शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

बहुतांश प्रवाशांना रेल्वेस्थानकावरील विश्रांतिगृहाची माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:14 IST

वर्षभरापूर्वी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे सुरू केलेली विश्रांतिगृहाची सुविधा चांगली आहे. पण, बहुतांश प्रवाशांना या ठिकाणी संबंधित सुविधा उपलब्ध असल्याची माहितीच नसल्याचे चित्र आहे. या सुविधेसाठी मध्य रेल्वेने निर्धारित केलेल्या वेळेमुळे प्रवाशांना आर्थिक फटकादेखील बसत आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देबहुतांश प्रवाशांना रेल्वेस्थानकावरील विश्रांतिगृहाची माहितीच नाहीप्रवाशांना निर्धारित वेळेचा फटका

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे सुरू केलेली विश्रांतिगृहाची सुविधा चांगली आहे. पण, बहुतांश प्रवाशांना या ठिकाणी संबंधित सुविधा उपलब्ध असल्याची माहितीच नसल्याचे चित्र आहे. या सुविधेसाठी मध्य रेल्वेने निर्धारित केलेल्या वेळेमुळे प्रवाशांना आर्थिक फटकादेखील बसत आहे.मुंबई, पुणे येथील स्थानकावरील सुविधेच्या धर्तीवर कोल्हापूर स्थानकावर फेब्रुवारी २०१९ मध्ये विश्रांतिगृहाची सुविधा सुरू केली. २४ जणांसाठीची विश्रांती घेण्याची व्यवस्था तेथे आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने या विश्रांतिगृहात लहान-लहान कक्ष तयार केले आहेत. त्यामध्ये संंबंधित प्रवाशांना त्यांच्या प्रवासी बॅगा ठेवता येतात. विश्रांतीसाठी पलंग आहेत.स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. या सुविधेचा बारा तास लाभ घेण्यासाठी ९० रुपये आणि चोवीस तासांसाठी १५० रुपये शुल्क आकारले जाते. आतापर्यंत साधारणत: सुमारे साडेतीन हजार प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेतील प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणारी आहे. मात्र, त्याची रेल्वेस्थानकावर योग्य स्वरूपात प्रवाशांना माहिती मिळत नसल्याचे वास्तव आहे.

ही सुविधा उपलब्ध असल्याची, वेळ आणि शुल्काबाबतची माहिती देणारे फलक संबंधित विश्रांतिगृह आणि मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांच्या कार्यालयात आहेत. ते प्रवाशांच्या पटकन लक्षात येत नाहीत. सकाळी आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ अशी या सुविधेची वेळ आहे.

हरिप्रिया एक्स्प्रेस दुपारी चारनंतर येते. त्यातील प्रवाशांना या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असेल, तर त्यांना चोवीस तासांचे शुल्क भरावे लागते. त्यामुळे दुपारी आणि रात्री येणारे रेल्वे प्रवासी या सुविधेचा लाभ घेण्याचे टाळत आहेत. तासानुसार शुल्क आकारणी करावी, अशी त्यांच्यातून मागणी होत आहे. या विश्रांतिगृहात गरम पाणी देण्यासाठी रेल्वे विभागाने तेथे सोलर यंत्रणा बसविली आहे; पण ती अद्याप सुरू झालेली नाही. गरम पाणी मिळत नसल्याने अनेक प्रवासी येथे येणे टाळत आहेत.

स्पष्ट माहिती मिळावीस्थानकाच्या प्रवेशद्वारात, तिकीट विक्री, आरक्षण कक्षात आणि प्लॅटफॉर्मवर दोन-तीन ठिकाणी या विश्रांतिगृहाची माहिती देणारे मोठे फलक लावण्यात यावेत. त्यातून या सुविधेची स्पष्टपणे माहिती देण्यात यावी.

या विश्रांतिगृहाची सुविधा प्रवाशांसाठी उपयोगी ठरणारी आहे. या सुविधेची माहिती रेल्वे विभागाने प्रवाशांना देणे आवश्यक आहे. त्यातून प्रवाशांची कमी खर्चात विश्रांतीची सोय होईल आणि रेल्वेचे उत्पन्नदेखील वाढेल.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आॅनलाईन माहिती आणि नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. स्थानकावर फलक लावले आहेत. आवश्यकता वाटल्यास या सुविधेची माहिती देणारे आणखी फलक लावले जातील.-ए. आय. फर्नांडीस, स्थानक प्रबंधक.

 

 

 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर