शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

‘स्वाभिमानी’ची आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:07 IST

गेली महिनाभर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पायाला भिंगरी लावून बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली आहे.

कोल्हापूर : चालू गळीत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, वीजबिलांतील त्रुटी दूर करा, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांसह आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला जाणार असून, त्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे. चालू हंगामात एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी संघटनेने केली होती. सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे, मात्र उर्वरित दोनशे रुपये कधी देणार, अशी विचारणा संघटनेने केली आहे. वीजबिले भरण्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असताना त्यांच्या प्रश्नांबाबत मात्र महावितरण उदासीन आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

दुपारी १२ वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून, राजाराम महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक दिली जाणार आहे.

मोर्चाची महिनाभर तयारी

गेली महिनाभर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पायाला भिंगरी लावून बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली आहे. त्यामुळे मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी, वीजग्राहक सहभागी होतील, असा दावा ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी