शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

शेतकऱ्यांना गाडा अन् मगच रेल्वेचा सर्व्हे करा बैठक निष्फळ : हातकणंगले ते कबनूर-समितीचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:02 IST

शेतकºयांना जमिनीत गाडा आणि मगच रेल्वेचा सर्व्हे करा, अशी कडक भूमिका रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने शेतकºयांनी मांडली. त्यामुळे सर्व्हेसाठी प्रांताधिकारी व पोलीस अधिकारी यांनी बोलावलेली रेल्वे

ठळक मुद्दे आठ किलोमीटरच्या सर्व्हेला

इचलकरंजी : शेतकºयांना जमिनीत गाडा आणि मगच रेल्वेचा सर्व्हे करा, अशी कडक भूमिका रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने शेतकºयांनी मांडली. त्यामुळे सर्व्हेसाठी प्रांताधिकारी व पोलीस अधिकारी यांनी बोलावलेली रेल्वे अधिकारी व शेतकरी यांची बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, शेतकºयांकडून होणाºया विरोधाबाबत प्रशासन व रेल्वे अधिकारी वरिष्ठ पातळीवर कळविणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्यातूनही रेल्वे प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही पोलीस व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

इचलकरंजीला रेल्वे येण्यासाठी हातकणंगले ते कबनूर या आठ किलोमीटरच्या अंतराच्या सर्व्हेला होणारा विरोध चर्चेतून सोडविण्यासाठी प्रांत कार्यालयात शनिवारी कृती समितीचे पदाधिकारी तसेच रेल्वे मार्गावर येणाºया गावातील प्रमुख पदाधिकारी व रेल्वे खात्यातील अधिकारी यांची संयुक्त बैठक शनिवारी झाली. यात सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे व पोलीस प्रशासनाच्यावतीने अप्पर श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक सतीश पोवार यांनी प्रयत्न केले. रेल्वेच्यावतीने वरिष्ठ खंड अभियंता, मध्य रेल पुणे दीपक आर्या व मिरज विभाग पुणे मंडल, मध्य रेल्वेचे सहायक कार्यकारी अभियंता एस. के. जैन यांनी सर्व्हेसंदर्भात माहिती दिली. तसेच शेतकºयांच्या लेखी परवानगीशिवाय जमीन घेतली जाणार नाही. त्यामुळे सर्व्हेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

कृती समितीच्यावतीने अध्यक्ष प्रमोद पाटील, जयकुमार कोले, पी. एम. पाटील, सरपंच खलिदा फकीर, चंदूरचे सरपंच मारुती जाधव, नागेश पुजारी, विजय पाटील यांच्यासह कुंभोज, कोरोची व हातकणंगलेतील प्रमुख पदाधिकाºयांनी सर्व्हेसाठी विरोध दर्शविला. नियमानुसार या सर्व गावांनी गावसभांमध्ये या भागातून रेल्वे येण्यास तसेच या संदर्भातील सर्व्हेे होण्यास विरोध असल्याचा ठराव करून संबंधित विभागाला पाठविला आहे. त्यामुळे या सर्व्हेसाठी विरोध असून, तो रेल्वेच्या अधिकाºयांनी व प्रशासनाने आपापल्या विभागाला कळवावा. तसेच इचलकरंजीला रेल्वे पाहिजेच असल्यास यापेक्षा जवळचा असणारा तारदाळ अथवा त्या परिसरातून नवीन मार्ग निवडावा अशी भूमिका मांडली.

पोलीस दलाने याबाबत विरोधी कृती समितीने रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत आपले म्हणणे वरिष्ठ स्तरावर पोहोचवून मार्ग काढावा, अन्यथा रेल्वे प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल. त्यावेळी विरोधाची भूमिका घेऊ नये, असे स्पष्ट केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, निरीक्षक मनोहर रानमाळे, संजीव झाडे, आदी उपस्थित होते.इचलकरंजी प्रांत कार्यालयात रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने पी. एम. पाटील पाटील यांनी बाजू मांडली. यावेळी कृती समितीचे सदस्य व प्रांताधिकारी समीर शिंगटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरी