शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:50 IST

तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.

ठळक मुद्दे‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटकातांत्रिक कारणामुळे निर्णय; वाहनाने करावा लागला प्रवास

कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने दि. १७ एप्रिलपासून सुरू केली. या सेवेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तांत्रिक कारणामुळे दि. २६ जूनपासून उड्डाणे रद्द केली.

विमानसेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन कंपनी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दि. २९ जुलैपासून पुन्हा या कंपनीकडून ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर ही विमानसेवा सुरळीतपणे सुरू राहिली. मात्र, रविवारी तांत्रिक कारणामुळे या मार्गावरील विमानफेरी कंपनीने रद्द केली.

या विमानातून मुंबईहून कोल्हापूरकडे आमदार डॉ. सुजित मिणचेकर येणार होते, तर कोल्हापुरातून आमदार राजेश क्षीरसागर हे मुंबईला जाणार होते. पण, विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना ऐनवेळी वाहनाने प्रवास करावा लागला. विमानफेरी रद्दबाबतच्या कंपनीच्या निर्णयाबद्दल त्यांच्या अन्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान याबाबत ‘एअर डेक्कन’ची भूमिका जाणून घेण्यासाठी या कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

 

मुंबईतून कोल्हापूरला जाणारी फ्लाईट फुल्ल होती. हवामानही चांगले होते, तरीही एअर डेक्कन कंपनीने विमानफेरी रद्द केली. त्याची पूर्वकल्पना दिली नाही. विमानतळावर गेल्यानंतर फेरी रद्द केल्याचे समजले. ऐनवेळी विमानफेरी रद्द करणे चुकीचे आहे. याबद्दल या कंपनीच्या मुंबईतील व्यवस्थापकांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.- आमदार डॉ. सुजित मिणचेकर

विमानफेरी रद्द झाल्याची माहिती दुपारी दीडच्या सुमारास मिळाली. ती आधी मिळाली असती, तर मुंबईला जाण्यासाठी सकाळी लवकर निघता आले असते. अचानक फेरी रद्द करणे प्रवाशांची गैरसोय करणारे आहे. कंपनीने नियमित सेवा देणे आवश्यक आहे.- आमदार राजेश क्षीरसागर 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर