शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

हातकणंगलेतील बेपत्ता टिंबर व्यावसायिक दीपक पटेलचा खून, चारजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 12:27 IST

दीपकचा खून १५ लाख रुपयाच्या खंडणीसाठी झाला असल्याचा संशय

हातकणंगले : येथील बेपत्ता टिंबर व्यावसायिक दीपक हिरालाल पटेल (वय ३४) याचा राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळा येथे खून करून मृतदेह शेतात पुरून त्यावर भले मोठे दगड ठेवल्याचे बुधवारी उघडकीस आले. दीपकचा खून १५ लाख रुपयाच्या खंडणीसाठी झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तब्बल अठरा दिवसानंतर या खुनाचा उलगडा करण्यात यश आले आहे. चार संशयिताना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यामुळे या खुनाला वाचा फुटली आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे एक पथक बुधवारी दुपारी दोन संशयिताना घेऊन राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये पोहचले. येथील पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्यासह पोलीस कर्मचारी के. डी. लोकरे, सुरेश मेटील, डी. बी. पाटील गुन्हे शाखा पथकाच्या मदतीने पाटपन्हाळा या अभयारण्य क्षेत्रातील घटनास्थळी पोहचले. सायंकाळी साडेपाच वाजता पाटपन्हाळाच्या पूर्वेकडील दाट जंगल आणि गव्याचा वावर असलेल्या परिसरात दरी शेजारील शेतजमिनी मध्ये दीपक पटेलचा मृतदेह पुरून त्यावर दगड ठेवल्याच्या अवस्थेत पोलिसाना मिळून आला. स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस पथक सीपीआर रुग्णालय कोल्हापूरकडे दाखल झाले.

येथील टिंबर व्यावसायिक दीपक हिरालाल पटेल हा शनिवार २६ मार्चपासून बेपत्ता आहे. त्यांचे १५ लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. अपहरण होण्यापूर्वी त्यांच्या घराची सलग तीन दिवस रेकी केली होती. त्यानंतर त्याचे अपहरण झाले. त्याला घेऊन जाणारी चारचाकी कर्नाटकातील कुर्ली -सौदलगा परिसरात बेवारस स्वरूपात मिळाली होती. त्या नंतर पोलीस तपासाची यंत्रणा गतिमान झाली होती.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने हातकणंगले पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून राधानगरी सह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच कर्नाटकातील सीमाभाग पोलिसानी पिंजून काढला होता. परंतु अपहरणकर्त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

१५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी दीपकचे अपहरण झाल्यानंतर तपास पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेतला होता. पट्टणकोडोली येथे त्याची मोटारसायकल मिळाली होती. त्याचे मोबाईलचे लोकेशन सौदलगा कर्नाटक सीमाभाग येथे होते. अपहरणानंतर सलग दोन दिवस दीपकने नातेवाईकांबरोबर बोलून १५ लाखाची व्यवस्था करावी आणि माझी सुटका करावी असे सांगितले होते.

त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. आठ दिवसापूर्वी त्यांचा मोबाईल बेळगाव -सोलापूर एसटी बसमध्ये सीटच्या खाली मिळाला होता. संकेश्वर जवळ एका जोडप्यास हा मोबाईल मिळाला तो चालू केल्यावर यावर दीपकच्या हैदराबादच्या बहिणीचा फोन आला. तिने दीपकविषयी विचारणा करताच संबंधित जोडप्याने हा फोन बसमध्ये सापडल्याचे सांगितले. हा फोन हातकणंगले पोलिसांना मिळताच मोबाईल वरील कॉल डिटेक्शनवरून तपासाची यंत्रणा गतिमान झाली आणि. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने या खुनाचा उलगडा केला. दीपक पटेलच्या मृतदेहाची रात्री उशिरा पर्यन्त सीपीआर रुग्णालयात उतरीय तपासणी सुरु होती.

मोबाईलमुळे खुन्यापर्यंत पोहोचण्यास मदत

दीपकचा मोबाईल त्यांच्या खुन्यापर्यन्त घेऊन जाण्यात यशस्वी झाला. मोबाईल सापडला त्यामुळे पोलिसानी त्यावरील रेकॉर्ड, कॉल, आणि लोकेशन तपासून अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या.

तर दीपकचा जीव वाचला असता

स्थानिक पोलीस आणि जिल्हा गुन्हे शाखा यांच्यामध्ये समन्वय नसल्याने दीपकचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला अडचणीचे ठरत होते. स्थानिक पोलीस अपहरणाच्या दिवशी तात्कळ ॲक्शन मोडवर दिसले असते तर दीपकचा जीव वाचला असता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी