शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

नागरिकांच्या गराड्यात मंत्र्यांचा लोकशाही दिन,९०० हून अधिक तक्रारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 11:48 AM

कडकनाथ कोंबडी फसवणूक, पूरबाधित शेतकऱ्यांची प्रलंबित अनुदान रक्कम, भू-विकास बँक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा, शेती पंपांच्या प्रलंबित वीजजोडण्या, इचलकरंजी नगरपालिकेकडून प्रलंबित असलेला दिव्यांगांचा पाच टक्के निधी यासह विविध विभागांशी संबंधित ९०० हून अधिक तक्रार अर्ज लोकशाही दिनात दाखल झाल्या.

ठळक मुद्दे९०० हून अधिक तक्रारी अर्ज दाखलएक महिन्यात उत्तर देण्याचे मंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर :कडकनाथ कोंबडी फसवणूक, पूरबाधित शेतकऱ्यांची प्रलंबित अनुदान रक्कम, भू-विकास बँक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा, शेती पंपांच्या प्रलंबित वीजजोडण्या, इचलकरंजी नगरपालिकेकडून प्रलंबित असलेला दिव्यांगांचा पाच टक्के निधी यासह विविध विभागांशी संबंधित ९०० हून अधिक तक्रार अर्ज सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर या मंत्र्यांच्या लोकशाही दिनात दाखल झाल्या. तक्रारदाराला एक महिन्यात संबंधित विभागाने उत्तर देण्याचे आदेश मंत्र्यांनी यावेळी दिले.शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृह येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.लोकशाही दिन असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपºयांतून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, शेतकरी, पेन्शनधारक आदी नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासूनच या ठिकाणी दाखल झाले होते. दुपारी १२ ते २ यावेळेत लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता; परंतु प्रचंड गर्दी पाहता सकाळी अकरापासूनच कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तक्रार अर्ज देण्यासाठी लांबलचक रांग लागली होती.

सभागृहाबाहेर विविध शासकीय विभागांची २८ टेबल मांडण्यात आली होती. अर्ज स्वीकृतीसाठी या प्रत्येक विभागाची जबाबदारी संबंधित विभागांचे प्रमुख, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अधीक्षक अभियंता आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रांगेतील तक्रारदारांचा अर्ज नोंदवून घेऊन त्यासोबत शासनाचा टोक न अर्ज देऊन त्यांना लोकशाही दिनात मंत्र्यांकडे पाठविले जात होते. या ठिकाणी तक्रारीचे स्वरूप पाहून मंत्री त्यावर शेरा मारून पुढे कार्यवाहीसाठी पाठवत होते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या टीमकडून त्या अर्जांचे वर्गीकरण करून संबंधित विभागांच्या टेबलकडे पाठविले जात होते. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.

तक्रारदाराला एक महिन्यात उत्तर द्यालोकशाही दिनात तक्रार अर्ज दिलेल्या तक्रारदाराला त्याच्या प्रश्नाचे उत्तर संंबंधित विभागाने द्यावे, असे आदेश मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील व राज्यमंत्री यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर