शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

एनडीए, इंडियाकडून  अपेक्षाभंग; चंद्रशेखर राव यांचे टीकास्त्र

By समीर देशपांडे | Updated: August 1, 2023 19:33 IST

कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले ...

कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले हे आपण पाहतो आहोत. त्यामुळेच आम्ही या दोघांकडेही नाही. काही मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार महाराष्ट्रात संघटना बांधणीकडे आम्ही विशेष लक्ष देत असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितले. येथील छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी वंदन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र ही अदभूत भूमी आहे. परंतू पैठणसारखा प्रकल्प असूनही औरंगाबादला दहा दिवसांनी पाणी येते. तेथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत एक अहवाल दिला आहे. यावर उपाय म्हणून तेलंगणा मॉडेलची अंमलबजावणी आवश्यक आहे. परंतू या सरकारने विधानसभेत हे मॉडेल स्वीकारणार नाही असे सांगितले. याला आता काय म्हणायचे. महाराष्ट्रात आल्यानंतर मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. परंतू शरद पवार यांनीच आम्हाला भाजपची बी टीम म्हटले. आता शरद पवारांनीच कॉंग्रेस फोडली. आता त्यांचाही पक्ष फुटला. शिवसेना फुटली, कॉंग्रेसही फुटणार असे ऐकत आहे. आणखी किती तुकडे होणार आहेत माहिती नाहीत. आम्हाला बी टीम म्हणणारे आता भाजपमध्ये घुसलेत.तत्पूर्वी राव यांचे सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर वाटेगावहून परत येवून त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावSharad Pawarशरद पवारBJPभाजपा