शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

बहुजनांनी साधनसंपत्तीतील वाटा मागावा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:52 IST

कोल्हापूर : देशातील नव्वद टक्के साधनसंपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे. यामुळे सर्व बहुजनांवर संकट येत आहे. मोठमोठ्या ...

कोल्हापूर : देशातील नव्वद टक्के साधनसंपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे. यामुळे सर्व बहुजनांवर संकट येत आहे. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानामुळे लाखो कामगारांना बेरोजगार व्हावे लागणार आहे. भविष्यात नवीन नोकऱ्या, तसेच रोजगार संधी उपलब्ध होणार नाहीत. सरकारी मालकीचे सर्वच उद्योग सत्ताधारी खासगी लोकांना विकत आहेत. या गोष्टींकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी धर्माधर्मांत, जाती-जातीविरोधात लढवले जात आहे. म्हणून सजग बहुजनांनी साधनसंपत्तीतील आपला वाटा मागण्यासाठी लढा उभारायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांनी मंगळवारी येथे केले.बळीराजा महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. विद्रोही चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ.माधुरी सुदाम चौगुले, शाहीर रंगराव पाटील आणि चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडिया यांचा डॉ. मेणसे यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. तिघांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दलित मित्र साथी व्यंकाप्पा भोसले, शाहीरभूषण राजू राऊत यांचाही सत्कार करण्यात झाला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.डॉ.मेणसे म्हणाले की, सरकारने नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण बंदी सुरू केली आहे. जे प्राथमिक शिक्षण या भूमीत लोकराजा राजर्षी शाहूंनी सक्तीचे आणि मोफत केले होते. त्याच ठिकाणी सरकार सर्व प्रकारचे शिक्षण खासगी लोकांच्या हाती देत आहे. उठता बसता शिवशाही फुले आंबेडकर यांचे नाव घेणारे सत्ताधारी आपले शिक्षणच बंद करीत आहेत. पुन्हा एकदा बहुजनांना गुलाम करण्याची षडयंत्र आखले जात आहे.महोत्सवाची सुरवात मिरजकर तिकटी येथून सजीव बळीराजाची भव्य मिरवणूक पारंपरिक पद्धतीने धनगरी ढोल, लेझीम पथक व शेकडो माता-भगिनी, बांधवांच्या सहभागाने सुरू झाली. ‘ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..!’ अशा घोषणा देत मिरवणूक गंगावेशमधील शाहू सत्यशोधक समाजाच्या दारात उभारलेल्या महात्मा जोतिराव फुले सभागृहात विसर्जित झाली. कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या पायाने दुष्ट वामनाला पाताळात गाढून झाली.महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पोवार म्हणाले, “बळीराजा महोत्सव हा लोकोत्सव करण्यासाठी आगामी काळात अनेक सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविणार आहे. पुढील वर्षाच्या बळीराजा महोत्सव समितीत युवकांचा खूपच मोठा सहभाग असणार आहे. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बाबूराव कदम यांनी स्वागत केले. समितीचे सचिव दिगंबर लोहार यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ.टी.एस्.पाटील यांनी परिचय करून दिला. शफिक देसाई यांनी सूत्रसंचलन केले. रवी जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर