कस्तुरी एव्हरेस्टपासून दोन टप्पे दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:01+5:302021-05-24T04:24:01+5:30
तिने गेल्या दाेन दिवसांपासून एव्हरेस्टच्या अंतिम चढाईस सुरुवात केली आहे. तिने या दोन दिवसांच्या कालावधीत एक व दोन क्रमांकाचे ...

कस्तुरी एव्हरेस्टपासून दोन टप्पे दूर
तिने गेल्या दाेन दिवसांपासून एव्हरेस्टच्या अंतिम चढाईस सुरुवात केली आहे. तिने या दोन दिवसांच्या कालावधीत एक व दोन क्रमांकाचे महत्त्वाचे कॅम्प पूर्ण केले आहेत. अत्यंत खडतर असे हे टप्पे तिने पार केले आहेत. तिच्या या मोहिमेत एकूण १२ जण सहभागी झाले आहेत. ते सर्वजण सुखरूप आहेत. या मोहिमेसाठी भारतासह परदेशातील २५० जणांची जगभरातून निवड झाली आहे. त्यापैकी १०० जणांनी रविवारी हा स्वप्नवत ठरणारा एव्हरेस्ट सर केला. आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी रात्रीपर्यंत ती तिसऱ्या क्रमांकाचा कॅम्प ती पूर्ण करणार आहे, तर मंगळवारी रात्री पुन्हा शेवटच्या कॅम्पकडे ती रवाना होणार असून सकाळी ६ ते ८ या काळात ती एव्हरेस्टचा माथा चढून भारतीय तिरंगा तेथे फडकविणार आहे. अत्यंत खडतर अशा मोहीमेदरम्यान तिला अनंत अडचणी येत आहेत. त्यात तिच्यासाठी निसर्गानेही चांगली संधी आणली आहे. या दोन ते तीन दिवसांच्या काळात छोटी वेदर विन्डो अर्थात पोषक वातावरण तिच्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंत ती हे स्वप्नवत वाटणारे आणि गिर्यारोहकांचे स्वप्न असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करेल, असा विश्वास करवीरवासीयांसह संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
मालोजीराजे यांच्याकडून ५० हजारांची मदत
मालोजीराजे यांना कस्तुरीला तिथे आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याचे समजले. त्यांनी तत्काळ रविवारी सकाळी तिचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे पन्नास हजार रुपये देत तिच्या या मोहिमेला पाठबळ दिले. यावेळी मधुरिमाराजे, यशराजराजे, उद्योगपती तेज घाटगे, जयप्रसाद कामत उपस्थित होते.
फोटो : २३०५२०२१-कोल-सावेकर
फोटो : २३०५२०२१-कोल-कस्तुरी सावेकर
सोमवारी पहाटे ती कॅम्प तीनकडे चढाई करणार आहे. तिथे मुक्काम करून ती चौथ्या व अंतिम कॅम्पकडे मंगळवारी रात्री कूच करणार आहे. बुधवारी सकाळी ६ ते ८ या काळात ती अंतिम शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकविणार आहे.