शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पहिल्याच दिवशी महालक्ष्मीमधून नऊशेजणांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:00 IST

Railway Kolhapur- कोरोना महामारीनंतर तब्बल दहा महिने सहा दिवसांनंतर महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी पावणे नऊ वाजता शाहू छत्रपती टर्मिनन्स कोल्हापूर स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी नऊशेहून अधिक प्रवाशांनी या रेल्वेचे आरक्षण केले होते.

ठळक मुद्दे पहिल्याच दिवशी महालक्ष्मीमधून नऊशेजणांचा प्रवास तब्बल दहा महिन्यांनंतर सुरू

कोल्हापूर : कोरोना महामारीनंतर तब्बल दहा महिने सहा दिवसांनंतर महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी पावणे नऊ वाजता शाहू छत्रपती टर्मिनन्स कोल्हापूर स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी नऊशेहून अधिक प्रवाशांनी या रेल्वेचे आरक्षण केले होते.गेले दहा महिन्यांपासून बंद असलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी. याकरिता कोल्हापुरातील प्रवासी संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली होती. प्रत्येक वेळी रेल्वे प्रशासनाकडून केंद्राने दिलेल्या एसओपीप्रमाणे रेल्वे गाड्या सुरू करता येत नाहीत, असे उत्तर दिले जात होते.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी केंद्राशी पत्रव्यवहार करून अखेर ही गाडी सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाकडून संमती मिळवली. यापूर्वी मध्य रेल्वेकडून कोल्हापूर-मुंबई लोहमार्गावर कोयना, महाराष्ट्र एक्स्प्रेस या दोन गाड्या सुरू झाल्या आहेत.

सोमवारी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या दीर्घ कालावधीनंतरच्या पहिल्याच फेरीचे उद्‌घाटन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी श्रीफळ वाढवून व बोगीस पुष्पहार अर्पण करून केले. उद्या, बुधवारपासून कोल्हापूर-तिरुपती मार्गावरील हरिप्रिया ही रेल्वेगाडीही सुरू होत आहे. तिच्याही आरक्षणास कोल्हापूर, सांगली, मिरज, आदी ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही रेल्वे गाडीही तिरुपतीहून सोमवारी कोल्हापूरकडे येण्यास निघाली असून ती मंगळवारी कोल्हापुरातील शाहू छत्रपती टर्मिनन्स रेल्वेस्थानकात पोहोचणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर