शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बहुजनांनी साधनसंपत्तीतील वाटा मागावा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:52 IST

कोल्हापूर : देशातील नव्वद टक्के साधनसंपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे. यामुळे सर्व बहुजनांवर संकट येत आहे. मोठमोठ्या ...

कोल्हापूर : देशातील नव्वद टक्के साधनसंपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे. यामुळे सर्व बहुजनांवर संकट येत आहे. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानामुळे लाखो कामगारांना बेरोजगार व्हावे लागणार आहे. भविष्यात नवीन नोकऱ्या, तसेच रोजगार संधी उपलब्ध होणार नाहीत. सरकारी मालकीचे सर्वच उद्योग सत्ताधारी खासगी लोकांना विकत आहेत. या गोष्टींकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी धर्माधर्मांत, जाती-जातीविरोधात लढवले जात आहे. म्हणून सजग बहुजनांनी साधनसंपत्तीतील आपला वाटा मागण्यासाठी लढा उभारायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांनी मंगळवारी येथे केले.बळीराजा महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. विद्रोही चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ.माधुरी सुदाम चौगुले, शाहीर रंगराव पाटील आणि चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडिया यांचा डॉ. मेणसे यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. तिघांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दलित मित्र साथी व्यंकाप्पा भोसले, शाहीरभूषण राजू राऊत यांचाही सत्कार करण्यात झाला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.डॉ.मेणसे म्हणाले की, सरकारने नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण बंदी सुरू केली आहे. जे प्राथमिक शिक्षण या भूमीत लोकराजा राजर्षी शाहूंनी सक्तीचे आणि मोफत केले होते. त्याच ठिकाणी सरकार सर्व प्रकारचे शिक्षण खासगी लोकांच्या हाती देत आहे. उठता बसता शिवशाही फुले आंबेडकर यांचे नाव घेणारे सत्ताधारी आपले शिक्षणच बंद करीत आहेत. पुन्हा एकदा बहुजनांना गुलाम करण्याची षडयंत्र आखले जात आहे.महोत्सवाची सुरवात मिरजकर तिकटी येथून सजीव बळीराजाची भव्य मिरवणूक पारंपरिक पद्धतीने धनगरी ढोल, लेझीम पथक व शेकडो माता-भगिनी, बांधवांच्या सहभागाने सुरू झाली. ‘ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..!’ अशा घोषणा देत मिरवणूक गंगावेशमधील शाहू सत्यशोधक समाजाच्या दारात उभारलेल्या महात्मा जोतिराव फुले सभागृहात विसर्जित झाली. कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या पायाने दुष्ट वामनाला पाताळात गाढून झाली.महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पोवार म्हणाले, “बळीराजा महोत्सव हा लोकोत्सव करण्यासाठी आगामी काळात अनेक सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविणार आहे. पुढील वर्षाच्या बळीराजा महोत्सव समितीत युवकांचा खूपच मोठा सहभाग असणार आहे. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बाबूराव कदम यांनी स्वागत केले. समितीचे सचिव दिगंबर लोहार यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ.टी.एस्.पाटील यांनी परिचय करून दिला. शफिक देसाई यांनी सूत्रसंचलन केले. रवी जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर