शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली प्रकल्पग्रस्तांची फरपट: तीन हक्क.. तीन पिढ्यां..अन तीस वर्षे आंदोलनातच; जमीन वाटपाकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 18:43 IST

जैनापूरच्या धर्तीवर अन्य बारा वसाहतीमधून पाण्याची योजना राबविणे गरजेचे

आर.एस.लाडआंबा : चांदोली प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी पासष्ट टक्के रक्कम भरून घेतली असताना शेतजमीन वाटपा पासून ते वसाहतीमधील सुविधांच्या पूर्तते कडे वनविभाग व पुनर्वसन विभाग डोळेझाक करीत आहे. शेती व घर मिळावे, पाणी पदरी पडावं, वसाहतीमध्ये अठरा नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून एकीकडे आंदोलन करायचे नि मंजुरी मिळवायची. त्यानंतर मिळवलेला हक्क पदरी पाडण्यासाठी टेबला खालून हात ओले करायचे हा कुठला न्याय असा प्रश्न विचारला जात आहे. गेंड्याची कातडी घातलेले फाटक्या प्रकल्पग्रस्थाकडून पैशाची अपेक्षा ठेवताच कसे याचे आश्चर्य वाटते.श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कार्याध्यक्ष‌ डॉ.संपत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतीच्या मार्गाने आंदोलनाची धग पेटवत ठेवली आहे.धरणची भिंती ताब्यात घेण्यापासून सुरू झालेले आंदोलन जिल्हा कार्यालय वरील मोर्चे, लोकप्रतिनिधी घेराव, धरण ते मंत्रालय अशी पायपीट, मंत्र्यासोबतचे धोरणात्मक निर्णय, ऐन पूरात पूर्णतः दोनशे दिवसाचा ठिय्या. असे सनदशीर मार्गाने लढून पदरी हक्क मिळत नसेल तर पुन्हा मूळ गावात जगणे सुरू करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्थांनी केला आहे.जैनापूरच्या धर्तीवर अन्य बारा वसाहतीमधून पाण्याची योजना राबविणे गरजेचे आहे. सन १९९७पासून प्रती कुटुंब चारशे रूपये निर्वाह भत्ता दिला जातो.त्यानंतर महागाई किती पटीने वाढली यांचा विचार करून तीन हजार रूपये भत्ता मिळावा अशी मागणी प्रकल्पग्रस्थांतून होत आहे.आंदोलनातून धोरणात्मक मंत्रालय स्तरावर निर्णय होतात. पण पुर्नवसन व तालूका स्तरावर अमंलबजावणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या जातात.अशी खंत भारत पाटणकर यांनी व्यक्त केली.

ग्यानबाची मेखपुर्नवसन प्रक्रीयेत संकलन दूरूस्ती रेंगाळल्याने पुनर्वसनाचे घोडे अडले आहे.ही मुख्य दूरूस्ती संबंधीत विभाग टाळत आहे.हिच खरी ग्यानबाची मेख आहे. संकलन दूरूस्ती झाली तर पुनर्वसनाच्या अनुषंगाने असणारे प्रश्न आपोआप सुटणार आहेत. कुटूंबनिहाय संकलन पूर्ण करून याचा सोक्षमोक्ष करणारा अधिकारी भेटला तर मूळ गावी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना रोखता येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगली