शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

महापालिका सभा : पाणीपट्टी सवलतीवरून खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:33 IST

MuncipaltyCarportaion, water, meeting, kolhpurnews लॉकडाऊनमध्ये पाण्याचा वापर झाला नसल्याने व्यापाऱ्यांना पाणीपट्टीत सवलत देण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी महापालिका सभेत प्रशासनाची खरडपट्टी करण्यात आली. महापूर येऊन वर्ष झाले तरी पूरग्रस्तांची महिन्यांची पाणीपट्टी सवलत मिळालेली नाही, असे असताना व्यापाऱ्यांना सवलत देण्यासाठी प्रशासनाचा आग्रह का आहे. व्यापाऱ्यांचे हित पाहण्यापेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, अशा शब्दांत प्रशासनाला सुनावले. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.

ठळक मुद्दे महापालिका सभा : पाणीपट्टी सवलतीवरून खरडपट्टी व्यापाऱ्यांपेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये पाण्याचा वापर झाला नसल्याने व्यापाऱ्यांना पाणीपट्टीत सवलत देण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी महापालिका सभेत प्रशासनाची खरडपट्टी करण्यात आली. महापूर येऊन वर्ष झाले तरी पूरग्रस्तांची महिन्यांची पाणीपट्टी सवलत मिळालेली नाही, असे असताना व्यापाऱ्यांना सवलत देण्यासाठी प्रशासनाचा आग्रह का आहे. व्यापाऱ्यांचे हित पाहण्यापेक्षा पूरग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, अशा शब्दांत प्रशासनाला सुनावले. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.जलअभियंता भास्कर कुंभार यांनी लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांची व्यवसाय बंद असल्याने हा प्रस्ताव आणल्याचे सांगितले. तीन हजार व्यापाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असून त्यांना ७२ लाखांची सवलत दिली जाणार आहे. १२ हजार ५०० पूरग्रस्तांना एक महिन्यांची पाणीपट्टीत सवलत दिली जात असल्याचे स्पष्ट केले.गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, १०० टक्के व्यवसाय बंद असणाऱ्यांचा यामध्ये समावेश असावा. रुग्णालयांना यामधून वगळण्यात यावे. सदस्या रूपाराणी निकम यांनी व्यापाऱ्यांपेक्षा सामान्य नागरिकांचा विचार करावा. झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या पूरग्रस्तांना एक रुपयाचीही सवलत मिळाली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले.देशमुख, ठाणेकर यांच्यात खडाजंगीगटनेते अजित ठाणेकर म्हणाले, ज्यांची मीटर बंद दाखवून किमान बिल आकारणी होते, फुकट आणि चोरून पाणी वापर करतात. अशांना सवलत देऊ नये, अशी सूचना केली. यावर गटनेते शारंगधर देशमुख भडकले. ज्यांचे व्यवसाय बंद होते, त्यांना सवलत दिलीच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. महापुरातील नुकसान झालेल्या नागरिकांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यावरूनही वादावादी झाली. ५० नागरिकांसाठी १२ हजार नागरिकांची सवलत देण्याचे थांबवू नये, असेही देशमुख यांनी म्हटले. यावर महापौर आजरेकर यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या अर्जांचा विचार करावा,असे आदेश दिले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरwater shortageपाणीकपात