शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

‘नगरोत्थान’चे नऊ कोटी अडकले टक्केवारीत

By admin | Updated: January 23, 2015 00:40 IST

प्रशासनाचा कारभार : महापालिकेसह कागल, वडगाव, ंमुरगूड नगरपालिकांची निधी

विश्वास पाटील - कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून मंजूर केलेला सुमारे नऊ कोटींचा निधी नगरपालिका प्रशासनाने अडवून ठेवला आहे. हा निधी कंत्राटदारांकडून एक टक्का रक्कम मिळावी यासाठी रोखून ठेवल्याची तक्रार आहे. महापालिका व संबंधित नगरपालिकांनी निधीचे वापर प्रमाणपत्र (युटिलायझेशन सर्टिफिकेट) न दिल्यानेच हा निधी त्यांना वितरित केला नसल्याचे या कार्यालयाचे म्हणणे आहे. जिल्हा नियोजन मंडळाची उद्या, शुक्रवारी बैठक होत आहे. त्यामध्ये यावर चर्चेची शक्यता आहे.राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेसाठी जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून २०१३-१४ साली १४ कोटी ५० लाख व २०१४-१५ साठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याचा पहिल्या वर्षाचा ५७ लाखांचा निधी व दुसऱ्या वर्षाचा ४ कोटी ९९ लाख ९६ हजार ३५७ रुपयांचा निधी शासनाने वितरित केला. जिल्हा नियोजन विभागाकडून २०१४-१५ योजनेचे ६ कोटी ५० लाख रुपये १९ मे २०१४ रोजी नगरपालिका प्रशासनाकडे वितरित केले. उर्वरित सर्व निधी ११ नोव्हेंबर २०१४ च्या आदेशान्वये वितरित केला. या निधीपैकी ८ कोटी ९० लाख ८ हजार ९५० रुपये नगरपालिका प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हा कोषागार कार्यालयातून काढले आहेत; परंतु ही रक्कम महापालिका व संबंधित तीन नगरपालिकांना आज अखेर मिळालेली नाही. ही रक्कम जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) यांच्या आहरण आणि वितरण (डीडीओ) खात्यावर पडून आहे. याचा अर्थ कोषागार खात्यातून रक्कम काढून २३ दिवस झाले, तरी ती वितरित करण्यात आलेली नाही. आता नगरपालिका प्रशासन म्हणते की, महापालिकेने निधीचे वापर प्रमाणपत्र दिले नाही म्हणून निधी वितरित केलेला नाही. ते खरे असले, तरी मग निधी वितरित करायचा नसताना तो कोषागार कार्यालयातून काढला तरी का? हा प्रश्न शिल्लक राहतोच. तरीही ही रक्कम आज २३ दिवस जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या खात्यावर पडून आहे. गावस्तरावर बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून बालकांकरिता सामाजिक सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. या समित्या २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन स्थापन करावयाच्या आहेत. संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या गावातील बालकांच्या सुरक्षा व विकासाला प्राधान्य देऊन याबाबतचा ठराव २६ जानेवारीच्या ग्रामसभेत घेऊन ग्राम बालसंरक्षण समिती स्थापन करावी, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी शकील शेख यांनी केले आहे.