शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

कोल्हापुरात उपनगरीय रेल्वेस्थानकाची गरज; दोन प्लॅटफॉर्म्सची उभारणी शक्य

By संदीप आडनाईक | Updated: December 10, 2023 15:30 IST

गोकुळ हॉटेल ते परिख पूल परिसरापर्यंत सुमारे बारा एकरचा परिसर रेल्वेचा आहे.

कोल्हापूर : वाढत्या शहरीकरणामुळे आणि कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग होणार असल्यामुळे भविष्यात उपनगरीय रेल्वेस्थानक विकसित करण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समध्ये मुबलक जागा उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर केल्यास आणखी गाड्या वाढू शकतात.

गोकुळ हॉटेल ते परिख पूल परिसरापर्यंत सुमारे बारा एकरचा परिसर रेल्वेचा आहे. मार्केट यार्ड परिसरात सुमारे चाळीस एकरहून अधिक जागा आहे. शाहूपुरी व्यापारी पेठ परिसरातही सुमारे दोन एकर परिसर जागा आहे. जेम्स स्टोन ते परिख पूल परिसरापर्यंत मोठी जागा आहे. या जागेत दोन प्लॅटफॉर्मची उभारणी शक्य आहे. सध्याच्या रेल्वेस्थानकावरून एक ते तीन प्लॅटफार्मवरून एक्सप्रेस आणि संभाव्य दोन प्लॅटफार्ममधून पॅसेंजर गाड्या सोडण्याचा विचार केला पाहिजे. यासाठी उपनगरीय प्रवासी वाहतूकीसाठी उचगाव परिसरात उपनगरीय रेल्वस्थानक उभारल्यास ही गरज भागू शकते.

कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडले जाणार असल्यामुळे आणि शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्याचा विचार करुन सध्याच्या रेल्वेस्थानकाला वाढीव जागा हवी आहे. त्यासाठी गोकुळ हॉटेलजवळील आडव्या जागेत तसेच भाजी मंडई परिसरातील जागेत प्लॅटफार्म आणि ट्रॅकची संख्या वाढल्यास जादा प्लॅटफार्मवरून रेल्वेगाड्या धावू शकतात. पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर प्लॅटफार्मची उभारणी केल्यास प्रवाशांना अधिकाधिक सुविधा करणे शक्य आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान

सध्या कोल्हापूर रेल्वेस्थानकावर सुमारे २०० कर्मचारी काम करतात. त्यांच्या निवासस्थानाची सुमारे दोन एकर परिसराची जागा आहे. कांहीजण क्वार्टर्समध्ये, कांही घरे भाड्याने घेउन तर काहीजण मिरज येथून येउनजाउन काम करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी जुनी क्वार्टर्स पाडून एका अपार्टमेंटमध्ये निवासाची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. यामुळेही रेल्वेच्यास्थानकाच्या परिसरात सुमारे चार ते पाच एकराची मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या जागेचा वापर नव्या ट्रॅकसाठी होऊ शकतो. हा ट्रॅक झाल्यास मिरज जंक्शन येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्या कोल्हापूर रेल्वेस्थानकापर्यंत येऊ शकतात. व्यापारी, नोकरवर्ग, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांचा प्रवास त्यामुळे सोयीचा आणि जलद होऊ शकतो. रेल्वेस्थानकावर भौतिक सुविधा आहेत. फक्त स्थानकाचे अत्याधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर