शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

राष्ट्रवादी काँगे्रसने शब्द पाळला

By admin | Updated: November 17, 2015 01:05 IST

तेथे काहीवेळ माजी मंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केल्यानंतर तेथून साडेदहा वाजता सर्व नगरसेवक आरामबसमधून महानगरपालिकेत आले.

कोल्हापूर: महानगरपालिकेतील निवडणुकीनंतर बहुमताचे गणित काही केल्या जमत नाही म्हटल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन चमत्कार घडवून आणण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा राष्ट्रवादीकडे होत्या. मात्र, घेतलेल्या निर्णयात बदल न करता राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत काँग्रेसला दिलेला शब्द पाळला. या निवडणुकीत सर्वाधिक ३२ (१३+१९) जागा भाजप-ताराराणी आघाडीला मिळाल्या. त्याखालोखाल कॉँग्रेसला २७, तर राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या. शिवसेनेचे चार, तर तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सत्तेसाठी पालकमंत्री वरच्या पातळीवर प्रयत्न करीत राहिले, तर खाली जिल्हा पातळीवर सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी हातात हात घालून ‘जुनी मैत्री तोडायची नाय’ असा निर्धार केला. दरम्यान परगावी सहलीवर नेलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ४४ नगरसेवकांना सोमवारी सकाळी सात वाजता कोल्हापुरात ‘अजिंक्यतारा’वर आणण्यात आले. तेथे काहीवेळ माजी मंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केल्यानंतर तेथून साडेदहा वाजता सर्व नगरसेवक आरामबसमधून महानगरपालिकेत आले. त्यांच्यासोबत पुढे गाडीतून माजी मंत्री सतेज पाटील, महापौर पदाच्या उमेदवार अश्विनी रामाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऋतुराज पाटील हे होते. त्यापाठोपाठ असणाऱ्या गाडीत प्रा. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रीय सदस्य आर. के. पोवार, उपमहापौर पदाच्या उमेदवार शमा मुल्ला, तसेच शहराध्यक्ष राजू लाटकर हे होते. दोन्हीही उमेदवारांनी पक्षाचे तिरंगी फेटे डोक्यावर घातले होते, तर नेत्यांनी डोक्यावर नारंगी रंगाचे फेटे बांधले होते. त्यापाठोपाठ आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी डोक्यावर गुलाबी फेटे, गळ्यात पक्षाचे स्कार्प घातले होते. पाठोपाठ हॉटेल पॅव्हेलियन येथून आरामबसमधून भाजप-ताराराणी महायुतीचे नेते सुनील कदम, महेश जाधव यांच्यासह महापौर पदाच्या उमेदवार सविता भालकर व राजसिंह शेळके हे सकाळी १०.५० वाजता महापालिकेत आले. त्यांच्यासोबत भाजप-ताराराणी महायुतीचे ३२ नगरसेवक व अपक्ष राजू दिंडोर्ले हे सर्वजण पक्षाच्या व नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देत महापालिकेत आले. यावेळी नगरसेवकांच्या गळ्यात भाजप-ताराराणी आघाडीचे स्कार्प होते, तर हातात पक्षाचे झेंडे होते. हे सर्व नगरसेवक थेट महापालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू सभागृहातच गेले. दोन्हीही पक्ष, आघाड्यांचे कार्यकर्ते, नेते महापालिका चौकातच थांबून होते. सभागृहातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर सतेज पाटील आणि प्रल्हाद चव्हाण हे इतर नेत्यांवर जबाबदारी सोपवून निघून गेले. नगरसेवक सभागृहात, तर नेते चौकातराष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे यावेळी अनुपस्थित असल्याने त्यांचे फोटो असणारे बॅनर नगरसेवकांच्या हातात होते. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचे झेंडे होते. सर्व नगरसेवक महानगरपालिका चौकात आल्यानंतर पक्षाच्या आणि नेत्यांसह उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. काही वेळ विठ्ठल रामजी शिंदे चौकात थांबून आघाडीचे नगरसेवक सभागृहात गेले, तर नेते चौकातच थांबून होते.