शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

महापालिका सभा : पाणीपट्टी सवलतीवरून खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:33 IST

MuncipaltyCarportaion, water, meeting, kolhpurnews लॉकडाऊनमध्ये पाण्याचा वापर झाला नसल्याने व्यापाऱ्यांना पाणीपट्टीत सवलत देण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी महापालिका सभेत प्रशासनाची खरडपट्टी करण्यात आली. महापूर येऊन वर्ष झाले तरी पूरग्रस्तांची महिन्यांची पाणीपट्टी सवलत मिळालेली नाही, असे असताना व्यापाऱ्यांना सवलत देण्यासाठी प्रशासनाचा आग्रह का आहे. व्यापाऱ्यांचे हित पाहण्यापेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, अशा शब्दांत प्रशासनाला सुनावले. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.

ठळक मुद्दे महापालिका सभा : पाणीपट्टी सवलतीवरून खरडपट्टी व्यापाऱ्यांपेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये पाण्याचा वापर झाला नसल्याने व्यापाऱ्यांना पाणीपट्टीत सवलत देण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी महापालिका सभेत प्रशासनाची खरडपट्टी करण्यात आली. महापूर येऊन वर्ष झाले तरी पूरग्रस्तांची महिन्यांची पाणीपट्टी सवलत मिळालेली नाही, असे असताना व्यापाऱ्यांना सवलत देण्यासाठी प्रशासनाचा आग्रह का आहे. व्यापाऱ्यांचे हित पाहण्यापेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, अशा शब्दांत प्रशासनाला सुनावले. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.जलअभियंता भास्कर कुंभार यांनी लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांची व्यवसाय बंद असल्याने हा प्रस्ताव आणल्याचे सांगितले. तीन हजार व्यापाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असून त्यांना ७२ लाखांची सवलत दिली जाणार आहे. १२ हजार ५०० पूरग्रस्तांना एक महिन्यांची पाणीपट्टीत सवलत दिली जात असल्याचे स्पष्ट केले.गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, १०० टक्के व्यवसाय बंद असणाऱ्यांचा यामध्ये समावेश असावा. रुग्णालयांना यामधून वगळण्यात यावे. सदस्या रूपाराणी निकम यांनी व्यापाऱ्यांपेक्षा सामान्य नागरिकांचा विचार करावा. झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या पूरग्रस्तांना एक रुपयाचीही सवलत मिळाली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले.देशमुख, ठाणेकर यांच्यात खडाजंगीगटनेते अजित ठाणेकर म्हणाले, ज्यांची मीटर बंद दाखवून किमान बिल आकारणी होते, फुकट आणि चोरून पाणी वापर करतात. अशांना सवलत देऊ नये, अशी सूचना केली. यावर गटनेते शारंगधर देशमुख भडकले. ज्यांचे व्यवसाय बंद होते, त्यांना सवलत दिलीच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. महापुरातील नुकसान झालेल्या नागरिकांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यावरूनही वादावादी झाली. ५० नागरिकांसाठी १२ हजार नागरिकांची सवलत देण्याचे थांबवू नये, असेही देशमुख यांनी म्हटले. यावर महापौर आजरेकर यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या अर्जांचा विचार करावा,असे आदेश दिले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरwater shortageपाणीकपात