शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

माझा लढा शिवाजी पेठेतील नागरिकांशी नाही

By admin | Published: August 28, 2016 12:42 AM

चंद्रदीप नरके : काहीजण जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याची टीका

कोल्हापूर : माझा लढा हद्दवाढविरोधी आहे. शिवाजी पेठेतील नागरिकांशी नाही, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी पेठ व १८ गावांतील ग्रामीण जनता आणि पर्यायाने माझ्यामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणारे लोक कोण आहेत, याचा शिवाजी पेठेतील जनतेने गांभीर्याने विचार करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीतर्फे मेळावा झाला होता. मेळाव्यात, शिवाजी पेठेत राहून पेठेतील जनतेबाबत चुकीची वक्तव्ये केल्याबद्दल आमदार चंद्रदीप नरके यांचा निषेध नोंदवीत त्यांच्यावर प्रखर टीका केली होती. तिला आमदार नरके यांनी संयमाने उत्तर दिले. आमदार नरके म्हणाले, शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात आम्ही सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. पण सध्या हद्दवाढीबाबत महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि हद्दवाढसमर्थक यांची माझ्याविरुद्ध निरर्थक आणि संदर्भहीन वैयक्तिक टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे. माझ्यासह आमच्या नरके घराण्याच्या चार पिढ्या शिवाजी पेठेत वास्तव्यास आहेत. शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात, २० आॅगस्ट रोजी, शहराच्या लोकप्रतिनिधींनी ‘शिवाजी पेठ आली तर १८ गावांतील लोक वाहून जातील’ असे न शोभणारे वक्तव्य केले आहे. आजपर्यंत या लोकप्रतिनिधींनी व हद्दवाढसमर्थक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हीच १८ गावे शहरात समाविष्ट झाल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास होणार, असे वारंवार सांगितले आहे; पण या सभेला उपस्थित असणाऱ्या पेठेतील कोणाही नागरिक अथवा पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले नाही. शिवाजी पेठ आणि १८ गावांतील ग्रामीण जनतेचे ऋणानुबंधाचे संबंध आहेत. त्यांच्यात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हे लोकप्रतिनिधी करीत असल्याची टीका नरके यांनी केली. ६० नाले गायब, नवे रुग्णालय, नाट्यगृह नाही शहराच्या विकासाचा कारभार पाहता एकही नवे रुग्णालय अथवा नाट्यगृह बांधू शकला नाहीत, अशी टीका करीत नरके म्हणाले, नाल्यात भर टाकून ७६ नाल्यांपैकी १६ नाले आपण शिल्लक ठेवले. ड्रेनेजची दुरवस्था, केरकचरा उठावाचा बोजवारा, उपनगरांची दुरवस्था याबाबत टीका करीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कारभाराला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचीही टीका त्यांनी केली. प्रत्यक्षात महापालिकेतील नियोजनशून्य कारभारामुळेच शहराचे नाव व महानगरपालिका बदनाम झाली असल्याबाबत आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले. महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी हद्दवाढीत समाविष्ट केलेल्या गावांना चार वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने कर वाढविला जाणार असे महापालिकेचे पदाधिकारी सांगतात; पण त्याची श्वेतपत्रिका काढा. कारण शेतीवर आरक्षण टाकणार नाही म्हणून ते जाहीररीत्या बोलत असले तरी भविष्यातील विकास आराखड्यात जागांवर आरक्षण टाकण्याचा डाव या पदाधिकाऱ्यांचा दिसतो, असाही आरोप त्यांनी केला.