शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

मुंबईचे विमान रद्द झाल्याने ८५ प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 18:00 IST

खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून येणारे विमान रद्द झाल्याने बुधवारी ८५ प्रवाशांना फटका बसला. अचानक फेरी रद्द केल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देमुंबईचे विमान रद्द झाल्याने ८५ प्रवाशांना फटकातांत्रिक अडचणीमुळे कंपनीचा निर्णय; तिकिटाचे पैसे परत

कोल्हापूर : खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून येणारे विमान रद्द झाल्याने बुधवारी ८५ प्रवाशांना फटका बसला. अचानक फेरी रद्द केल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.ट्रूजेट कंपनीचे विमान अहमदाबादहून जळगावला येते. तेथून मुंबई आणि मुंबईमधून हे विमान कोल्हापूरला येते. मात्र, खराब हवामानामुळे अहमदाबाद आणि जळगावहून मुंबईला विमान उशिरा आले. त्यामुळे मुंबईहून विमान निघाल्यास ते सायंकाळी साडेपाचनंतर पोहोचणार होते.

इतक्या वेळाने विमान पोहोचल्यास कोल्हापुरातून अंधारातून उड्डाण करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे कंपनीने कोल्हापूर फेरी रद्द केली. त्याचा फटका मुंबईहून येणाऱ्या ३८ आणि कोल्हापूरमधून जाणाऱ्या ४७ प्रवाशांना बसला. ज्या प्रवाशांना दुसऱ्या दिवशीच्या विमानाने जायचे होते, त्यांना त्या दृष्टीने तिकीट देण्यात आले. ज्यांना तिकिटाचे पैसे हवे होते, त्यांना ते देण्यात आले.

दरम्यान, मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यानंतर नियमितपणे सेवा पुरविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी मात्र, खराब हवामानामुळे विमान एक तास उशिरा कोल्हापुरात आले होते.

खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून कोल्हापूरला येणारे विमान रद्द करण्यात आले. ज्या प्रवाशांनी तिकिटाचे पैसे अथवा दुसऱ्या दिवसाचे तिकीट मागितले, त्यांना ते देण्यात आले.- रणजितकुमार, कोल्हापूरचे व्यवस्थापक, ट्रूजेट कंपनी 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर