शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चांदोली प्रकल्पग्रस्तांची फरपट: तीन हक्क.. तीन पिढ्यां..अन तीस वर्षे आंदोलनातच; जमीन वाटपाकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 18:43 IST

जैनापूरच्या धर्तीवर अन्य बारा वसाहतीमधून पाण्याची योजना राबविणे गरजेचे

आर.एस.लाडआंबा : चांदोली प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी पासष्ट टक्के रक्कम भरून घेतली असताना शेतजमीन वाटपा पासून ते वसाहतीमधील सुविधांच्या पूर्तते कडे वनविभाग व पुनर्वसन विभाग डोळेझाक करीत आहे. शेती व घर मिळावे, पाणी पदरी पडावं, वसाहतीमध्ये अठरा नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून एकीकडे आंदोलन करायचे नि मंजुरी मिळवायची. त्यानंतर मिळवलेला हक्क पदरी पाडण्यासाठी टेबला खालून हात ओले करायचे हा कुठला न्याय असा प्रश्न विचारला जात आहे. गेंड्याची कातडी घातलेले फाटक्या प्रकल्पग्रस्थाकडून पैशाची अपेक्षा ठेवताच कसे याचे आश्चर्य वाटते.श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कार्याध्यक्ष‌ डॉ.संपत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतीच्या मार्गाने आंदोलनाची धग पेटवत ठेवली आहे.धरणची भिंती ताब्यात घेण्यापासून सुरू झालेले आंदोलन जिल्हा कार्यालय वरील मोर्चे, लोकप्रतिनिधी घेराव, धरण ते मंत्रालय अशी पायपीट, मंत्र्यासोबतचे धोरणात्मक निर्णय, ऐन पूरात पूर्णतः दोनशे दिवसाचा ठिय्या. असे सनदशीर मार्गाने लढून पदरी हक्क मिळत नसेल तर पुन्हा मूळ गावात जगणे सुरू करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्थांनी केला आहे.जैनापूरच्या धर्तीवर अन्य बारा वसाहतीमधून पाण्याची योजना राबविणे गरजेचे आहे. सन १९९७पासून प्रती कुटुंब चारशे रूपये निर्वाह भत्ता दिला जातो.त्यानंतर महागाई किती पटीने वाढली यांचा विचार करून तीन हजार रूपये भत्ता मिळावा अशी मागणी प्रकल्पग्रस्थांतून होत आहे.आंदोलनातून धोरणात्मक मंत्रालय स्तरावर निर्णय होतात. पण पुर्नवसन व तालूका स्तरावर अमंलबजावणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या जातात.अशी खंत भारत पाटणकर यांनी व्यक्त केली.

ग्यानबाची मेखपुर्नवसन प्रक्रीयेत संकलन दूरूस्ती रेंगाळल्याने पुनर्वसनाचे घोडे अडले आहे.ही मुख्य दूरूस्ती संबंधीत विभाग टाळत आहे.हिच खरी ग्यानबाची मेख आहे. संकलन दूरूस्ती झाली तर पुनर्वसनाच्या अनुषंगाने असणारे प्रश्न आपोआप सुटणार आहेत. कुटूंबनिहाय संकलन पूर्ण करून याचा सोक्षमोक्ष करणारा अधिकारी भेटला तर मूळ गावी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना रोखता येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगली