शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

पुण्यात रविवारपासून राष्ट्रीय किसान परिषद : रघूनाथदादा पाटील, देशातील जनतेला तिसरा पर्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:57 IST

देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. १०) पासून पुणे येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात तीन दिवशीय राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील जनतेला तिसरा पर्याय देण्याची घोषणा याच परिषदेत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी परिषददरोड्याचे मास्टरमार्इंड पवार, मुंडे!त्यावेळी सिन्हांनी काय दिवे लावलेअशोकरावांना गळा काढण्याची नैतिकता तर काय

कोल्हापूर : देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. १०) पासून पुणे येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात तीन दिवशीय राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील जनतेला तिसरा पर्याय देण्याची घोषणा याच परिषदेत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, सरकार बदलली पण प्रश्न तसेच राहिले आहेत. जोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे बदलत नाही तोपर्यत प्रश्न कायम राहणार आहेत. कायदे बदलण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षाची रणनिती परिषदेत ठरविली जाणार असून हुतात्मा बाबू गेणू व शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त १२ डिसेंबरला परिषदेची सांगता होणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

दूध दराबाबत सरकारने संघांपुढे गुडघे टेकले असून ही त्यांची नामुष्की आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे सरकार कारखानदार चालवत होते पण भाजपचे सरकारच त्यांनी विकत घेतल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला. पी. जी. पाटील, माणिक शिंदे, आदम मुजावर, गुणाजी शेलार आदी उपस्थित होते.

दरोड्याचे मास्टरमार्इंड पवार, मुंडे!उत्तर प्रदेश, गुजरातमधील ऊस दराशी तुलना केली तर येथे प्रतिटन सातशे रूपये तर बगॅसच्या माध्यमातून सहाशे असे टनाला १३०० रूपयांचा दरोडा कारखानदारांनी घातला आहे. या मागील मास्टर मार्इंड शरद पवार, गोपीनाथ मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, अशोक चव्हाण आहेत. या पैशावरच त्यांचे राजकारण चालते असे त्यांनी सांगितले.

त्यावेळी सिन्हांनी काय दिवे लावलेवाजपेयी सरकारच्या काळात कांद्याच्या दरावरून चार राज्यातील भाजपची सरकारे पडल्याने कांद्याला जीवनाश्यक वस्तूत टाकणारे तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हाच होते. त्यांनी झाडा खाली झोपले काय आणि हिमालयात जाऊन सन्यास घेतला तरी शेतकºयांना फरक पडत नसल्याची टीका पाटील यांनी केली.

अशोकरावांना गळा काढण्याची नैतिकता तर कायदोन वर्षापुर्वी २३०० रूपये एफआरपी झाली, ती देता येत नाही म्हणून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्या अशोक चव्हाण यांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल गळे काढण्याचा अधिकार तरी काय. राजू शेट्टी - चव्हाण भेटीला फारसे महत्व नसून दोघेही एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत. टनाला दीड हजार रूपये कारखानदार हाणत आहेत, त्याच्या समोर जीएसटीची मुद्दा गौण असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर