शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार

By विश्वास पाटील | Updated: July 3, 2023 13:15 IST

मुश्रीफांचे कागलच्या राजकारणात राजकीय भवितव्य काय राहील याचा फैसला व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही.

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या दोनच आमदार होते परंतु ते दोघेही नव्या उलथापालथीमध्ये भाजप-एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मोकळी झाल्याची प्रतिक्रिया उमटली. पण जे भाजपसोबत गेले आहेत, ते आम्हीच खरे राष्ट्रवादी असा दावा करू शकतात. परंतु पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाध्यक्ष शरद पवार यांंना सर्वाधिक बळ देणारा या जिल्ह्यात या पक्षाची स्थिती अस्तित्वासाठी झगडतोय अशी झाली आहे. लोकसभेसाठी दावा सांगणारा हा पक्ष आता विधानसभेसाठी उमेदवार शोधतानाही घामाघूम होईल. एकाच नेतृत्वाच्या हवाली पक्ष केल्याचा हा परिणाम आहे. त्याला पक्षाचेच नेतृत्वही तेवढेच कारणीभूत आहे.एकेकाळी दिवंगत नेते खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार निवेदिता माने, के. पी. पाटील, बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील, दिग्विजय खानविलकर अशी नेतृत्वाची भक्कम फळी या पक्षात होती. या पक्षाची स्थापनेची महत्त्वाची बैठकच कोल्हापुरात खानविलकर यांच्या घरात झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा गड मानला गेला. दोन्ही खासदार आणि पाच आमदार या जिल्ह्याने या पक्षाला दिले. एकेकाळी पवार यांच्या पुणे जिल्ह्यात जेवढे राष्ट्रवादीचे बळ नव्हते तेवढी ताकद कोल्हापूरने दिली. परंतु नंतर या गडाच्या भिंती गटबाजीने ढासळल्या. मंडलिक की मुश्रीफ यांच्या वादात पवार यांनी मुश्रीफ यांना बळ दिले. साधारणत २००७ ला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या लढाईत मंडलिक गटाचा पराभव झाल्यावर राष्ट्रवादीतील मंडलिक-मुश्रीफ वाद विकोपाला गेला. मंडलिक पक्षातून बाहेर पडले व पक्षाची आणखी पडझड झाली. त्यानंतर मात्र मुश्रीफ हेच पक्षाचे सर्वेसर्वा झाले. त्यांनी कागलच्या राजकारणासाठी जे सोयीचे असेल त्यानुसार पक्षाचा वापर केला. संघटनात्मक बांधणीकडे फारसे लक्ष दिले नाही. नव्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. त्यामुळे कागल, चंदगड आणि राधानगरी मतदार संघापुरताच हा पक्ष मर्यादित राहिला. महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ, बाजार समितीत पक्षाला सत्तेची संधी मिळाली परंतु त्यातून पक्ष बळकट झाला नाही. आताही या तीनच मतदार संघात पक्षाची ताकद आहे. लोकसभेसाठी दोन्ही मतदार संघात पक्षाकडे उमेदवारच नाही. कोल्हापुरात जरा तरी बरी स्थिती पण हातकणंगले मतदार संघात मात्र एकही आमदार नाही. तिथे झेंडा हातात घ्यायला कार्यकर्ते नाहीत. पक्षाच्या या स्थितीस स्वत: मुश्रीफच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पक्ष विस्तारला नाही. गेल्याच महिन्यात स्वत: अजित पवार यांनीच कागल सोडून पक्ष पुढे गेला नाही अशी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. आता त्याच अजितदादांनी मुश्रीफ यांनाच सोबत घेऊन पक्ष बळकट करण्याचे जाहीर केले आहे. नव्या राजकीय उलथापालथी पाहता राष्ट्रवादीत शरद पवार यांच्याकडे कोण-कोण राहते यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून राहील.

सत्तेचे कायमच बळ..मुश्रीफ यांच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत त्यांची पक्ष व नेतृत्वाची निष्ठा ही सर्वात महत्त्वाची मानली गेली. त्यामुळेच पक्षाने त्यांना सत्तेचे कायम बळ दिले. आता त्यांना जरुर मंत्रिपद मिळाले असले तरी कागलच्या राजकारणात त्यांचे राजकीय भवितव्य काय राहील याचा फैसला व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसHasan Mushrifहसन मुश्रीफ