शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- नागपूर-रत्नागिरी महामार्ग: जमीन जाणार अन् भाव नाही मिळणार; भुयेतील ५८ शेतकरी कुटुंबे न्यायालयात 

By संदीप आडनाईक | Updated: March 12, 2024 12:58 IST

चुकीच्या रेखांकनाचा भुये, भुयेवाडी गावच्या शेतकऱ्यांना फटका

संदीप आडनाईककोल्हापूर : रस्त्यासाठी भूसंपादन करताना चुकीचे रेखांकन झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील भुये आणि भुयेवाडी गावचे ५८ शेतकरी कुटुंबे न्यायालयात गेली आहेत. राज्यमार्ग, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासाठी एकाच गटातील जमिनींचे तीनवेळा संपादन झाले आहे. ताज्या रेखांकनानुसार या भागातील एकाच ३४ गटांतील दोनशे कुटुंबातील २००० शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. हातची जमीन तर जाणारच परंतु महामार्गाऐवजी प्राधिकरणाचा निकष लावल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे ते वेगळेच.नागपूर-रत्नागिरी (एनएच-१६६) हा महामार्ग राज्यमार्ग एसएच-१९४ च्या दुतर्फा घेऊन अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या गूळ पट्ट्यातील बागायती जमिनी वाचविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने १३ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतला होता. राज्यमार्ग एसएच-१९४, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग एसएच-१९४ (४५ मीटर) आणि नागपूर-रत्नागिरी एनएच-१६६ (६० मीटर) या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनींचे आतापर्यंत तीनवेळा संपादन झाले आहे.विशेष म्हणजे हे भूसंपादन ९५ टक्के शेतकऱ्यांच्या ३४ क्रमांकाच्या एकाच गटातील जमिनीतून होत आहे. भुये आणि भुयेवाडी येथे एक किलोमीटरमध्ये सध्याचा हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) डिझाईन ऑफ एक्स्पर्ट कमिटीच्या शिफारशीनुसार राज्यमार्ग एसएच-१९४च्या समांतर होत आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे तर आहेच शिवाय त्यांना भूमीहीन व्हावे लागणार आहे, ते वेगळेच.

मोबदल्याचा दर निम्म्यापेक्षाही कमीही गावे प्राधिकरणात समाविष्ट केल्याने भूसंपादनाचा मोबदला ठरविताना राष्ट्रीय महामार्गाऐवजी प्राधिकरणाचे नियम लावले आहेत. त्यामुळे शहराजवळील या गावांना ८ ते १० लाख रुपये दर अपेक्षित असताना त्यांच्या निम्म्यानेही दर निश्चित होत नाही. याउलट डोंगरभागातील काही गावे महामार्ग प्रकल्पात जात असल्यामुळे त्यांना चांगले दर मिळत आहेत.

शासनाकडे सादर अहवाल लालफीतीतयाविरुद्ध संबंधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली होती, परंतु याकडे कुणी लक्ष दिलेले नाही. भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांनी हा विषय सध्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेला आहे. तेथे न्याय मिळाला नाही तर या जमिनी मातीमोल भावाने सरकारच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. या शेतकऱ्यांना जादा दर मिळावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एक वर्षांपूर्वी शासनास अहवाल दिला आहे, मात्र तो लालफितीत अडकला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग