शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

MLA Chandrakant Jadhav : गोरगरिबांचा आधार, जनतेचा आमदार गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 12:37 IST

आमदार झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर शहराचा विकास आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. निरीक्षणातून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच जीवनात त्यांनी कधी अपयश पाहिलेले नाही.

भारत चव्हाणसकाळी बातमी कानावर आली आणि धक्काच बसला. आयुष्यभर संघर्ष, संकटांशी लढताना दाखविलेले धैर्य, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळविण्याची महत्त्वाकांक्षा असलेले आमदार चंद्रकांत जाधव गेले हेच मुळात पटत नव्हते. झपझप व्हाॅटस्ॲप ग्रुप चाळले तर सर्वत्रच ते गेल्याची प्राथमिक माहिती मिळत गेली. क्षणभर काहीच सूचत नव्हते. तरीही एक-दोन फोनवर बातमी खरी असल्याचे स्पष्ट झाले. शांत, निगर्वी, मिभाषी, यशस्वी उद्योजक-राजकारणी झाल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवून सर्वसामान्यांशी जवळीक असलेले चंद्रकांत जाधव यांचा प्रसन्न चेहरा, त्यांचे गोड शब्द कानावर पडत असल्याचा भास व्हायला लागला.चंद्रकांत ‘अण्णा’ या टोपण नावाने ओळखले जात होते. नशिबाने सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या; परंतु नशीब घडविण्याचे कसब त्यांच्या हिमतीत होते. आधी फुटबॉल खेळाडू म्हणून ते यशस्वी झाले, नंतर उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला. २०१९ मध्ये अचूक वेळ साधत राजकारणासारख्या नव्या क्षेत्रांत यश मिळविले. त्यांच्या आयुष्यातील पहिल्याच आणि तेही आमदारकीच्या निवडणुकीत उडी घेतली आणि यशस्वीही झाले. अण्णा वृत्तीने प्रचंड कष्टाळू होते. एखादी गोष्ट मनात आली म्हणून त्यांनी कधीच केली नाही. निरीक्षणातून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अभ्यासाअंती ते स्वत:चे मत बनवायचे आणि मगच ती गोष्ट करायची की नाही ठरवीत होते. त्यामुळेच जीवनात त्यांनी कधी अपयश पाहिलेले नाही.सन १९८१ मध्ये तरुणवयातील अण्णांनी वडिलोपार्जित उद्योगात पहिले पाऊल टाकले. त्यांना लेथ मशीनवर काम करण्याचे कसलेही ज्ञान नव्हते; परंतु त्यांनी वडिलांच्या हाताखाली पडेल ती कामे करण्याचा प्रयत्न केला. कारखान्यात कामगार म्हणून काम करीत असतानाच ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेऊन आपल्या व्यवसायाशी निगडित तांत्रिक शिक्षण पूर्ण केले. त्यातून त्यांच्यात लपलेल्या एक नव्या उद्योजकाची पाळेमुळे रुजली. १९९६ मध्ये वडील पंडितराव यांचे निधन झाले. सगळी जबाबदारी अण्णांच्या खांद्यावर आली. ही जबाबदारी त्यांनी खंबीरपणे सांभाळलीच नाही तर उद्योगाला भरभराटी प्राप्त करून दिली. जाधव इंडस्ट्रीजला संपूर्ण देशभरात नावलौकिक प्राप्त करून दिला.आमदार झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर शहराचा विकास आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. शहरातील अनेक प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. एकेक प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले होते. व्यापारी, उद्योजकांच्या जकात, एलबीटीविरोधी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. नियमित विमान सेवा, रस्ते, आरोग्याच्या समस्या, पाणीपुरवठ्यातील सुधारणा याविषयी त्यांनी काम सुरू केले होते. प्रत्येक आठवड्याला ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करीत होते. त्यामागे जनतेच्या समस्या सुटाव्यात, त्यांची कामे व्हावीत हाच हेतू होता.समाजातील उच्चभ्रू लोकांशी त्यांचे जसे संबंध होते तसेच गोरगरीब, उपेक्षित घटकांशीसुद्धा त्यांची नाळ जोडली गेली होती. दातृत्व हा त्यांचा स्थायिभाव होता. मोठा उद्योजक, आमदार, घरात दोन नगरसेवक, अनेक मोठ्या संस्थांशी संबंध असूनही त्यांनी गर्व कधी बाळगला नाही. समाजातील सर्व घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणीही त्यांना सहजपणे भेटत होते. दोन वेळा आलेला महापूर आणि कोरोनासारख्या महामारीवेळी अण्णांनी सर्वसामान्यांसाठी अन्नधान्याची किट, औषधींचे वाटप केले. त्यांच्यासाठी वैद्यकीय शिबिरे घेतली. कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधी, तर त्यांनी घराघरात जाऊन वाटली. लॉकडाऊन असताना ते स्वत: रस्त्यावर उतरून लोकांना मार्गदर्शन करीत होते. जनतेचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रयत्नशील होते.दुर्दैवाने त्यांनाच कोरोना झाला. त्यातूनही ते उठले. परत कामाला लागले होते. दुर्दैवाने अन्ननलिकेचे इन्फेक्शन झाले. त्यातून ते बाहेर आले नाहीत. जीवनात कधीही हार न माणणाऱ्या अण्णांना या आजारात मात्र हार मानावी लागली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणMLAआमदारcongressकाँग्रेस