शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

ऑक्टोबर महिन्यात मृग मोेहरला, कोल्हापुरात दिवसभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 10:46 IST

raun, kolhapurnews, कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यात मृग मोहरल्यासारखे वातावरण आहे. या पावसाने भात, भुईमूग, सोयाबीन पिके पाण्यात गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार (दि. १७) पर्यंत असाच पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्दे ऑक्टोबर महिन्यात मृग मोेहरला, कोल्हापुरात दिवसभर जोरदार पाऊस शनिवारपर्यंत पाऊस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यात मृग मोहरल्यासारखे वातावरण आहे. या पावसाने भात, भुईमूग, सोयाबीन पिके पाण्यात गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार (दि. १७) पर्यंत असाच पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.परतीचा पाऊस हा वळवासारखा लागतो. जिथे पडेल तिथे पडेल असाच असतो. मात्र बुधवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस दिवसभर आहे. मृगाच्या नक्षत्राप्रमाणे आता वातावरण आहे. एकसारखी रिपरिप सुरू राहिली. सध्या भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस आले आहे. पावसामुळे शिवारांत पिकांवर पाणी उभे राहिल्याने हातातोंडाला आलेली पिके खराब होणार, हे आता निश्चित आहे.हंगाम लांबणीवर पडणारराज्य शासनाने यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कर्नाटकात लवकर हंगाम सुरू होत असल्याने सीमाभागासह जिल्ह्यातील काही कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू होतात. मात्र सध्या पावसाचा जोर पाहता किमान दहा-बारा दिवस हंगाम पुढे जाणार, हे निश्चित आहे.पावसाला थंडीसकाळपासून एकसारखी रिपरिप सुरू आहे. पावसाबरोबर वातावरणात कमालीचा गारठा असल्याने दिवसभर अंगातून थंडी गेली नाही. निरुत्साही वातावरणामुळे घराबाहेर पडावेसे वाटत नव्हते. कोल्हापूर शहरात रिपरिप असल्याने दुकानात गर्दी कमी होती, अनेक ठिकाणी बाजारपेठा ओस पडल्यासारख्या होत्या.धरणातून विसर्ग सुरूजिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग सुरू झाला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ४००. कोयनेतून ८३५३, तर अलमट्टीतून ८७ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.उद्यापासून वादळाची तीव्रता कमीबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाला. पुढे त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले. हे वादळ बुधवारी आंध्रप्रदेश मध्ये होते. ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागले आहे. आज, गुरुवारी ते मुंबई येथे धडकणार आहे. उद्या, शुक्रवारपासून ते अरबी समुद्राकडे आगेकूच करील आणि शनिवारी (दि. १७) ते अरबी समुद्रात जाणार आहे. साधारणत: शुक्रवार (दि. १६) पासून वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर पाऊसही थांबेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर