शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: कागल हादरले; चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, दोन मुलांचा खून, आरोपी पोलिसांत हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 11:40 IST

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्यानंतर पोलीसही हादरले

कागल : येथील गणेशनगर घरकुल वसाहतीमधील एकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला. खुनानंतर आरोपी स्वतःहून कागल पोलीस ठाण्यात हजर झाला. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्यानंतर पोलीसही हादरले. शहरात तिहेरी खुनाचा प्रकार प्रथमच घडल्याने खळबळ उडाली आहे.

प्रकाश बाळू माळी ( वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तर, गायत्री प्रकाश माळी (३०) मुलगी आदिती (१६) मुलगा कृष्णात (१२) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. आराेपी प्रकाशने हे खून मंगळवारी वेगवेगळ्या वेळी केले. दुपारी दोन वाजता त्याने पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिचा गळा आवळला. तिचा मृतदेह किचनमध्ये ठेवून घरी बसून राहिला. सायंकाळी पाच वाजता मुलगा शाळेतून आला. त्याने आईचा मृतदेह बघताच आरोपीने मुलाचाही दोरीने गळा आवळला. रात्री आठ वाजता मुलगी आदिती घरी आली. तिचाही गळा आवळला तसेच ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागताच तिच्या डोक्यात वरवंटाही घातला.

त्यानंतर तो दोन तासाने सायकलवरून पोलीस ठाण्यात गेला. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली.

वर्षभरापूर्वीच नवीन घरात

आरोपीने होमगार्ड म्हणूनही काम केले होते. हे कुटुंब कोष्टी गल्लीत राहावयास होते. नवीन घरकुल प्रकल्पात तापी इमारतीत त्यांना सदनिका मिळाल्यानंतर ते गेली वर्षभर राहावयास आले आहेत. आरोपी राजकीय व सामाजिक उपक्रमांतही हिरिरीने भाग घेत असे.

मुलांना कोण बघणार म्हणून हत्या

आरोपी प्रकाशचे पत्नीशी वारंवार भांडण होत होते. काही दिवस ती माहेरीही गेली होती. चारित्र्याच्या संशयावरून मंगळवारी दुपारीही भांडण झाले होते. मुलगा कृष्णात पायाने अपंग आहे. पत्नीला ठार मारल्यानंतर आता मुलांना कोण बघणार म्हणून आपण त्यांना मारले, असे पोलिसांना तो सांगत होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलCrime Newsगुन्हेगारी