शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा, भाजप चले जावचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:50 IST

राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सार राज्य खड्यात आडकले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडे चार लाख कोटीचे कर्जाचा बोजा आहे, त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत भाजप सरकार चले जाव, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.

ठळक मुद्देभाजप सरकार चले जाव : हसन मुश्रीफशेतकरी तानाजी खोत यांनी काढले कर्जमाफीचे वाभाडे उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर यांना दिले मागण्यांचे निवेदन

कोल्हापूर : राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सार राज्य खड्यात आडकले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडे चार लाख कोटीचे कर्जाचा बोजा आहे, त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत भाजप सरकार चले जाव, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. दसरा चौकातून सुरू झालेल्या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सभेत रूपांतर झाले.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, सरकारच्या धोरणाने गरीब माणूस भरडला जात असून कर्जमाफीचा तर अक्षरशा बट्याबोळ केला आहे. राज्य व केंद्र सरकार सामान्य माणसाची पिळवणूक करत असून कर्जमाफीत काहीच हातात पडले नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

आश्वासनापलिकडे या सरकारने काहीच दिले नसून लबाड सरकारला खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश लाटकर, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील, भैया माने, चंगेजखान पठाण, अनिल साळोखे, मधूकर जांभळे, रामराजे कुपेकर, संगीता खाडे, आदिल फरास, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

उध्दवजी आता जोडे हाणाच

शिवसेना सत्तेला चिकटून बसली असून सत्तेचा मोह सुटत नाही. सत्तेत राहायचे आणि राज्यभर सरकारविरोधात भूमिका घ्यायचे हे आता त्यांनी बंद करावे. चांगला कारभार केला नाहीतर जोडे मारू, असे उध्दव ठाकरे म्हणाले होते, आता त्यांनी जोडे मारण्याची वेळ असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

अन कामात झिरो!चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील शेतकरी तानाजी खोत यांनी कर्जमाफीचे वाभाडे काढले. ‘आॅनलाईन कर्जमाफी कसली हीतर वाट लावीन’ आहे. सरकार जाहीरातीत हिरो पण कामात झिरो असल्याचे त्यांनी सांगितले.

सगळीच यंत्रणा किडली

निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकासह कोणीच नसल्याने हसन मुश्रीफ संतापले. अगोदर सांगूनही कोणीच उपस्थित राहत नसेल तर काय म्हणावे, काय करणार येथे वर पासून खालीपर्यंत यंत्रणाच किडल्याचे सांगितले. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ