शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:50 IST

तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.

ठळक मुद्दे‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटकातांत्रिक कारणामुळे निर्णय; वाहनाने करावा लागला प्रवास

कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने दि. १७ एप्रिलपासून सुरू केली. या सेवेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तांत्रिक कारणामुळे दि. २६ जूनपासून उड्डाणे रद्द केली.

विमानसेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन कंपनी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दि. २९ जुलैपासून पुन्हा या कंपनीकडून ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर ही विमानसेवा सुरळीतपणे सुरू राहिली. मात्र, रविवारी तांत्रिक कारणामुळे या मार्गावरील विमानफेरी कंपनीने रद्द केली.

या विमानातून मुंबईहून कोल्हापूरकडे आमदार डॉ. सुजित मिणचेकर येणार होते, तर कोल्हापुरातून आमदार राजेश क्षीरसागर हे मुंबईला जाणार होते. पण, विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना ऐनवेळी वाहनाने प्रवास करावा लागला. विमानफेरी रद्दबाबतच्या कंपनीच्या निर्णयाबद्दल त्यांच्या अन्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान याबाबत ‘एअर डेक्कन’ची भूमिका जाणून घेण्यासाठी या कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

 

मुंबईतून कोल्हापूरला जाणारी फ्लाईट फुल्ल होती. हवामानही चांगले होते, तरीही एअर डेक्कन कंपनीने विमानफेरी रद्द केली. त्याची पूर्वकल्पना दिली नाही. विमानतळावर गेल्यानंतर फेरी रद्द केल्याचे समजले. ऐनवेळी विमानफेरी रद्द करणे चुकीचे आहे. याबद्दल या कंपनीच्या मुंबईतील व्यवस्थापकांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.- आमदार डॉ. सुजित मिणचेकर

विमानफेरी रद्द झाल्याची माहिती दुपारी दीडच्या सुमारास मिळाली. ती आधी मिळाली असती, तर मुंबईला जाण्यासाठी सकाळी लवकर निघता आले असते. अचानक फेरी रद्द करणे प्रवाशांची गैरसोय करणारे आहे. कंपनीने नियमित सेवा देणे आवश्यक आहे.- आमदार राजेश क्षीरसागर 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर