शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

दृष्टिकोन बदलण्यासाठी ‘नमामि पंचगंगा’ --‘पंचगंगा परिक्रमा’ : शौमिका महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:34 IST

कोल्हापूर : गेली २५ वर्षे पंचगंगा शुद्धिकरणासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर अथक प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांविषयी आदर व्यक्त करीत, या सगळ्या कामाला श्रद्धेची जोड देत नागरिकांचा आपली माता पंचगंगेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, तसेच पंचगंगेच्या प्रकटदिनानिमित्त ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याला समाजाने साथ द्यावी, ...

ठळक मुद्देश्रद्धेच्या उपक्रमाला स्वच्छतेची जोड; पावसाळ्यानंतर नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर ‘पंचगंगा परिक्रमा’

कोल्हापूर : गेली २५ वर्षे पंचगंगा शुद्धिकरणासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर अथक प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांविषयी आदर व्यक्त करीत, या सगळ्या कामाला श्रद्धेची जोड देत नागरिकांचा आपली माता पंचगंगेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, तसेच पंचगंगेच्या प्रकटदिनानिमित्त ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याला समाजाने साथ द्यावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

आमदार अमल महाडिक यांच्या पुढाकाराने आयोजित ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाच्या प्रारंभावेळी गुरुवारी सायंकाळी नदीकाठी आयोजित कार्यक्रमामध्ये शौमिका महाडिक यांनी हे आवाहन केले. यावेळी नदीविषयी आस्था असणाऱ्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पंचगंगेची आरतीही करण्यात आली.

यावेळी आमदार महाडिक यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई, नवोदिता घाटगे, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.शौमिका महाडिक म्हणाल्या, केवळ एक दिवस आरती करून हा प्रश्न सुटणार नाही, याची आम्हांला जाणीव आहे. कुणालाही काही करू नको, असे सांगून भागत नाही; म्हणूनच नदीकडे पाहण्याची भावनाच बदलण्यासाठी या पंचगंगेचे आध्यात्मिक, नैसर्गिक महत्त्व सांगत ही भावना बदलण्यासाठी हा उपक्रम आहे. संत, शासन आणि समाज या त्रिसूत्रीच्या आधारावर पूजा, परंपरा, परिक्रमा आणि पर्यटन या माध्यमांतून हा उपक्रम लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर पंचगंगा परिक्रमा उपक्रम असून, पावसाळ्यानंतर १४ दिवस पंचगंगेच्या सान्निध्यात ही परिक्रमा पूर्ण केली जाणार आहे. यातूनच तिच्याविषयी आस्था वाढण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाचे संकल्पक उमाकांत राणिंगा म्हणाले, पंचगंगा नदीकाठी राहणाºया नागरिकांच्या हृदयाला हात घालून नदीविषयी श्रद्धा निर्माण करून तिचे पावित्र्य राखण्यासाठी यापुढील काळात काम केले जाईल.

अ‍ॅड. प्रसन्न मालेकर म्हणाले, ‘करवीरमाहात्म्या’मध्ये पंचगंगेचा उल्लेख असून, या मातेचे पावित्र्य जपत तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपक्रम कार्यरत केला आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे, अनेक सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, पारस ओसवाल, माणिक पाटील-चुयेकर, बाबा पार्टे, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिवाजी गावडे यांनी प्रास्ताविक केले.स्वच्छता मोहिमेत महाडिक दाम्पत्याचा सहभागतत्पूर्वी, गुरुवारी सकाळी पंचगंगा घाटावर सुमारे ५०० जणांनी स्वच्छता मोहीम राबविली. प्रामुख्याने पिकनिक पॉइंटखालील सर्व घाण यावेळी काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. नदीकाठाला साठलेले प्लास्टिक, थर्माकोल अक्षरश: नदीत उतरून काढण्यात आले. येथे गोळा केलेला सर्व कचरा महापालिकेच्या डंपरमधून नेण्यात आला.नदीकाठी उमटले आरतीचे सूरया भक्तिभावपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेजारीच असलेल्या शंकराचार्य मठामधून मंगल कलश आणले. सूर्यास्त होताच १०८ दिव्यांनी पंचगंगेची आरती केली. सूर्य मावळतीला गेल्यानंतरचा संधिप्रकाश आणि या दिव्यांमुळे पंचगंगा घाटाचे एक वेगळेच रूप यावेळी पाहायला मिळाले. यावेळी खडीसाखर-फुटाण्यांचा प्रसाद दिला. तसेच होमही केला. धुपाच्या सुगंधाने आसमंत भारलेला होता.गेली १0 वर्षे होते आरतीपंचगंगा भक्ती सेवा मंडळातर्फे रोज सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची आरती करण्यात येते. स्वप्निल मुळे, राजाभाऊ कुंभार, धनाजी जाधव, अवधूत भाट, शालन भुर्के, हणमंत हिरवेहे रोज या आरतीला उपस्थित असतात.कोल्हापूर येथे ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमांतर्गत गुरुवारी सायंकाळी पंचगंगा घाटावर आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पंचगंगा नदीची आरती करण्यात आली.

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर