शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ-केपींना स्वत:च्या राजकारणाचीच काळजी

By admin | Updated: April 8, 2015 00:58 IST

‘गोकुळ’चे रणांगण : पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये ही दक्षता; आता स्वतंत्र पॅनेलशिवाय पर्याय नाही

कोल्हापूर : पक्षाचे धोरण अथवा कार्यकर्त्यांना बळ देण्याचे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वत:चे राजकारण कसे सुरक्षित होईल यासाठी दबावतंत्र म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा वापर करत आहेत. आता नाक दाबल्यामुळेच त्यांना स्वतंत्र पॅनेल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने तशा हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसवर आमदार हसन मुश्रीफ यांची पकड आहे. त्यामुळे ते जी भूमिका घेतील तीच पक्षाची भूमिका असेल. परवा झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी पाठिंबा देण्याबाबत अथवा विरोध करण्याबाबत कोणतीच उघड भूमिका घेतली नाही. माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील आदींनी सत्तारुढ आघाडीला पाठिंबा द्यावा, असा आग्रह धरला. मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांची मदत झाली. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यापुरताच मुश्रीफ यांना या निवडणुकीत रस आहे. रणजित पाटील गटाचे पाठबळ हे कागल तालुक्याच्या राजकारणातील हसन मुश्रीफ यांची अपरिहार्यता आहे. रणजित पाटील हे काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हेत. खासगीत ते आपण राष्ट्रवादी पक्षाच्या जन्माअगोदरपासून ‘गोकुळ’मध्ये संचालक असल्याचे सांगतात. शिवाय मुश्रीफ यांनी वजन वापरले अथवा नाही वापरले तरी त्यावरून त्यांची उमेदवारी ठरत नाही. कारण त्यांची ‘ज्येष्ठ संचालक’ म्हणून ‘गोकुळ’च्या राजकारणात स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी त्यांच्यासाठी आग्रह हा विधानसभेतील मदतीची परतफेड एवढ्यापुरताच मर्यादित आहे. हसन मुश्रीफ हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये संधी द्या, असा आग्रह धरण्यापेक्षा ते संजय घाटगे गटाला ‘गोकुळ’मध्ये घेऊ नका म्हणून पक्षाची ताकद वापरत आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांना विधानसभा निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांच्यामुळे माजी आमदार बजरंग देसाई गटाने मदत केली परंतु तरीही ते पराभवाची त्सुनामी टाळू शकले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यादृष्टीने बिद्री साखर कारखान्याची सत्ता टिकविणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना आमदार महादेवराव महाडिक यांची रसद हवी आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक यांना दुखावण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. (प्रतिनिधी)जावई माझा भला...‘बिद्री’च्या निवडणुकीत आमदार महाडिक के.पी. यांच्या मागे राहतील आणि माजी आमदार पी. एन. पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागे असतील. कारण ‘भोगावती‘च्या निवडणुकीवरून के.पी.-मुश्रीफ यांच्याशी पी. एन. यांचा संघर्ष आहे. आता पी. एन. व महाडिक ‘गोकुळ’मध्ये एकत्र असले तरी ‘भोगावती’त मात्र महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसलाच मदत करणार, हे देखील नक्की आहे. तिथे पुन्हा के. पी. यांचेच जावई सत्तेत आहेत. त्यामुळे महाडिक यांच्या पाठिंब्याची किंमत ही के. पी. यांच्यादृष्टीने जास्त आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून ‘गोकुळ’मध्ये मिळाली तर एखादी जागा पदरात पाडून घ्यावी, नाही तर महाडिक यांच्याशी जमवून घ्यावे व जी सत्ता हातात आहे, ती कशी कायम राहील यासाठी ते धडपड करत आहेत. ‘गोकुळ’ का नको..‘गोकुळ’चा संचालक म्हणजे चार-दोन गावांत प्रभाव पाडू शकणारा नेता शिवाय आर्थिक रसदही. त्यामुळे आपल्याच तालुक्यातच पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये, असे या नेत्यांना वाटते. कागलसारख्या चुरशीच्या लढतीत तर अशा संचालकांचे महत्त्व फारच वाटते. विधानसभेला मुश्रीफ यांना रणजित पाटील यांच्या किती नाकदुऱ्या काढाव्या लागतात हा अनुभव आहेच. त्यामुळे दिलीच तर के.पी. यांच्या मुलाला संधी द्या, अशीच या दोघा नेत्यांची मागणी होती.