शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बहुतांश प्रवाशांना रेल्वेस्थानकावरील विश्रांतिगृहाची माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:14 IST

वर्षभरापूर्वी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे सुरू केलेली विश्रांतिगृहाची सुविधा चांगली आहे. पण, बहुतांश प्रवाशांना या ठिकाणी संबंधित सुविधा उपलब्ध असल्याची माहितीच नसल्याचे चित्र आहे. या सुविधेसाठी मध्य रेल्वेने निर्धारित केलेल्या वेळेमुळे प्रवाशांना आर्थिक फटकादेखील बसत आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देबहुतांश प्रवाशांना रेल्वेस्थानकावरील विश्रांतिगृहाची माहितीच नाहीप्रवाशांना निर्धारित वेळेचा फटका

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे सुरू केलेली विश्रांतिगृहाची सुविधा चांगली आहे. पण, बहुतांश प्रवाशांना या ठिकाणी संबंधित सुविधा उपलब्ध असल्याची माहितीच नसल्याचे चित्र आहे. या सुविधेसाठी मध्य रेल्वेने निर्धारित केलेल्या वेळेमुळे प्रवाशांना आर्थिक फटकादेखील बसत आहे.मुंबई, पुणे येथील स्थानकावरील सुविधेच्या धर्तीवर कोल्हापूर स्थानकावर फेब्रुवारी २०१९ मध्ये विश्रांतिगृहाची सुविधा सुरू केली. २४ जणांसाठीची विश्रांती घेण्याची व्यवस्था तेथे आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने या विश्रांतिगृहात लहान-लहान कक्ष तयार केले आहेत. त्यामध्ये संंबंधित प्रवाशांना त्यांच्या प्रवासी बॅगा ठेवता येतात. विश्रांतीसाठी पलंग आहेत.स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. या सुविधेचा बारा तास लाभ घेण्यासाठी ९० रुपये आणि चोवीस तासांसाठी १५० रुपये शुल्क आकारले जाते. आतापर्यंत साधारणत: सुमारे साडेतीन हजार प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेतील प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणारी आहे. मात्र, त्याची रेल्वेस्थानकावर योग्य स्वरूपात प्रवाशांना माहिती मिळत नसल्याचे वास्तव आहे.

ही सुविधा उपलब्ध असल्याची, वेळ आणि शुल्काबाबतची माहिती देणारे फलक संबंधित विश्रांतिगृह आणि मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांच्या कार्यालयात आहेत. ते प्रवाशांच्या पटकन लक्षात येत नाहीत. सकाळी आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ अशी या सुविधेची वेळ आहे.

हरिप्रिया एक्स्प्रेस दुपारी चारनंतर येते. त्यातील प्रवाशांना या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असेल, तर त्यांना चोवीस तासांचे शुल्क भरावे लागते. त्यामुळे दुपारी आणि रात्री येणारे रेल्वे प्रवासी या सुविधेचा लाभ घेण्याचे टाळत आहेत. तासानुसार शुल्क आकारणी करावी, अशी त्यांच्यातून मागणी होत आहे. या विश्रांतिगृहात गरम पाणी देण्यासाठी रेल्वे विभागाने तेथे सोलर यंत्रणा बसविली आहे; पण ती अद्याप सुरू झालेली नाही. गरम पाणी मिळत नसल्याने अनेक प्रवासी येथे येणे टाळत आहेत.

स्पष्ट माहिती मिळावीस्थानकाच्या प्रवेशद्वारात, तिकीट विक्री, आरक्षण कक्षात आणि प्लॅटफॉर्मवर दोन-तीन ठिकाणी या विश्रांतिगृहाची माहिती देणारे मोठे फलक लावण्यात यावेत. त्यातून या सुविधेची स्पष्टपणे माहिती देण्यात यावी.

या विश्रांतिगृहाची सुविधा प्रवाशांसाठी उपयोगी ठरणारी आहे. या सुविधेची माहिती रेल्वे विभागाने प्रवाशांना देणे आवश्यक आहे. त्यातून प्रवाशांची कमी खर्चात विश्रांतीची सोय होईल आणि रेल्वेचे उत्पन्नदेखील वाढेल.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आॅनलाईन माहिती आणि नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. स्थानकावर फलक लावले आहेत. आवश्यकता वाटल्यास या सुविधेची माहिती देणारे आणखी फलक लावले जातील.-ए. आय. फर्नांडीस, स्थानक प्रबंधक.

 

 

 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर