शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा संसार अजूनही दुसऱ्याच्याच घरात, स्वमालकीचे कार्यालय उभारण्यात अपयश

By राजाराम लोंढे | Updated: July 6, 2023 18:22 IST

राष्ट्रवादीचे कार्यालय म्हणजे विंचवाचे बिऱ्हाड

राजाराम लोंढे कोल्हापूर : रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संसार स्वत:च्या कार्यालयाविना दुसऱ्याच्या घरातच सुरू आहे. दोन खोल्यांचे स्वत:चे कार्यालय करण्यात पक्षनेतृत्वाला अपयश आल्याने इतरांच्या उपकारावरच येथे कारभार सुरू आहे. त्यामुळे इतर ठिकाणी पक्ष कार्यालयावरून सुरू असलेला संघर्ष येथे होण्याचा प्रश्नच येत नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद आता चांगलाच पेटणार असून पक्ष कार्यालयावरून राडे सुरू झाले आहेत. बुधवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करत पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या कार्यालयावरून दोन्ही गटांत रणकंदन होणार हे निश्चित आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार होण्याची शक्यता फार कमी आहे; कारण गेल्या २५ वर्षांत येथील प्रत्येक नेतृत्वाने पक्ष कार्यालयासह त्याच्या वाढीस फारसे महत्त्व दिले नाही. 

पंचवीसपैकी २० वर्षे पक्ष सत्तेत असूनही त्याला स्वत:चे हक्काचे कार्यालय करता आले नाही. राजकीयबरोबरच संस्थात्मक ताकद असणाऱ्या व्यक्तीकडेच पक्षाचे नेतृत्व राहिले आहे. मात्र, एकाही नेतृत्वाला पक्षाचे दोन खोल्यांचे कार्यालय उभा करता आले नाही, हे नेतृत्वाचे अपयशच म्हणावे लागेल.राष्ट्रवादीचे कार्यालय म्हणजे विंचवाचे बिऱ्हाड

  • गेल्या पंचवीस वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व जिल्हा कार्यालयाची अवस्था विंचवाच्या बिऱ्हाडासारखी झाली आहे. स्थापनेवेळी शहर व जिल्हा कार्यालय माजी महापौर आर. के. पोवार यांच्या महाराणा प्रताप चौक परिसरातील निवासस्थानी होते.
  • त्यानंतर शहर कार्यालय तिथे राहिले आणि जिल्हा कार्यालय ताराबाई पार्क येथील देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे यांच्या खाडे बिल्डिंगमध्ये गेले. तोपर्यंत शहर कार्यालय जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या मालकीच्या शाहू स्टेडियमच्या गाळ्यात गेले.
  • खाडे यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर काही महिने जिल्हा कार्यालय जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या जाधववाडी परिसर येथील घरात गेले. आता ते शाहू मार्केट यार्ड येथील कागल तालुका संघाच्या शेडमध्ये सुरू आहे.

शहर कार्यालय ‘व्ही. बीं’कडेच राहणारशहर कार्यालयाची जागा ही व्ही. बी. पाटील यांची आहे. त्यामुळे हे कार्यालय त्यांच्याकडेच म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे, तर जिल्हा कार्यालयाची जागा ही कागल संघाची असल्याने ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार, हे निश्चित आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष