावी, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी शकील शेख यांनी केले आहे.