शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

सोडून जाणाऱ्यांना सांगत होतो, कपाळमोक्ष ठरलेला आहे; मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 09:09 IST

"ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे," अशा शब्दांत पाटील यांनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला आहे.

NCP Jayant Patil ( Marathi News ) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजितसिंह घाटगे यांचा पक्षप्रेवश सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. "पवार साहेब हे सगळं कसं जमवतात या विचाराने आमचे विरोधक बुचकळ्यात पडले असतील. पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत. शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो. बरेच लोक पक्ष सोडून गेले. पण लक्षात ठेवा 'जहां पे हम खडे होते हैं, लाईन वहीं से शुरू होती है.' मी आधीही सांगत होतो पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका, कपाळमोक्ष ठरलेला आहे," असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात. राजे समरजितसिंह घाटगे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो. पवार साहेब आज स्वतः उपस्थित आहेत हा संदेश कागल विधानसभेला पुरेसा आहे. लोकसभेत ज्यांनी तुतारी हाती घेतली त्या सर्वांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. कागलच्या इतिहासाची नव्याने सुरुवात होत आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलं आहे.

समरजीत घाटगेंवर स्तुतीसुमने

 "राजे समरजितसिंह यांनी गेली १० वर्षे अविरतपणे कार्य केले. कारखाना अतिशय आदर्शपणे चावलेला आहे. सत्ता असो वा नसो कार्यरत राहण्याचा बाणा त्यांनी स्वाभिमानाने जपला आहे. ते व्यवसायाने सीए आहेत. विरोधकांची वजाबाकी त्यांना व्यवस्थितपणे करता येते. हिशोब चोख ठेवणारे राजे समरजितसिंह मतदारसंघात विकास घडवतील हा मला विश्वास आहे," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी घाटगे यांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, "ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. इतके सुमार काम करणारा शिल्पकार अद्याप फरार आहे. तो नक्की कोणाचा मित्र आहे? भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटले नाही असा कांगावा करत आहेत. कारण गुजरातचे नाव काढले की सत्ताधारी घाबरत आहेत. त्यामुळेच महराजांचा इतिहास बदलण्याचे पाप करत आहेत. बहुजन समजाच्या विचारांचे राज्य येण्यासाठी पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत आहे. आपला पक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. त्यांना तुम्हा सर्वांची साथ हवी आहे," असं आवाहनही यावेळी पाटील यांनी केलं आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे