शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

‘बिद्री’त राष्ट्रवादी-भाजप एकत्र-- भाजपला सहा जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:06 IST

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची

ठळक मुद्दे: शेतकºयांच्या हितासाठीच राजकारण बाजूला : हाळवणकरपण राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही,

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपला २१ पैकी सहा जागा देणार असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत तीन-चार बैठका झाल्या, चर्चेअंती सहा जागा देण्यावर एकमत झाले. आता भाजपमध्ये गेलेली मंडळी कधी ना कधी आमच्या पॅनेलमध्ये होतीच. गेल्या वेळेला राजे विक्रमसिंह घाटगे, प्रवीणसिंह पाटील, विजयसिंह मोरे, तर बजरंग देसाईही एकवेळ आमच्यासोबत होते. आता भाजपचे लेबल लावून सोबत आहेत एवढाच फरक आहे. जिल्ह्णातील सर्वांत सक्षम बिद्री साखर कारखाना असून, वाढीव सभासदांच्या गुंत्यामुळेच निवडणूक वेळेवर न झाल्यानेच प्रशासक आले. आता आम्ही निवडणूक ताकदीने लढवून जिंकणारच, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पारदर्शक कारभार करीत सक्षम आर्थिक स्थिती व कर्जमुक्त कारखाना केवळ के. पी. पाटील यांच्यामुळेच झाला. त्यामुळेच राजकारण व तत्त्वप्रणाली बाजूला ठेवून शेतकºयांच्या हितासाठी आम्ही एकत्र आल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. स्वतंत्र लढण्याबाबत आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता; पण साखर कारखान्याचे राजकारण हे सभासदांच्या संख्येवर असते. आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर तेरा-चौदा हजार मतांपर्यंत गेलो असतो, असेही त्यांनी सांगितले.कारखान्याचे माजी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, तेरा वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पारदर्शक व काटकसरीचा कारभार केल्यानेच कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम झाली. आगामी काळात इथेनॉल, डिस्टिलरी प्रकल्पांची उभारणी करणार असून, ऊस उत्पादन वाढीसाठी नियोजन करणार आहे.कारखान्याच्या हितासाठी सरकारची मदत गरजेची असते. यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आघाडी केल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, रणजित पाटील, हिंदुराव शेळके, समरजितसिंह घाटगे गटाचे यशवंत माने व प्रकाश पाटील उपस्थित होते.विरोधकांत एकवाक्यतेचा अभावविरोधी आघाडीने आठ जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता; पण तिथे नेत्यांची संख्या जास्त असल्याने एकवाक्यता नसल्यानेच दोन जागा कमी मिळाल्या तरी चालेल; पण राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही, कारखान्याची सत्ता केवळ राजकीय अड्डा करण्यासाठीच हवी असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.पॅनेलची घोषणा २५ सप्टेंबरलाभाजपला सहा जागा मिळाल्या असल्या तरी त्या कोणत्या गटातील घ्यायच्या याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून ठरविल्या जातील. २५-२६ सप्टेंबरला राष्ट्रवादी-भाजप पॅनेलची घोषणा केली जाईल, असे हाळवणकर यांनी सांगितले.स्थानिक काँग्रेस आघाडीसोबतच‘आण्णा तुम्ही कॉँग्रेसचे की....’ अशी विचारणा केली असता. आपण कॉँग्रेस म्हणूनच आलो आहे. भुदरगड तालुक्यातील कॉँग्रेस ही राष्ट्रवादी-भाजप आघाडीसोबत राहणार असल्याची माहिती माजी आमदार बजरंग देसाई यांनी दिली.मुरगूडकर घरातील पेच व्यवस्थित सोडवूकागल व भुदरगड तालुक्यांत एकाच घरात दोन-दोन उमेदवार असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर हाळवणकर म्हणाले, रणजित पाटील व प्रवीणसिंह पाटील-मुरगूडकर यांच्याबाबत विचारत असाल तर हा पेच व्यवस्थित सोडवू .‘बिद्री’त खरी लोकशाही!शेतकºयांनी स्वत:चे दागिने विकून कारखान्याचा शेअर्स खरेदी केला आणि सहवीज प्रकल्प उभा राहिला. त्यांना अपात्र ठरविल्याने विरोधकांमध्ये रोष आहे. ‘बिद्री’मध्ये ऊस घालणाºया प्रत्येकाला सभासद केले जात असल्याने खरी लोकशाही येथे असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.