शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

कितीही दडपशाही करा, आंदोलन थांबणार नाही सकल मराठा समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 10:05 IST

‘कितीही दडपशाही करा, आरक्षणासाठीचे आंदोलन आता थांबणार नाही. फसवणूक केली तर याद राखा,’ असा इशारा सकल मराठा समाजाने कोल्हापुरात दिला. सरकारची भूमिका दिशाभूल करणारी असल्याने संपूर्ण राज्यातून सोमवारी

ठळक मुद्देराजर्षी शाहूंच्या पुतळ्याभोवती ‘गाडी रिंगण’करून लढा सुरूसरकार आम्हाला आरक्षण देणार का? याबाबत शंका असल्याने मुंबईत आंदोलन केले जाणार आहे.

कोल्हापूर : ‘कितीही दडपशाही करा, आरक्षणासाठीचे आंदोलन आता थांबणार नाही. फसवणूक केली तर याद राखा,’ असा इशारा सकल मराठा समाजाने कोल्हापुरात दिला. सरकारची भूमिका दिशाभूल करणारी असल्याने संपूर्ण राज्यातून सोमवारी (दि. २६) मंत्रालयावर धडक गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. या लढ्याची सुरुवात मराठा समाजाने गुरुवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती चारचाकी वाहनांनी ‘गाडी रिंगण’द्वारे केली.

या ‘गाडी रिंगण’ आंदोलनासाठी राजर्षी शाहूंच्या पुतळ्याच्या परिसरात व्यासपीठ घालण्यास पोलिसांनी रोखले. त्यावर सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी पालकमंत्री, राज्य सरकारसह पोलिसांचा निषेध केला. यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास सकल मराठा समाज राजर्षी शाहंूच्या पुतळ्याजवळ जमला. त्या ठिकाणी ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘एक मराठा लाख मराठा’ असा घोषणा देत ठिय्या मारला. यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या बदलत्या भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, एक डिसेंबरला जल्लोष करा आणि पालकमंत्री पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतात की, कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण टिकू दे. काही मंत्र्यांनी सांगितले की, आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल वाचलेला नाही. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका आणि आरक्षणाची टक्केवारी, ते केंद्रीय परीक्षांसाठी लागू असणार का? हे स्पष्ट होत नाही. सध्या अधिवेशन सुरू असल्याने सरकारने हा अहवाल सभागृहात ठेवून स्पष्टीकरण द्यावे. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करून पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजप सरकार डाव आखत आहे.

आरक्षणाबाबत सरकार खोटे बोलत आहे. त्याचा निषेध करण्यासह आरक्षणाचा हक्क मिळविण्यासाठी पुन्हा आंदोलनाची ठिणगी कोल्हापुरात पडली आहे. आपण सर्वजण आरक्षण मिळविण्यासाठी ताकदीने लढा देऊया. वसंतराव मुळीक म्हणाले, मंत्रिगटाच्या उपसमितीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दि. २६ नोव्हेंबरला मुंबईत ‘गाडी मोर्चा’ होणारच आहे. दिलीप देसाई म्हणाले, पालकमंत्री, सरकारने कितीही दडपशाही केली, तरी आरक्षणासाठीचे आंदोलन थांबणार नाही. राजर्षी शाहूंच्या चरणी प्रार्थना करून आम्ही पुन्हा लढा सुरू केला आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत आहे. सरकार आम्हाला आरक्षण देणार का? याबाबत शंका असल्याने मुंबईत आंदोलन केले जाणार आहे.

या ‘गाडी रिंगणा’च्या प्रारंभी शिवशाहीर दिलीप सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. यानंतर उपस्थित मराठा बांधवांनी ‘राजर्षी शाहूं’च्या पुतळ्याभोवती चारचाकी वाहनांचे रिंगण करून प्रदक्षिणा घातली. या आंदोलनात कादर मलबारी, जयेश कदम, अजित राऊत, सुभाष जाधव, रविकिरण इंगवले, विद्या साळोखे, संयोगिता देसाई, शशिकांत पाटील, सचिन तोडकर, किशोर घाटगे, सुरेश कुराडे, संजय पाटील, अवधूत पाटील, स्वप्निल पार्टे, किरण पडवळ, कमलाकर किलकिले, तौफिक मुल्लाणी, दीपक थोरात, आदी सहभागी झाले.

एवढा बंदोबस्त कशाला?या आंदोलनात आमदार सतेज पाटील म्हणाले, मराठा समाजाकडून शांततेत आंदोलन केले जाते. त्यामुळे आज या ठिकाणी एवढा बंदोबस्त कशाला ठेवला आहे? त्याऐवजी शहरात होणाऱ्या घरफोड्या रोखण्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. दडपशाहीने आंदोलन थांबत नाही. मागण्या मान्य करूनच आंदोलन थांबविता येते, हे सरकारने लक्षात घ्यावे. जिल्ह्यातील आम्ही सर्व आमदार मराठा समाजाबरोबर आहेत.दसरा चौकातून निघणार ‘गाडी मोर्चा’दसरा चौकात सोमवारी (दि. २६) सकाळी नऊ वाजता मुंबईतील गाडी मोर्चासाठी समाजबांधव निघणार आहेत. पुढे त्यामध्ये सांगली, साताºयातील बांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनाबाबत समाजात चेतना निर्माण करण्यासह सरकारला इशारा देण्यासाठी कोल्हापुरात ‘गाडी रिंगण’ आंदोलन करण्यात आले असल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर