शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

ऊस टोळ्यांना उचल देण्याची पद्धत बंद व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठवाड्यातील ऊसटोळ्यांकडून साखर कारखानदारीस अलीकडील काही वर्षात अत्यंत वाईट अनुभव आले आहेत. उचल घेऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठवाड्यातील ऊसटोळ्यांकडून साखर कारखानदारीस अलीकडील काही वर्षात अत्यंत वाईट अनुभव आले आहेत. उचल घेऊन तोडणीसाठीच न येण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे यापुढे सहकारी व खासगी कारखान्यांनी उचल देण्याची पद्धतच सामूहिकरित्या बंद करावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी एकमुखी मागणी गुुरुवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या बैठकीत करण्यात आली. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हुपरी येथील जवाहर कारखान्याच्या मुख्यालयात ही बैठक झाली. बैठकीत यंदा ऊस जास्त असल्याने हंगाम मार्चअखेरपर्यंत लांबणार असून राज्य व केंद्र सरकारकडील कारखान्यांचे आर्थिक प्रश्न सोडविले नाहीत तर एकरकमी एफआरपी देणे अडचणीचे होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

आयुक्त गायकवाड दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी हंगामाचा आढावा घेतला. त्यामध्ये कार्यकारी संचालक सर्वश्री मनोहर जोशी (जवाहर), पी. जी. मेढे (साखरतज्ज्ञ), शरद कदम (सोनहिरा-सांगली), माहुली (राजारामबापू, वाळवा), एम. व्ही. पाटील (दत्त, शिरोळ), एन. वाय. पाटील (मंडलिक), जितेंद्र चव्हाण (शाहू), उदय पाटील (गुरुदत्त), आर. डी. देसाई (बिद्री), अशोक पाटील (कुंभी-कासारी), के. एस. चौगले (भोगावती), जयदीप पाटील (डी.वाय.) आदींनी चर्चेत भाग घेतला. मेढे यांनी केंद्र सरकारकडील प्रश्र्नांची सुरुवातीलाच विस्ताराने मांडणी केली.

ऊसटोळ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वी उचल देताना कारखान्यांची फारच ओढाताण होते तरीही उचल दिली जाते आणि नंतर टोळ्याच येत नाहीत. त्यांच्याकडील पैसे वसूल करणे हे देखील जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे काम झाल्यावर पगार या धोरणानुसार कुणीच उचल न देता सर्वांनीच हंगाम सुरू झाल्यावर दर दहा दिवसाला त्यांची बिले देण्याची पद्धत सुरू केली पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला. त्यासाठी साखर आयुक्तालयाने पुढाकार घ्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त झाली.

पुढील महिन्यात बैठक

देशातील साखर आयुक्तांची केंद्र सरकारने बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत प्रलंबित प्रश्नांबाबत व येणे रकमेबाबत पाठपुरावा करू, असे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. मराठवाड्यातील तरुण आता शिक्षणास प्राधान्य देत आहे. त्यामुळे यापुढील काळात टोळ्या कमीच होणार असल्याने यांत्रिकीकरणावर भर द्या, असेही त्यांनी सुचविले.

चर्चेतील महत्त्वाचे प्रश्न

१.राज्य सरकारने कर्जावरील व्याजाची रक्कम अदा करावी

२.केंद्र सरकारडील बफर स्टॉक व निर्यात अनुदानाचे सुमारे १३०० कोटी रुपये येणेबाकी आहेत. ती रक्कम तातडीने मिळावी

३.यंदा साखर उत्पादन दुप्पट होणार असल्याने यावर्षीही ६० लाख टन साखर निर्यातीस परवानगी मिळावी

४.साखरेची किमान खरेदी किंमत ३८ करावी. इस्मा व साखर संघानेही तशी मागणी केली आहे.

५.साखरेचा ४० लाखांचा बफर स्टॉक यंदाही करावा

(फोटो मिळाला तर पाठवत आहे)