शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा, भाजप चले जावचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:50 IST

राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सार राज्य खड्यात आडकले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडे चार लाख कोटीचे कर्जाचा बोजा आहे, त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत भाजप सरकार चले जाव, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.

ठळक मुद्देभाजप सरकार चले जाव : हसन मुश्रीफशेतकरी तानाजी खोत यांनी काढले कर्जमाफीचे वाभाडे उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर यांना दिले मागण्यांचे निवेदन

कोल्हापूर : राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सार राज्य खड्यात आडकले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडे चार लाख कोटीचे कर्जाचा बोजा आहे, त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत भाजप सरकार चले जाव, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. दसरा चौकातून सुरू झालेल्या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सभेत रूपांतर झाले.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, सरकारच्या धोरणाने गरीब माणूस भरडला जात असून कर्जमाफीचा तर अक्षरशा बट्याबोळ केला आहे. राज्य व केंद्र सरकार सामान्य माणसाची पिळवणूक करत असून कर्जमाफीत काहीच हातात पडले नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

आश्वासनापलिकडे या सरकारने काहीच दिले नसून लबाड सरकारला खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश लाटकर, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील, भैया माने, चंगेजखान पठाण, अनिल साळोखे, मधूकर जांभळे, रामराजे कुपेकर, संगीता खाडे, आदिल फरास, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

उध्दवजी आता जोडे हाणाच

शिवसेना सत्तेला चिकटून बसली असून सत्तेचा मोह सुटत नाही. सत्तेत राहायचे आणि राज्यभर सरकारविरोधात भूमिका घ्यायचे हे आता त्यांनी बंद करावे. चांगला कारभार केला नाहीतर जोडे मारू, असे उध्दव ठाकरे म्हणाले होते, आता त्यांनी जोडे मारण्याची वेळ असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

अन कामात झिरो!चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील शेतकरी तानाजी खोत यांनी कर्जमाफीचे वाभाडे काढले. ‘आॅनलाईन कर्जमाफी कसली हीतर वाट लावीन’ आहे. सरकार जाहीरातीत हिरो पण कामात झिरो असल्याचे त्यांनी सांगितले.

सगळीच यंत्रणा किडली

निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकासह कोणीच नसल्याने हसन मुश्रीफ संतापले. अगोदर सांगूनही कोणीच उपस्थित राहत नसेल तर काय म्हणावे, काय करणार येथे वर पासून खालीपर्यंत यंत्रणाच किडल्याचे सांगितले. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ