शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

वधू दाखवतो असे सांगून पैसे उकळणारे रॅकेट, कोल्हापुरातील तरुणांची फसवणूक 

By भीमगोंड देसाई | Updated: March 31, 2023 12:04 IST

अब्रू जाईल म्हणून तक्रार नाही

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील अनाथाश्रमात सुंदर मुलींचे स्थळ असल्याचे खोटे सांगून विवाहेच्छुकांकडून पाच हजार रुपये उकळण्याचे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटमध्ये महिलांचाही समावेश असल्याचे पुढे येत आहे. समाजमाध्यमातून लग्नासाठी मुली पाहणाऱ्या तरुणांना जाळ्यात ओढायचे आणि पैसे गोळा करायचे, असा जोरदार धंदा सुरू आहे. यामध्ये शहर आणि जिल्ह्यातील अनेक तरुण फसले आहेत.शाहूवाडीत एक आश्रम आहे. तेथील आश्रमात मुलगी पाहायला जाण्यासाठी पाच हजार रुपये फी आहे, असे सांगून फसवणूक केली जात आहे. यासाठी समाजमाध्यमावर ‘अनाथ आश्रम विवाह’ या नावाने पेज तयार करून मुली पाहणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचले जात आहे. या पेजवरील मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यानंतर महिला बोलते. ती शाहूवाडीतील अनाथाश्रमात मुली आहेत. तुम्हाला मुलगी पाहण्यासाठी यायचे असेल तर पाच हजार रुपये फी भरावी लागेल, असे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित तरुणाच्या व्हाॅट्सॲपवर सुंदर मुलीचा फोटो, तिचा बायोडेटा पाठविला जातो.फोटोमध्ये मुलगी सुुंदर दिसल्यानंतर तरुण तातडीने मुलगी पसंत आहे, असा संदेश व्हाॅट्सॲपवर पाठवतो. त्यानंतर मुलगी पाहण्यासाठी कधी येऊ, हे विचारण्यासाठी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मोबाइल रिसीव्ह न करता मेसेज आणि व्हाॅट्सॲपवर चॅटिंग केले जाते. प्रत्यक्ष मुलगी पाहण्यासाठी यायचे असेल तर काय प्रक्रिया आहे, याची यादीच तरुणाच्या व्हाॅट्सॲप नंबरवर पाठविली जाते. यादीत पहिल्यांदा पाच हजार रुपये फी भरावी लागते, या बदल्यात आम्ही तुमच्या घरी येतो, घरदार बघतो, मुलीला साडी-चोळी घेतो, त्यानंतर तुमच्या नावाची नोंदणी करतो, आश्रमातील मुलगी पाहायला जाण्यासाठी गेटपास देतो, असा आशय आहे. पण हा फसवणुकीचा फंडा असल्याचे समोर आले आहे.

अंबाबाई मंदिर परिसराचेही नावभूलथापांना भुलून अनेक तरुण पाच हजार रुपये भरून मुलगी पाहण्यासाठी म्हणून शाहूवाडीत जात आहेत. पण ते ज्या आश्रमाचे नाव सांगतात, त्या नावाचा आश्रमच शाहूवाडीत नाही. त्यामुळे हे तरुण हताश होऊन दिवसभर शाहूवाडीत आश्रम शोधतात. सुरुवातीला पाठविलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून शाहूवाडीत तुम्ही सांगितलेला आश्रम नाही, असे सांगताच कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात असल्याचे सांगितले जातेे. यानंतर तरुण अंबाबाई मंदिरात शोध घेतात. तिथेही आश्रम नसल्याने पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यावेळी जयसिंगपूरला आश्रम आहे, तिथे जा, असे सांगितले जाते. तिथे गेल्यानंतरही आश्रम सापडत नाही. त्यानंतर संबंधित तरुणाला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटते.

अब्रू जाईल म्हणून तक्रार नाहीयात फसलेला तरुण निराश होऊन आपलीच अब्रू जाईल, या भीतीपोटी पोलिसात तक्रारही देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फसवणुकीचे रॅकेट उघड होत नाही. फसवणुकीचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरूच आहे.

आश्रमातील उपक्रमांचेही फोटोशाहूवाडीत अनाथाश्रम असल्याची खात्री पटण्यासाठी तेथील एका इमारतीचा फोटो, महाराष्ट्र शासन असे लिहिलेले संस्थापकाचे व्हिजिटिंग कार्ड, आश्रमातील मुला-मुलींच्या उपक्रमांचे फोटो पाठविले जातात. फसवणुकीसाठी ज्या आश्रमाचे नाव सांगितले जाते, तो आश्रमच शाहूवाडीत कोठेही नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

शाहूवाडीत महिला व बालकल्याण विभागाचा कोणताही अनाथआश्रम मंजूर नाही. महिला बालकल्याण विभागाकडील संस्था ० ते १८ वर्षाखालील वयोगटातील मुला- मुलींसाठी असतात. - शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), जिल्हा परिषद कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीmarriageलग्न