शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

वस्त्रोद्योगात पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करणार नाही, मंत्री संजय सावकारे यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:00 IST

सूतगिरण्यांच्या अडचणीसंबंधी बैठक, सकारात्मक चर्चा

कोल्हापूर : विदर्भ, मराठवाडा, खान्देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक आहेत. हा भाग मागास आहे. म्हणून शासन या भागातील वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन, सवलत देत आहे. मात्र याबाबतीत पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन वस्त्रोद्याेग मंत्री संजय सावकारे यांनी गुरुवारी दिले. पश्चिम महाराष्ट्रातूनही आमचे आमदार, खासदार अधिक निवडून यावेत. पक्ष वाढला पाहिजे, अशी भूमिका असल्याने न्याय भूमिका राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाने आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सूतगिरण्यांचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. आमदार अशोक माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री सावकारे म्हणाले, तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सन २०२३ मध्ये तयार केलेले वस्त्रोद्योग धोरण देशात चांगले आहे. काही मागण्याही प्रलंबित आहेत. जुन्या सूतगिरण्यांना आधुनिकीकरण, विस्तारीकरणाला पाठबळ देण्यात येणार आहे. सूतगिरण्यांकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीचा वापर सौरऊर्जेसाठी आणि वस्त्रोद्योगासाठी देण्याचा विचार करू. शासनाने दिलेल्या भागभांडवलापोटी सूतगिरणीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा नोंद केल्याच्या तक्रारी आहेत. यातून सकारात्मक मार्ग काढू. मागासवर्गीय सूतगिरण्यांच्या सर्व सभासदांची जात पडताळणी करण्याची सक्ती रद्द करून केवळ संचालकांसाठीच ही अट लावावी, अशा प्रकारची सूचना करतो.आमदार माने म्हणाले, खासगीप्रमाणेच सहकारी सूतगिरण्यांनाही भागभांडवल मिळावे. मागासर्गीय सूतगिरण्यांच्या सर्व सभासदांच्या जात पडताळणीची सक्ती रद्द

महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, सूतगिरण्यांना मदत, सवलती देताना पश्चिम महाराष्ट्राला कमी आणि विदर्भ, मराठवाडा, खान्देशाला अधिक असे करू नका. खासगी सूतगिरणी काढणाऱ्यांना अधिक भागभांडवल आणि सहकारी सूतगिरण्यांना कमी करणे अन्यायकारक आहे. वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था येण्यासाठी शासनाकडून भरीव मदत आणि सवलती मिळाव्यात.बैठकीस अशोक चराटी, प्रा. किसनराव कुराडे, किशाेरी आवाडे, स्वप्निल आवाडे, प्रा. अनिल कुराडे, राजू मगदूम, वैभव गायकवाड, महेश कदम, उमेश भोईटे, सुरेश पाटील यांच्यासह बीड, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सूतगिरणीचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. रणजीत देशमुख यांनी आभार मानले.

७० टक्के लुंग्या इचलकरंजीतील..दक्षिणेतील लोक नेसतात त्यातील ७० टक्के लुंग्यांचे उत्पादन इचलकरंजीत होते. केंद्र सरकारने भरवलेल्या भारत प्रदर्शनात इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाने प्रभावी ठसा उमटवल्याने तिथे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

मला वस्त्रोद्योग खाते का ?आमदार असताना सातत्याने वस्त्रोद्योगात विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय का, असे प्रश्न विचारत होतो, म्हणून मला वस्त्राेद्योग खाते दिले. तूच ठरव आता याचे धोरण असेही म्हटले असावे, असा उपरोधिक किस्सा, मंत्री सावकारे यांनी सांगितला.

लाडक्या बहिणींना देताच की..सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा कल्पना शिंगाडे म्हणाल्या, सूतगिरण्यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला आहे. कामगारांना काम मिळाले. महिला स्वावलंबी होत आहेत. यामुळे सूतगिरण्यांना आर्थिक मदत द्यावी. शासन लाडक्या बहिणींना पैसे देते तर सूतगिरण्यांमधून महिला सक्षमीकरण करणाऱ्यांना उद्योगाला निधी का नाही ? सहकार टिकला तर सरकार टिकणार आहे. म्हणून सहकारी सूतगिरण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

पश्चिम महाराष्ट्राने काय पाप केले ?माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सूतगिरण्या चिकाटीने चालवल्या जातात. कापसाचे दर स्थिर नाहीत. वीज बिल खूप येते आहे. यामुळे सूतगिरणी चालवणे अवघड आहे. शेतीनंतरचा सर्वात अधिक रोजगार वस्त्रोद्योगातून मिळतो. पण अलीकडे आम्हाला मदत कमी केल्याने पश्चिम महाराष्ट्राने काय पाप केले आहे , असा प्रश्न पडत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTextile Industryवस्त्रोद्योगministerमंत्रीichalkaranji-acइचलकरंजी