शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

ऑक्टोबर महिन्यात मृग मोेहरला, कोल्हापुरात दिवसभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 10:46 IST

raun, kolhapurnews, कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यात मृग मोहरल्यासारखे वातावरण आहे. या पावसाने भात, भुईमूग, सोयाबीन पिके पाण्यात गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार (दि. १७) पर्यंत असाच पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्दे ऑक्टोबर महिन्यात मृग मोेहरला, कोल्हापुरात दिवसभर जोरदार पाऊस शनिवारपर्यंत पाऊस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यात मृग मोहरल्यासारखे वातावरण आहे. या पावसाने भात, भुईमूग, सोयाबीन पिके पाण्यात गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार (दि. १७) पर्यंत असाच पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.परतीचा पाऊस हा वळवासारखा लागतो. जिथे पडेल तिथे पडेल असाच असतो. मात्र बुधवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस दिवसभर आहे. मृगाच्या नक्षत्राप्रमाणे आता वातावरण आहे. एकसारखी रिपरिप सुरू राहिली. सध्या भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस आले आहे. पावसामुळे शिवारांत पिकांवर पाणी उभे राहिल्याने हातातोंडाला आलेली पिके खराब होणार, हे आता निश्चित आहे.हंगाम लांबणीवर पडणारराज्य शासनाने यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कर्नाटकात लवकर हंगाम सुरू होत असल्याने सीमाभागासह जिल्ह्यातील काही कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू होतात. मात्र सध्या पावसाचा जोर पाहता किमान दहा-बारा दिवस हंगाम पुढे जाणार, हे निश्चित आहे.पावसाला थंडीसकाळपासून एकसारखी रिपरिप सुरू आहे. पावसाबरोबर वातावरणात कमालीचा गारठा असल्याने दिवसभर अंगातून थंडी गेली नाही. निरुत्साही वातावरणामुळे घराबाहेर पडावेसे वाटत नव्हते. कोल्हापूर शहरात रिपरिप असल्याने दुकानात गर्दी कमी होती, अनेक ठिकाणी बाजारपेठा ओस पडल्यासारख्या होत्या.धरणातून विसर्ग सुरूजिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग सुरू झाला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ४००. कोयनेतून ८३५३, तर अलमट्टीतून ८७ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.उद्यापासून वादळाची तीव्रता कमीबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाला. पुढे त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले. हे वादळ बुधवारी आंध्रप्रदेश मध्ये होते. ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागले आहे. आज, गुरुवारी ते मुंबई येथे धडकणार आहे. उद्या, शुक्रवारपासून ते अरबी समुद्राकडे आगेकूच करील आणि शनिवारी (दि. १७) ते अरबी समुद्रात जाणार आहे. साधारणत: शुक्रवार (दि. १६) पासून वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर पाऊसही थांबेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर