शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

कितीही दडपशाही करा, आंदोलन थांबणार नाही सकल मराठा समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 10:05 IST

‘कितीही दडपशाही करा, आरक्षणासाठीचे आंदोलन आता थांबणार नाही. फसवणूक केली तर याद राखा,’ असा इशारा सकल मराठा समाजाने कोल्हापुरात दिला. सरकारची भूमिका दिशाभूल करणारी असल्याने संपूर्ण राज्यातून सोमवारी

ठळक मुद्देराजर्षी शाहूंच्या पुतळ्याभोवती ‘गाडी रिंगण’करून लढा सुरूसरकार आम्हाला आरक्षण देणार का? याबाबत शंका असल्याने मुंबईत आंदोलन केले जाणार आहे.

कोल्हापूर : ‘कितीही दडपशाही करा, आरक्षणासाठीचे आंदोलन आता थांबणार नाही. फसवणूक केली तर याद राखा,’ असा इशारा सकल मराठा समाजाने कोल्हापुरात दिला. सरकारची भूमिका दिशाभूल करणारी असल्याने संपूर्ण राज्यातून सोमवारी (दि. २६) मंत्रालयावर धडक गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. या लढ्याची सुरुवात मराठा समाजाने गुरुवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती चारचाकी वाहनांनी ‘गाडी रिंगण’द्वारे केली.

या ‘गाडी रिंगण’ आंदोलनासाठी राजर्षी शाहूंच्या पुतळ्याच्या परिसरात व्यासपीठ घालण्यास पोलिसांनी रोखले. त्यावर सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी पालकमंत्री, राज्य सरकारसह पोलिसांचा निषेध केला. यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास सकल मराठा समाज राजर्षी शाहंूच्या पुतळ्याजवळ जमला. त्या ठिकाणी ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘एक मराठा लाख मराठा’ असा घोषणा देत ठिय्या मारला. यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या बदलत्या भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, एक डिसेंबरला जल्लोष करा आणि पालकमंत्री पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतात की, कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण टिकू दे. काही मंत्र्यांनी सांगितले की, आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल वाचलेला नाही. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका आणि आरक्षणाची टक्केवारी, ते केंद्रीय परीक्षांसाठी लागू असणार का? हे स्पष्ट होत नाही. सध्या अधिवेशन सुरू असल्याने सरकारने हा अहवाल सभागृहात ठेवून स्पष्टीकरण द्यावे. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करून पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजप सरकार डाव आखत आहे.

आरक्षणाबाबत सरकार खोटे बोलत आहे. त्याचा निषेध करण्यासह आरक्षणाचा हक्क मिळविण्यासाठी पुन्हा आंदोलनाची ठिणगी कोल्हापुरात पडली आहे. आपण सर्वजण आरक्षण मिळविण्यासाठी ताकदीने लढा देऊया. वसंतराव मुळीक म्हणाले, मंत्रिगटाच्या उपसमितीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दि. २६ नोव्हेंबरला मुंबईत ‘गाडी मोर्चा’ होणारच आहे. दिलीप देसाई म्हणाले, पालकमंत्री, सरकारने कितीही दडपशाही केली, तरी आरक्षणासाठीचे आंदोलन थांबणार नाही. राजर्षी शाहूंच्या चरणी प्रार्थना करून आम्ही पुन्हा लढा सुरू केला आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत आहे. सरकार आम्हाला आरक्षण देणार का? याबाबत शंका असल्याने मुंबईत आंदोलन केले जाणार आहे.

या ‘गाडी रिंगणा’च्या प्रारंभी शिवशाहीर दिलीप सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. यानंतर उपस्थित मराठा बांधवांनी ‘राजर्षी शाहूं’च्या पुतळ्याभोवती चारचाकी वाहनांचे रिंगण करून प्रदक्षिणा घातली. या आंदोलनात कादर मलबारी, जयेश कदम, अजित राऊत, सुभाष जाधव, रविकिरण इंगवले, विद्या साळोखे, संयोगिता देसाई, शशिकांत पाटील, सचिन तोडकर, किशोर घाटगे, सुरेश कुराडे, संजय पाटील, अवधूत पाटील, स्वप्निल पार्टे, किरण पडवळ, कमलाकर किलकिले, तौफिक मुल्लाणी, दीपक थोरात, आदी सहभागी झाले.

एवढा बंदोबस्त कशाला?या आंदोलनात आमदार सतेज पाटील म्हणाले, मराठा समाजाकडून शांततेत आंदोलन केले जाते. त्यामुळे आज या ठिकाणी एवढा बंदोबस्त कशाला ठेवला आहे? त्याऐवजी शहरात होणाऱ्या घरफोड्या रोखण्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. दडपशाहीने आंदोलन थांबत नाही. मागण्या मान्य करूनच आंदोलन थांबविता येते, हे सरकारने लक्षात घ्यावे. जिल्ह्यातील आम्ही सर्व आमदार मराठा समाजाबरोबर आहेत.दसरा चौकातून निघणार ‘गाडी मोर्चा’दसरा चौकात सोमवारी (दि. २६) सकाळी नऊ वाजता मुंबईतील गाडी मोर्चासाठी समाजबांधव निघणार आहेत. पुढे त्यामध्ये सांगली, साताºयातील बांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनाबाबत समाजात चेतना निर्माण करण्यासह सरकारला इशारा देण्यासाठी कोल्हापुरात ‘गाडी रिंगण’ आंदोलन करण्यात आले असल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर