शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

शेतकऱ्यांना गाडा अन् मगच रेल्वेचा सर्व्हे करा बैठक निष्फळ : हातकणंगले ते कबनूर-समितीचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:02 IST

शेतकºयांना जमिनीत गाडा आणि मगच रेल्वेचा सर्व्हे करा, अशी कडक भूमिका रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने शेतकºयांनी मांडली. त्यामुळे सर्व्हेसाठी प्रांताधिकारी व पोलीस अधिकारी यांनी बोलावलेली रेल्वे

ठळक मुद्दे आठ किलोमीटरच्या सर्व्हेला

इचलकरंजी : शेतकºयांना जमिनीत गाडा आणि मगच रेल्वेचा सर्व्हे करा, अशी कडक भूमिका रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने शेतकºयांनी मांडली. त्यामुळे सर्व्हेसाठी प्रांताधिकारी व पोलीस अधिकारी यांनी बोलावलेली रेल्वे अधिकारी व शेतकरी यांची बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, शेतकºयांकडून होणाºया विरोधाबाबत प्रशासन व रेल्वे अधिकारी वरिष्ठ पातळीवर कळविणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्यातूनही रेल्वे प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही पोलीस व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

इचलकरंजीला रेल्वे येण्यासाठी हातकणंगले ते कबनूर या आठ किलोमीटरच्या अंतराच्या सर्व्हेला होणारा विरोध चर्चेतून सोडविण्यासाठी प्रांत कार्यालयात शनिवारी कृती समितीचे पदाधिकारी तसेच रेल्वे मार्गावर येणाºया गावातील प्रमुख पदाधिकारी व रेल्वे खात्यातील अधिकारी यांची संयुक्त बैठक शनिवारी झाली. यात सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे व पोलीस प्रशासनाच्यावतीने अप्पर श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक सतीश पोवार यांनी प्रयत्न केले. रेल्वेच्यावतीने वरिष्ठ खंड अभियंता, मध्य रेल पुणे दीपक आर्या व मिरज विभाग पुणे मंडल, मध्य रेल्वेचे सहायक कार्यकारी अभियंता एस. के. जैन यांनी सर्व्हेसंदर्भात माहिती दिली. तसेच शेतकºयांच्या लेखी परवानगीशिवाय जमीन घेतली जाणार नाही. त्यामुळे सर्व्हेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

कृती समितीच्यावतीने अध्यक्ष प्रमोद पाटील, जयकुमार कोले, पी. एम. पाटील, सरपंच खलिदा फकीर, चंदूरचे सरपंच मारुती जाधव, नागेश पुजारी, विजय पाटील यांच्यासह कुंभोज, कोरोची व हातकणंगलेतील प्रमुख पदाधिकाºयांनी सर्व्हेसाठी विरोध दर्शविला. नियमानुसार या सर्व गावांनी गावसभांमध्ये या भागातून रेल्वे येण्यास तसेच या संदर्भातील सर्व्हेे होण्यास विरोध असल्याचा ठराव करून संबंधित विभागाला पाठविला आहे. त्यामुळे या सर्व्हेसाठी विरोध असून, तो रेल्वेच्या अधिकाºयांनी व प्रशासनाने आपापल्या विभागाला कळवावा. तसेच इचलकरंजीला रेल्वे पाहिजेच असल्यास यापेक्षा जवळचा असणारा तारदाळ अथवा त्या परिसरातून नवीन मार्ग निवडावा अशी भूमिका मांडली.

पोलीस दलाने याबाबत विरोधी कृती समितीने रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत आपले म्हणणे वरिष्ठ स्तरावर पोहोचवून मार्ग काढावा, अन्यथा रेल्वे प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल. त्यावेळी विरोधाची भूमिका घेऊ नये, असे स्पष्ट केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, निरीक्षक मनोहर रानमाळे, संजीव झाडे, आदी उपस्थित होते.इचलकरंजी प्रांत कार्यालयात रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने पी. एम. पाटील पाटील यांनी बाजू मांडली. यावेळी कृती समितीचे सदस्य व प्रांताधिकारी समीर शिंगटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरी