शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मधील मुरुम, माती आता रस्त्यांसाठी, कोल्हापूर जिल्ह्यात लवकरच अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:54 IST

‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून उचलला जाणारा गाळ, माती, मुरुम व दगड रस्ते आणि महामार्गाच्या कामांसाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा लाभ जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही खात्यांना होणार आहे. जिल्ह्यात याबाबत लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे‘जलयुक्त’मधील मुरुम, माती आता रस्त्यांसाठीजलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभागाला होणार लाभ

प्रवीण देसाई

कोल्हापूर : ‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून उचलला जाणारा गाळ, माती, मुरुम व दगड रस्ते आणि महामार्गाच्या कामांसाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा लाभ जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही खात्यांना होणार आहे. जिल्ह्यात याबाबत लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्यभरात नाला खोलीकरण, रुंदीकरण, पाझर तलाव, साठवण तलावातून गाळ काढणे, शेततळ्यांची निर्मिती करणे अशी विविध कामे सुरू आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात रस्ते आणि महामार्गांचीही कामेही सुरू आहेत. रस्ते आणि महामार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या मुरुम, माती, दगड, आदी गौण खनिजांचा तुटवडा जाणवत आहे.

त्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभागाची सांगड घालून ‘जलयुक्त’अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये उपलब्ध होणारी मुरुम, माती, दगड, आदी सरकारकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.

या निर्णयानुसार कंत्राटदारांकडून स्वामित्वधन व अर्जशुल्क घेण्यात येणार नाही; परंतु खोदकामाच्या ठिकाणापासून प्रकल्पस्थळापर्यंत रस्ता उपलब्ध नसेल तर संबंधिताला रस्ता बनवून घ्यावा लागेल. जिल्हास्तरावर याची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ‘जलयुक्त शिवार’मधून कामे झाली आहेत. त्याचबरोबर इथून पुढेही अनेक कामांना सुरुवात होणार आहेत. त्यामुळे गौण खनिज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.

शासनाच्या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला ‘जलसंधारण’च्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

अशी होणार अंमलबजावणी

  1. - फक्त रस्त्यांच्या कामांसाठीच माती, मुरुम, दगड यांचा वापर करता येणार आहे.
  2. - रस्त्यांच्या कामासाठी उचललेली माती, मुरुमाची अन्य ठिकाणी विक्री करता येणार नाही.
  3. - रस्त्याच्या कामांसाठी विनामूल्य मुरुम, माती दिली जाणार आहे.
  4. - उत्खननात वाळू उपलब्ध झाल्यास वाळू उपसा करता येणार नाही.
  5. - क्षेत्रीय महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जागेची मोजणी करून सीमांकन केले जाणार.
  6. - सीमांकनाबाहेरील जागेचे खोदकाम केल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई होणार.
  7. - मंजुरीपेक्षा जादा खोदकाम करता येणार नाही.

 

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत काढण्यात येणारा गाळ, मुरुम, माती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी वापरावी, असा शासन निर्णय झाला आहे. याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय होऊन त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल.- बसवराज मास्तोळी,जिल्हा कृषी अधीक्षक

 

शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप काही निर्देश आलेले नाहीत. शासनाकडून याबाबत मार्गदर्शन आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.- सदाशिव साळुंखे,अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर