शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताच्या नात्यापेक्षा मायेचे नातेच सार्थ! मानस कन्येचा थाटात विवाह; कोल्हापुरातील तावडे कुटुंबीयांंचा मोठेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:28 IST

कोल्हापूर : रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळा मायेने जोडलेली नातीच किती मौल्यवान असतात, याची प्रचिती शनिवारी येथे एका लग्नसमारंभात आली. लहानपणीच निराधार झालेल्या रेश्मा दळवी हिचे येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना आणि चंद्रकांत तावडे यांनी

कोल्हापूर : रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळा मायेने जोडलेली नातीच किती मौल्यवान असतात, याची प्रचिती शनिवारी येथे एका लग्नसमारंभात आली. लहानपणीच निराधार झालेल्या रेश्मा दळवी हिचे येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना आणि चंद्रकांत तावडे यांनी अत्यंत थाटामाटात लग्न करून दिले. या मानलेल्या मुलीला सासरी पाठविताना त्यांचा ऊर भरून आला.रेश्मा राजेंद्रनगर झोपडपट्टीत जन्मलेली. घरी अठराविश्वे दारिद्र्य. एका दुर्घटनेत आईवडिलांसह बहीणही भाजून मृत्युमुखी पडल्या. रेश्मा त्यावेळी अवघी तीन वर्षांची होती. ती व तिची बहीणच कुटुंबात उरल्या. निराधार झालेल्या या दोन्ही बहिणींना कल्पना तावडे यांनी मायेचा आधार दिला. त्यांना आपल्या घरी आणले.झोपडपट्टीतील मुले शिकली, संस्कारित झाली पाहिजेत, यासाठी गेली अनेक वर्षे राजेंद्रनगर झोपडपट्टीत जाऊन ज्ञानदीप विद्यामंदिराच्या रूपाने ज्ञानाचा दिवा लावणाचे काम कल्पना तावडे यांनी केले आहे. त्यांनी या दोन्ही मुलींना शिकविले. त्यातील रेश्माने तावडे कुटुंबाला खूपच लळा लावला. रेश्माला आपलीच मुलगी म्हणून वाढविले. तिचे बारावीपर्यंत शिक्षण केले. घरात लग्नाचा विचार सुरू झाला तेव्हा ‘तुला पसंत असेल त्याच्याशी आपण लग्न करू,’ इतके स्वातंत्र्यही दिले. गोसावीवाडी (ता. कºहाड) येथील सुभाष हरिबा पवार यांचा मुलगा अजित यांच्याशी तिचे लग्न ठरले.रेश्माला लग्नात नटण्याची भारी हौस होती. तिला नववधूच्या शालूबद्दल, हिरव्या चुड्याबद्दल केवढं अप्रुप! मग हा आनंद तिला द्यायचा म्हणून तावडे कुटुंबीयांनी लग्नाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. अतिशय थाटामाटात तिचे लग्न लावून दिले. संसारसेटपासून दागिन्यांपर्यंत सगळी हौसमौज केली. तावडे दाम्पत्यासह त्यांचा मुलगा गजेंद्र, सून दीपा, मुलगी गीता हांडे यांच्यासह ज्ञानदीप विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी लग्नाची व्यवस्था आनंदाने केली.कोल्हापुरात शनिवारी कल्पना व चंद्रकांत तावडे यांची मानस कन्या रेश्मा हिचा विवाह हेळगाव-गोसावीवाडी (ता. कºहाड) येथील अजित पवार यांच्याशी अत्यंत थाटामाटात झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न