शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रविवारपासून राष्ट्रीय किसान परिषद : रघूनाथदादा पाटील, देशातील जनतेला तिसरा पर्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:57 IST

देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. १०) पासून पुणे येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात तीन दिवशीय राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील जनतेला तिसरा पर्याय देण्याची घोषणा याच परिषदेत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी परिषददरोड्याचे मास्टरमार्इंड पवार, मुंडे!त्यावेळी सिन्हांनी काय दिवे लावलेअशोकरावांना गळा काढण्याची नैतिकता तर काय

कोल्हापूर : देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. १०) पासून पुणे येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात तीन दिवशीय राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील जनतेला तिसरा पर्याय देण्याची घोषणा याच परिषदेत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, सरकार बदलली पण प्रश्न तसेच राहिले आहेत. जोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे बदलत नाही तोपर्यत प्रश्न कायम राहणार आहेत. कायदे बदलण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षाची रणनिती परिषदेत ठरविली जाणार असून हुतात्मा बाबू गेणू व शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त १२ डिसेंबरला परिषदेची सांगता होणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

दूध दराबाबत सरकारने संघांपुढे गुडघे टेकले असून ही त्यांची नामुष्की आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे सरकार कारखानदार चालवत होते पण भाजपचे सरकारच त्यांनी विकत घेतल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला. पी. जी. पाटील, माणिक शिंदे, आदम मुजावर, गुणाजी शेलार आदी उपस्थित होते.

दरोड्याचे मास्टरमार्इंड पवार, मुंडे!उत्तर प्रदेश, गुजरातमधील ऊस दराशी तुलना केली तर येथे प्रतिटन सातशे रूपये तर बगॅसच्या माध्यमातून सहाशे असे टनाला १३०० रूपयांचा दरोडा कारखानदारांनी घातला आहे. या मागील मास्टर मार्इंड शरद पवार, गोपीनाथ मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, अशोक चव्हाण आहेत. या पैशावरच त्यांचे राजकारण चालते असे त्यांनी सांगितले.

त्यावेळी सिन्हांनी काय दिवे लावलेवाजपेयी सरकारच्या काळात कांद्याच्या दरावरून चार राज्यातील भाजपची सरकारे पडल्याने कांद्याला जीवनाश्यक वस्तूत टाकणारे तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हाच होते. त्यांनी झाडा खाली झोपले काय आणि हिमालयात जाऊन सन्यास घेतला तरी शेतकºयांना फरक पडत नसल्याची टीका पाटील यांनी केली.

अशोकरावांना गळा काढण्याची नैतिकता तर कायदोन वर्षापुर्वी २३०० रूपये एफआरपी झाली, ती देता येत नाही म्हणून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्या अशोक चव्हाण यांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल गळे काढण्याचा अधिकार तरी काय. राजू शेट्टी - चव्हाण भेटीला फारसे महत्व नसून दोघेही एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत. टनाला दीड हजार रूपये कारखानदार हाणत आहेत, त्याच्या समोर जीएसटीची मुद्दा गौण असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर