शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

Kolhapur- नागपूर-रत्नागिरी महामार्ग: जमीन जाणार अन् भाव नाही मिळणार; भुयेतील ५८ शेतकरी कुटुंबे न्यायालयात 

By संदीप आडनाईक | Updated: March 12, 2024 12:58 IST

चुकीच्या रेखांकनाचा भुये, भुयेवाडी गावच्या शेतकऱ्यांना फटका

संदीप आडनाईककोल्हापूर : रस्त्यासाठी भूसंपादन करताना चुकीचे रेखांकन झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील भुये आणि भुयेवाडी गावचे ५८ शेतकरी कुटुंबे न्यायालयात गेली आहेत. राज्यमार्ग, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासाठी एकाच गटातील जमिनींचे तीनवेळा संपादन झाले आहे. ताज्या रेखांकनानुसार या भागातील एकाच ३४ गटांतील दोनशे कुटुंबातील २००० शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. हातची जमीन तर जाणारच परंतु महामार्गाऐवजी प्राधिकरणाचा निकष लावल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे ते वेगळेच.नागपूर-रत्नागिरी (एनएच-१६६) हा महामार्ग राज्यमार्ग एसएच-१९४ च्या दुतर्फा घेऊन अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या गूळ पट्ट्यातील बागायती जमिनी वाचविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने १३ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतला होता. राज्यमार्ग एसएच-१९४, प्राधिकरण प्रभावित राज्यमार्ग एसएच-१९४ (४५ मीटर) आणि नागपूर-रत्नागिरी एनएच-१६६ (६० मीटर) या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनींचे आतापर्यंत तीनवेळा संपादन झाले आहे.विशेष म्हणजे हे भूसंपादन ९५ टक्के शेतकऱ्यांच्या ३४ क्रमांकाच्या एकाच गटातील जमिनीतून होत आहे. भुये आणि भुयेवाडी येथे एक किलोमीटरमध्ये सध्याचा हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) डिझाईन ऑफ एक्स्पर्ट कमिटीच्या शिफारशीनुसार राज्यमार्ग एसएच-१९४च्या समांतर होत आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे तर आहेच शिवाय त्यांना भूमीहीन व्हावे लागणार आहे, ते वेगळेच.

मोबदल्याचा दर निम्म्यापेक्षाही कमीही गावे प्राधिकरणात समाविष्ट केल्याने भूसंपादनाचा मोबदला ठरविताना राष्ट्रीय महामार्गाऐवजी प्राधिकरणाचे नियम लावले आहेत. त्यामुळे शहराजवळील या गावांना ८ ते १० लाख रुपये दर अपेक्षित असताना त्यांच्या निम्म्यानेही दर निश्चित होत नाही. याउलट डोंगरभागातील काही गावे महामार्ग प्रकल्पात जात असल्यामुळे त्यांना चांगले दर मिळत आहेत.

शासनाकडे सादर अहवाल लालफीतीतयाविरुद्ध संबंधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली होती, परंतु याकडे कुणी लक्ष दिलेले नाही. भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांनी हा विषय सध्या केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेला आहे. तेथे न्याय मिळाला नाही तर या जमिनी मातीमोल भावाने सरकारच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. या शेतकऱ्यांना जादा दर मिळावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एक वर्षांपूर्वी शासनास अहवाल दिला आहे, मात्र तो लालफितीत अडकला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग