शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

मुश्रीफ-केपींना स्वत:च्या राजकारणाचीच काळजी

By admin | Updated: April 8, 2015 00:58 IST

‘गोकुळ’चे रणांगण : पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये ही दक्षता; आता स्वतंत्र पॅनेलशिवाय पर्याय नाही

कोल्हापूर : पक्षाचे धोरण अथवा कार्यकर्त्यांना बळ देण्याचे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वत:चे राजकारण कसे सुरक्षित होईल यासाठी दबावतंत्र म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा वापर करत आहेत. आता नाक दाबल्यामुळेच त्यांना स्वतंत्र पॅनेल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने तशा हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसवर आमदार हसन मुश्रीफ यांची पकड आहे. त्यामुळे ते जी भूमिका घेतील तीच पक्षाची भूमिका असेल. परवा झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी पाठिंबा देण्याबाबत अथवा विरोध करण्याबाबत कोणतीच उघड भूमिका घेतली नाही. माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील आदींनी सत्तारुढ आघाडीला पाठिंबा द्यावा, असा आग्रह धरला. मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांची मदत झाली. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यापुरताच मुश्रीफ यांना या निवडणुकीत रस आहे. रणजित पाटील गटाचे पाठबळ हे कागल तालुक्याच्या राजकारणातील हसन मुश्रीफ यांची अपरिहार्यता आहे. रणजित पाटील हे काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हेत. खासगीत ते आपण राष्ट्रवादी पक्षाच्या जन्माअगोदरपासून ‘गोकुळ’मध्ये संचालक असल्याचे सांगतात. शिवाय मुश्रीफ यांनी वजन वापरले अथवा नाही वापरले तरी त्यावरून त्यांची उमेदवारी ठरत नाही. कारण त्यांची ‘ज्येष्ठ संचालक’ म्हणून ‘गोकुळ’च्या राजकारणात स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी त्यांच्यासाठी आग्रह हा विधानसभेतील मदतीची परतफेड एवढ्यापुरताच मर्यादित आहे. हसन मुश्रीफ हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये संधी द्या, असा आग्रह धरण्यापेक्षा ते संजय घाटगे गटाला ‘गोकुळ’मध्ये घेऊ नका म्हणून पक्षाची ताकद वापरत आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांना विधानसभा निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांच्यामुळे माजी आमदार बजरंग देसाई गटाने मदत केली परंतु तरीही ते पराभवाची त्सुनामी टाळू शकले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यादृष्टीने बिद्री साखर कारखान्याची सत्ता टिकविणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना आमदार महादेवराव महाडिक यांची रसद हवी आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक यांना दुखावण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. (प्रतिनिधी)जावई माझा भला...‘बिद्री’च्या निवडणुकीत आमदार महाडिक के.पी. यांच्या मागे राहतील आणि माजी आमदार पी. एन. पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागे असतील. कारण ‘भोगावती‘च्या निवडणुकीवरून के.पी.-मुश्रीफ यांच्याशी पी. एन. यांचा संघर्ष आहे. आता पी. एन. व महाडिक ‘गोकुळ’मध्ये एकत्र असले तरी ‘भोगावती’त मात्र महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसलाच मदत करणार, हे देखील नक्की आहे. तिथे पुन्हा के. पी. यांचेच जावई सत्तेत आहेत. त्यामुळे महाडिक यांच्या पाठिंब्याची किंमत ही के. पी. यांच्यादृष्टीने जास्त आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून ‘गोकुळ’मध्ये मिळाली तर एखादी जागा पदरात पाडून घ्यावी, नाही तर महाडिक यांच्याशी जमवून घ्यावे व जी सत्ता हातात आहे, ती कशी कायम राहील यासाठी ते धडपड करत आहेत. ‘गोकुळ’ का नको..‘गोकुळ’चा संचालक म्हणजे चार-दोन गावांत प्रभाव पाडू शकणारा नेता शिवाय आर्थिक रसदही. त्यामुळे आपल्याच तालुक्यातच पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये, असे या नेत्यांना वाटते. कागलसारख्या चुरशीच्या लढतीत तर अशा संचालकांचे महत्त्व फारच वाटते. विधानसभेला मुश्रीफ यांना रणजित पाटील यांच्या किती नाकदुऱ्या काढाव्या लागतात हा अनुभव आहेच. त्यामुळे दिलीच तर के.पी. यांच्या मुलाला संधी द्या, अशीच या दोघा नेत्यांची मागणी होती.